
Amit Shah Interview: नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. "भाजपनं (BJP) बहुमताचा आकडा गाठला नाही तर भाजपकडे काही प्लान बी आहे का?" या प्रश्नावर अमित शहांनी थेट उत्तर दिलं आहे. "प्लान बी तेव्हाच बनवावा लागेल, ज्यावेळी प्लान A यशस्वी होण्याची शक्यता 60 टक्क्यांहून कमी असेल, पण मला खात्री आहे की, पंतप्रधान मोदी (PM Modi) प्रचंड बहुमतानं सत्तेवर येतील...", असं अमित शहा म्हणाले.
तुम्हाला लोक राजकीय चाणाक्य म्हणतात... या प्रश्नावरही अमित शहांनी उत्तर दिलं आहे. राजकीय चाणक्य म्हटल्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, मी चाणाक्य नाही. हे फक्त लोक म्हणतात. माझा त्यावर विश्वास नाही." तसेच, पुढे बोलताना, नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होतील, असा दावाही त्यांनी केला.
अरविंद केजरीवाल जिथे जातील, तिथे लोकांना दारूचा घोटाळा आठवेल : अमित शहा
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवडणूक प्रचारावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, "मतदार म्हणून मला विश्वास आहे की, ते जिथे जातील तिथे लोकांना दारूचा घोटाळा आठवेल. अनेकांना मोठी बाटली दिसेल." अरविंद केजरीवाल यांच्या "तुम्ही मला मत दिलं तर मला तुरुंगात जावं लागणार नाही" या वक्तव्यावर ते म्हणाले की, "यापेक्षा मोठा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान होऊ शकत नाही. सर्वोच्च न्यायालय (निवडणुकीच्या) विजय-पराजयावर निर्णय देईल का?"
|
Devendra Fadnavis : 'सिंचन घोटाळ्याचे आरोप चुकीचे नव्हते'; देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य |
संविधानात बदलांसंदर्भातील चर्चांवर काय म्हणाले अमित शहा?
भाजपचा 400 पारचा नारा आणि संविधानात बदल करण्यासंदर्भातील चर्चांवरही अमित शहांनी यावेळी भाष्य केलं. गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, "आमच्याकडे गेल्या 10 वर्षांपासून संविधान बदलण्यासाठी बहुमत आहे. पण आम्ही असं कधीच केलेलं नाही. बहुमताचा दुरुपयोग करण्याचा इतिहास माझ्या पक्षाचा नाही. बहुमताचा दुरुपयोग केल्याचा इतिहास इंदिरा गांधींच्या काळात काँग्रेसनं केला होता. परंतु, हा... आम्हाला 400 जागा जिंकायच्यात, कारण आम्हाला देशाच्या राजकारणात स्थैर्य आणायचं आहे. कारण आम्हाला देशाच्या सीमा सुरक्षित करायच्या आहेत. आम्हाला यूसीसी आणायचं आहे. आम्ही 10 वर्षांत आम्ही जिंकलेल्या जागांचा उपयोग कसा केला? कलम 370 रद्द करणं, तिहेरी तलाक रद्द करणं आणि राम मंदिर उभारण्यासाठी केलाय."
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



