
Sugar Factory : गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने जास्तीचा ऊस मिळवण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर बक्षीस योजना जाहीर केली आहे. शेतकऱ्यांसाठी बक्षीस योजना जाहीर करणारा जिल्ह्यातील विठ्ठल कारखाना पहिला ठरला आहे.
यंदा सोलापूर जिल्ह्यात पाऊस कमी झाल्याने ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर अधिकचा ऊस मिळवण्यासाठी जिल्ह्यातील साखर कारखान्यांमध्ये ऊसदराची स्पर्धा सुरू झाली आहे.
|
Pune Cirme : थेट घरात घुसले अन् एकापाठोपाठ एक तीन गोळ्या झाडल्या; पुण्यात मध्यरात्री खुनाचा थरार |
राज्यात सर्वाधिक ऊस गाळप करणाऱ्या टेंभुर्णी येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने २५०० रुपये दर जाहीर करून कोंडी फोडली होती. त्यानंतर पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने जिल्ह्यात सर्वाधिक २५५० रुपये दर करून विठ्ठलराव शिंदे कारखान्यावर मात केली. त्यानंतर जिल्ह्यातील अन्य साखर कारखान्यांनी २५०० रुपयांच्या आसपास दर जाहीर केला आहे.
दरम्यान, उच्चांकी ऊसदराची परंपरा कायम ठेवणाऱ्या श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने मात्र अद्याप ऊसदराची घोषणा केली नाही. पांडुरंग कारखान्याने ऊस दर जाहीर न करता गुलदस्त्यात ठेवला आहे. येत्या काळात पांडुरंग कारखाना ऊसदर जाहीर करण्याची शक्यता आहे.
ऊसदरात आघाडी घेतल्यानंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यासाठी बक्षीस योजना जाहीर करून एक पाऊल पुढे टाकले आहे. यंदा कारखान्यांचा गाळप हंगाम जेमतेम १०० दिवस चालेल असा अंदाज आहे. त्यामुळे सर्वच कारखान्यांना चांगला ऊस मिळवण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे. त्यापूर्वीच पंढरपूरच्या विठ्ठल साखर कारखान्याने जास्तीचा ऊस मिळवण्यासाठी बक्षीस योजना जाहीर केली आहे.
शंभर टन ऊसपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रती टन दहा रुपये, अडीचशे टनासाठी पंधरा रुपये, पाचशे टनासाठी २५ तर एक हजार टनासाठी ५० रुपये बक्षीस म्हणून अधिकचे देण्यात येणार आहेत. कारखान्याने जाहीर केलेल्या बक्षीस योजनेचे तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे. अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली विठ्ठल कारखाना चांगला सुरु आहे.
चांगला ऊस मिळण्यास मदत
मागील वर्षीप्रमाणे यंदाही कारखान्याने सर्वाधिक २५५० रुपये दर जाहीर केला आहे. शिवाय बक्षीस योजनाही जाहीर केली आहे. मी इतर कारखान्यांना ऊस न देता माझा शेतातील सर्व ऊस विठ्ठल कारखान्याला देणार असल्याचे उपरी येथील ऊस उत्पादक शेतकरी दत्तात्रय माणिक नागणे यांनी सांगितले.
दुसरीकडे या बक्षीस योजनेमुळे कारखान्याला चांगला साखर उतारा मिळणारा ऊस मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे बक्षीस योजनेचा कारखान्याला ऊस मिळवण्यासाठी चांगला फायदा होईल, असे कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी सांगितले.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल


























Subscribe to my channel



