केरळचे मुख्यमंत्री पीनाराई विजयन यांची 'द केरळ स्टोरी 2'वर टीकाImage Credit source: Instagram
विपुल शाह निर्मित ‘द केरळ स्टोरी 2’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द केरळ स्टोरी’चा हा सीक्वेल आहे. तेव्हासुद्धा या चित्रपटावरून वाद निर्माण झाला होता. आता पुन्हा एकदा केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी ‘राज्याच्या धर्मनिरपेक्ष मूल्यांसाठी धोका’ असल्याचं म्हटलं आहे. विजयन यांनी या चित्रपटाला ‘विषारी’ असं म्हणत इशारा दिला आहे. केरळच्या धार्मिक सौहार्दाच्या परंपरेला हा चित्रपट हानी पोहोचवू शकतो, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे. याशिवाय समाजवादी पार्टीचे नेते आणि अभिनेत्री आयशा टाकियाचे सासरे अबू आझमी यांनीही चित्रपटावर जोरदार टीका केली आहे. असे चित्रपट देशातील मुस्लिमांना दुखावतात, असं त्यांनी म्हटलं आहे. ‘द केरळ स्टोरी 2’चा वाद वाढत असतानाच सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला UA प्रमाणपत्र दिलं आहे.
काय म्हणाले केरळचे मुख्यमंत्री?
“देशाला हे समजलंय की खोटेपणा, द्वेष आणि केरळविरोधी प्रचाराने भरलेला ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट जातीयवादी हेतूंनी बनवण्यात आला होता. त्यानंतर आता दुसरा भागसुद्धा बळजबरीने धर्मांतराच्या घटनांचं चित्रण करतो. समाजात फूट पाडण्यासाठी आणि द्वेष पसरवण्यासाठी बनवण्यात आलेल्या विषारी कामाला पब्लिक स्क्रिनिंगची परवानगी का देण्यात आली? विशेषकरून तेव्हा, जेव्हा ‘बीफ’सारख्या चित्रपटांना फक्त शीर्षकामुळे चित्रपट महोत्सवांमध्ये प्रदर्शनापासून रोखण्यात आलं होतं. ते परस्पर संमतीने होणाऱ्या विवाहांनाही जातीयवाद आणि बळजबरीने धर्मांतर करण्याचं उदाहरण म्हणून दाखवून खोटा प्रचार करत आहेत”, असं केरळचे मुख्यमंत्री म्हणाले.
याविषयी ते पुढे म्हणाले, “केरळमध्ये जातीय दंगली होत नाहीत आणि समुदायांवमध्ये परस्पर आदराची भावना आहे. त्यामवुळे अशा काही शक्ती केरळच्या विरोधात आहेत. असे चित्रपट या प्रदेशातील शांतता नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. धार्मिक सौहार्दाची भूमी, कायदा-सुव्यवस्था राखण्यात एक आदर्श असलेल्या केरळला दहशतवादाचं केंद्र म्हणून चित्रित करण्याचे प्रयत्न आपण एकत्रितपणे नाकारले पाहिजेत. सत्याचा नेहमीच विजय होईल.”
मुस्लीम मुलांशी प्रेमात पडल्यानंतर या तिन्ही मुलींच्या आयुष्यात जे भयानक वळण येतं, त्याचं चित्रण या चित्रपटात करण्यात आलं आहे. हा चित्रपट येत्या 27 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘द केरळ स्टोरी’वर काही राज्यांमध्ये बंदी घालण्यात आली होती. तर काहींनी हा चित्रपट प्रचारकी असल्याचं म्हटलं होतं.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



