
एकनाथ शिंदे गटाच्या ३९ आमदारांविरोधात ठाकरे गटाकडून अपात्रतेसंदर्भात न्यायालयात याचिका करण्यात आली होती. मात्र, हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्शावर न्यायालयाने दिलेल्या महत्त्वपूर्ण निकालामध्ये अध्यक्षांच्या अधिकारक्षेत्रात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. मात्र, त्याचवेळी शिंदे गटाचे व्हिप आणि गटनेतेपदाची निवड अवैध ठरवत अपात्रतेसंदर्भातल्या निर्णयासाठी ठाकरे गटाचाच व्हिप वैध मानण्याचे सूतोवाच न्यायालयाने निकालात केले. यासंदर्भात इंडियन एक्स्प्रेस अड्डामध्ये बोलताना राहुल नार्वेकरांनी सविस्तर भूमिका मांडली आहे.
यावेळी पक्षांतरबंदी कायद्यामध्ये बदल होण्यासंदर्भात राहुल नार्वेकरांनी आपली भूमिका मांडली. “संसदीय लोकशाही ही सातत्याने काळानुसार बदलणारी व्यवस्था आहे. पूर्वी असणारा पक्षांतरबंदी कायदा आत्तापेक्षा कमकुवत होता. ज्या ज्या वेळी त्याला आव्हानं निर्माण झाली, तेव्हा त्यात बदल होत गेले. अशा घटनांमधूनच कायदे सक्षम होत असतात. या अर्थाने पाहाता प्रत्येक संकट हे एक संधी असतं. अर्थात, सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यात बदल करण्यासाठी संधी आहेत. पण त्यावर संसद एकत्रितपणे निर्णय घेईल”, असं नार्वेकर यावेळी म्हणाले.
सध्या महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचं लक्ष हे विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे लागलं आहे. आमदार अपात्रतेसंदर्भात सविस्तर सुनावणी घेऊनच निर्णय घेतला जाईल, असं नार्वेकरांनी याआधीच सांगितलं आहे. त्याबरोबरच ठाकरे गटाकडूनही तशी मागणी केली जात आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर कशा पद्धतीने अपात्रतेच्या मुद्द्यावर निर्णय घेणार यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. यासंदर्भात नार्वेकरांनी भूमिका मांडली आहे.
“मी आधी हे पाहीन की तेव्हा कोणता गट राजकीय पक्ष होता? नियम न डावलता यासंदर्भातल्या याचिकांवर सुनावणी होईल. शक्य तितक्या लवकर या सर्व प्रक्रियेला सुरुवात करेन”, असं नार्वेकर म्हणाले.
दरम्यान, सर्व चर्चेच्या केंद्रस्थानी आल्यामुळे राहुल नार्वेकरांना याचा तणाव जाणवतोय का? अशी विचारणा केली असता त्यांनी त्यावर त्यांची बाजू मांडली. “जर तु्म्ही स्पष्ट आहात आणि जे करताय ते कायद्याला धरून आहे हे तुम्हाला माहिती असेल तर तणावाचा प्रश्न येत नाही. मला कुणी एक-दोन व्यक्ती माझ्याबद्दल काय विचार करतायत त्यानं फरक पडत नाही. पण देशाचे लोक काय म्हणतायत यानं फरक पडतो. या निर्णयामुळे लोकशाहीवरचा लोकांचा विश्वास वाढणार आहे. घटनाविरोधी कृती लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास कमी करू शकते”, असं ते म्हणाले.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



