अमरावती: स्त्री रुग्णालयाच्या (डफरीन हॉस्पिटल) नवजात शिशू अतिदक्षता विभागात (SNCU) घडलेल्या भीषण अग्निकांडात आणि स्फोटात तीन निष्पाप नवजात बालकांचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेला १० दिवस उलटून गेले आहेत, तरीही या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कोणती कारवाई होणार आणि नेमका चौकशी अहवाल कधी जाहीर होणार, याबाबत प्रशासन अजूनही मौन बाळगून आहे. "आमच्या चिमुकल्या बाळाच्या मृत्यूस नेमके कोणाचे हलगर्जीपण जबाबदार?" असा संतप्त सवाल मृत बालकांच्या दुःखी व संतापलेल्या पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीमधील एसएनसीयू विभागात पहाटेच्या सुमारास अचानक व्हेंटिलेटरमध्ये शॉर्टसर्किट व स्फोट होऊन भीषण आग लागली होती. या दुर्दैवी दुर्घटनेत धुराने गुदमरून आणि भाजल्यामुळे तीन नवजात बालकांचा जागीच कोमेजून मृत्यू झाला होता, तर प्रशासकीय यंत्रणेच्या या ढिसाळ कारभारावर सर्व स्तरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. घटनेच्या गांभीर्या Mर ओळखत राज्य सरकारकडून व जिल्हा प्रशासनाकडून तात्काळ उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, दुर्घटना घड होऊन १० दिवस उलटल्यानंतरही या चौकशी समितीचा अंतिम अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही.
या प्रकरणी राज्याच्या राजकीय वर्तुळातून तसेच विरोधकांकडूनही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, आरोग्य यंत्रणेच्या भोंगळ कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. रुग्णालयातील अग्निशामक यंत्रणा, व्हेंटिलेटरच्या पुरवठ्यासाठी जबाबदार असणाऱ्या कंपन्या (उदा. शिल्लर कंपनीचे व्हेंटिलेटर) आणि सुरक्षेच्या नियमांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप पीडित कुटुंबीय आणि विविध राजकीय नेत्यांनी केला आहे. दरमहा नियमित अहवाल पाठवणारे वरिष्ठ अधिकारी आणि विभागीय उपसंचालक कार्यालय या दुर्घटनेनंतर केवळ कागदी घोडे नाचवत असून दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
दुसरीकडे, आपल्या नवजात बाळांना गमावलेल्या माता आणि पित्यांचा आक्रोश अद्याप थांबलेला नाही. "घटना घडून १० दिवस झाले, परंतु अद्याप आम्हाला न्याय मिळालेला नाही आणि चौकशीचा अहवालही समोर आलेला नाही, मग आमच्या बाळांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांना पाठीशी का घातले जात आहे?" असा सवाल करत पालकांनी प्रशासनाकडे तातडीने अहवाल जाहीर करण्याची आणि दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शहर
- पुणे: हो, आमच्याकडून चुका झाल्या, आवाज आणि स्पर्धा वाढली, आता नियमांचे पालन करू गणेशोत्सवापूर्वी पुणे साऊंड व्यावसायिकांची मोठी कबुली!
- पुणे: यंदाच्या उत्सवात पुणेकरांना अनुभवायला मिळणार कामाचा माणूस, अजितदादांच्या प्रशासकीय शैलीवर आधारित लक्षवेधी हलते देखावे!
- नाशिक: रस्त्यावरील चिखलामुळे दुचाकी घसरली, पाठीमागून आलेल्या बसच्या धडकेत विवाहितेचा जागीच मृत्यू
- पुणे: एक मराठा, लाख मराठा च्या गगनभेदी घोषणा; मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ पुण्यातील कात्रज चौकात मराठा समाज आक्रमक, केला रास्ता रोको
महाराष्ट्र
- पुणे: दहीहंडी वाहतूक अलर्ट; शहरात मोठे वाहतूक बदल आणि निर्बंध लागू, प्रशासनाकडून पर्यायी मार्गांची घोषणा!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- नाशिक: आदिवासी मंत्र्यांच्या राजीनाम्यावर भर द्या; राहुल गांधींच्या दीर्घकालीन बैठकीनंतर आंदोलक विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या सूचना!
- अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ३८ लाखांचा आर्थिक घोटाळा; संशोधन संचालकांसह ७ जणांवर फौजदारी गुन्हा दाखल!
गुन्हा
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
- सांगली: पलूसमध्ये घरगुती वादातून पती-पत्नीचे टोकाचे पाऊल; विषारी औषध प्राशन करून दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू
- उत्तर प्रदेश: आग्रा येथे संतापजनक प्रकार! माजी राष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडूवर पतीकडून हॉटेलमध्ये चाकूने प्राणघातक हल्ला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- अयोध्या: राम मंदिरात ऐतिहासिक निर्णय; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या सीईओ पदी नियुक्ती
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड
- उत्तराखंड: पूर आलेली नदी पार करताना हातातून निसटली चिमुकली, लेकीला वाचवण्यासाठी आईने पाण्यात मारली उडी अन् दोघींचाही मृत्यू
- चेन्नई: थलपती विजय भारताचे पंतप्रधानच काय, अमेरिकेचे अध्यक्षही होऊ शकतात; ई. पलानीस्वामींचा उपरोधिक टोला




























Subscribe to my channel




