
Irshalwadi News: रायगड जिल्ह्यातल्या खालापूरजवळच्या इर्शाळवाडीवर बुधवारी दरड कोसळल्याची घटना घडली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकले. या दुर्घटनेचा आज चौथा दिवस आहे. घटनास्थळावर गेल्या चार दिवसांपासून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा २९ वर पोहचला आहे. तर ७६ जण अद्यापही बेपत्ता आहेत.
इर्शाळवाडी दुर्घटना होऊन आज चार दिवस झाले. चौथ्या दिवशीही सकळी 6 वाजल्यापासून बचावकार्य सुरु करण्यात आले. आज सकाळपासून दोन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मृतांचा आकडा हा २९ वर पोहचला आहे. तर ७६ जण अद्यापही बेपत्ता आहेत. बेपत्ता असणारे सर्वजण जीवंत असतील की नाही याची शंका व्यक्त केली जात आहे. अग्निशमन दल, स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफच्या टीमकडून बचावकार्य सुरु आहे. पण पाऊस, धुके आणि चिखल यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. अशामध्ये पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यामुळे सध्या बचावकार्य थांबवण्यात आले आहे.
|
|
आजही पूर्णदिवस बचावकार्य केले जाणार आहे. पण आज संध्याकाळपर्यंत बचावकार्य थांबवले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन हे बचावकार्य थांबवले जाऊ शकते. तळीये दुर्घटनेप्रमाणेच बचावकार्य थांबवत इतर बेपत्ता व्यक्तींना मृत घोषित केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जिल्हा प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'ढिगाऱ्याखाली दबलेले मृतदेह कुजण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना जिवंत बाहेर काढण्याची आशा नाही. तरी देखील जनतेच्या भावना लक्षात घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना अहवाल पाठवण्यात येणार आहे'
दरम्यान, घटनास्थळावर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या गावकऱ्यांच्या नातेवाईकांनी गर्दी केली आहे. आपला माणून ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढला जाईल या आशेने ते वाट पाहत तिथेच बसले आहेत. रडून रडून या सर्वांच्या डोळ्यातील अश्रू आटले आहेत. आपल्या माणसाचा बचाव व्हावा यासाठी ते प्रार्थना करत आहेत. इर्शाळवाडीची दुर्घटना घडली त्यावेळी ४६ घरांवर दरड कोसळली. या गावामध्ये २२९ जण राहत होते. काही जण गावाबाहेर गेले असल्याने आणि काही जण गावातील शाळेमध्ये झोपायला गेल्यामुळे बचावले.
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर



























Subscribe to my channel




