जनरेटिव्ह एआय आश्चर्य आणि भीती दोन्ही निर्माणकरते. त्यात भविष्य दडलेले आहे, पण उद्या कसाअसेल? काही भाकिते विशिष्ट परिस्थितीकडे लक्षवेधतात. एआय सर्वव्यापी निगराणी, भावनिक ओळखव स्वयंचलित सामग्री निर्मितीद्वारे समाजावर नियंत्रणठेवेल. पण या चिंता बाजूला ठेवूनही हे खरे आहे कीएआय आपले जग बदलत आहे आणि पुढेही बदलतराहील. जीडीपीच्या बाबतीत एआय पाश्चात्य जगात आधीचवर्तमानाला आकार देत आहे. भारतातही त्याचीलक्षणीय उपस्थिती असेल असा अंदाज आहे.अमेरिकेत 2025 च्या पहिल्या नऊ महिन्यांत जीडीपीवाढीमध्ये एआय गुंतवणुकीचा वाटा जवळपास 40%होता. अर्न्स्ट अँड यंगच्या अंदाजानुसार कौशल्य विकासआणि शिक्षणातील गुंतवणुकीद्वारे एआय पुढील सातवर्षांत भारतीय जीडीपीमध्ये 1.2 ते 1.5 ट्रिलियनडॉलर्सचे योगदान देईल. मायक्रोसॉफ्ट, गूगल, ॲमेझॉन आणि मेटा यांनी पुढील पाच वर्षांत डेटा सेंटर्स आणि एआय-आधारित गुंतवणुकीसाठी 67.5 अब्ज डॉलर्स देण्याचे वचन दिले आहे. भारताचे स्वतःचा औद्योगिक समूह—टाटा, रिलायन्स आणि अदानी—देखील फारमागे नाहीत. अदानी पुढील 10 वर्षांत अक्षय ऊर्जेवर चालणाऱ्या, एआय-सज्ज डेटा सेंटर्समध्ये 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहेत.हे आकडे कितीही मोठे वाटत असले तरी पुढील पाच वर्षांतील अंदाजित जागतिक गुंतवणुकीच्या तुलनेत तेनगण्य ठरतात. मॅकिन्से अँड कंपनीच्या अंदाजानुसार हीगुंतवणूक 6.7 ट्रिलियन डॉलर्स असेल. बहुतेक नवीनगुंतवणूकदार स्पर्धेतून बाहेर फेकले जाण्याची शक्यताआहे. परंतु काही जण टिकून राहतील आणि उत्पादकतावाढवतील. या अकल्पनीय मोठ्या आकड्यांच्यापलीकडे, मूलभूत प्रश्न हा आहे की एआयचा सामाजिकपरिणाम काय होईल? एआयच्या प्रसारामुळे उत्पादकतेतव्यापक वाढ होईल का, की त्याचा वापर विशिष्ट उद्योगआणि समाजाच्या ठराविक वर्गांपुरता मर्यादित राहील?रोजगारक्षम कौशल्ये विकसित होतील अशा प्रकारेशिक्षणात परिवर्तन घडवण्यासाठी आपण एआयचावापर करू शकू का? की ते केवळ नोकऱ्यांची जागाघेईल? चॅटजीपीटी किंवा जेमिनी वापरणारे बहुतेक लोकएआयला एक अतिवेगवान यांत्रिक घटक म्हणूनपाहतात. ते इंटरनेट शोधांना त्वरित उत्तरे देते. सॉफ्टवेअरप्रोग्राम्स लिहिते. व्याकरण दुरुस्त करते. परीक्षणे आणिलेखही लिहिते. बहुतेक वापरकर्ते या सेवेसाठी पैसे देतनाहीत. केवळ काही गंभीर एआय वापरकर्तेच याचीसदस्यता घेतात. त्यामुळे आपण असे गृहीत धरतो की तेआपल्यासाठी आणि आपल्या समाजासाठी विनामूल्यआहे. आपल्या हे लक्षात येत नाही की या एआय प्रणालीप्रचंड प्रमाणात वीज वापरते. मोठे हार्डवेअर वापरतात.म्हणून एआयबद्दलच्या या सर्व उत्साहाच्या काळातआपण प्रश्न विचारला पाहिजे : एआय प्रदूषण कमीकरणारे व ऊर्जा वाचवणारे उपायही प्रदान करेल का?की एआयची ऊर्जेची अतृप्त भूक टंचाई आणि प्रदूषणआणखी वाढवेल? वैद्यकीय क्षेत्रात एआयचा मोठ्याप्रमाणावर वापर केला जात आहे. एलॉन मस्क यांच्यामते 2030 पर्यंत प्रगत एआय-शक्तीवर चालणारेरोबोट्स—विशेषतः टेस्लाचा ऑप्टिमस—सर्वोत्कृष्टमानवी शल्यचिकित्सकांनाही मागे टाकतील. त्यामुळेपारंपरिक वैद्यकीय शिक्षण बहुदा निरर्थक ठरेल.आशावादी लोकांचा असाही युक्तिवाद आहे की मानवीसर्जनशीलतेमुळे नवीन क्षेत्रांमध्ये रोजगार निर्माणहोतील. अलीकडील एका शोधनिबंधात टिकटॉकच्यासंशोधक शास्त्रज्ञ शुपेंग चेन यांनी युक्तिवाद केला की,एआयमुळे प्रचंड बुद्धिमत्ता येत असली तरी त्याच्यावेगाने होणारा स्वीकार लाखो उच्च-स्तरीय व्यावसायिकव्हाईट-कॉलर नोकऱ्यांना निरर्थक ठरवेल. अमेरिकेच्याअर्थव्यवस्थेतील आकडेवारीचा वापर करून चेन असायुक्तिवाद करतात की ग्राहक खर्चात व्हाईट-कॉलरकर्मचाऱ्यांचा वाटा निम्म्याहून अधिक असल्यानेएआयचा परिणाम केवळ नोकऱ्यांवरच नाही तरएआयद्वारे उत्पादित वस्तूंच्या मागणीवरही होईल. यामुळेविकासाऐवजी एक प्रकारची ‘घोस्ट इकॉनॉमी'' निर्माणहोऊ शकते. तरीही एआय खरोखरच त्याच्या वापरकर्त्यांना वाटतेतितके शक्तिशाली असेल तर त्यावर नियंत्रण ठेवण्याचेमार्ग सुचवणे व्यर्थ ठरेल. आशा ही आहे की मानवीसर्जनशीलता एआयच्या गतीशी जुळवून घेईल व त्याचेनकारात्मक परिणाम कमी करेल. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे. ) बहुतेक वापरकर्ते एआयसाठी पैसे देतनाहीत. त्यामुळे आपल्याला वाटते की तेआपल्यासाठी व आपल्या समाजासाठीमोफत आहे. आपल्याला हे लक्षात येतनाही की ही एआय प्रणाली प्रचंडप्रमाणात विजेचा वापर करते.
हे पण वाचा-
शहर
- कुर्ल्यातील दुर्घटना ठरली राजकीय आखाडा! झाड कोसळून वृद्धाच्या मृत्यूवर मुंबईच्या महापौर रितू तावडेंचा संताप; म्हणाल्या, 'ठाकरे गटाचा २५ वर्षांचा हिशेब काढू!'
- बाप रे, भामट्यांचा नवा कारनामा! चालती ई-रिक्षा ब्लूटूथने बंद करून थेट पैशांची मागणी; सायबर गुंडांचा नवा हायटेक स्कॅम उघड!
- मुंबई-गोवा महामार्गावर चाकांचा खोळंबा! वाकण ते नागोठणे दरम्यान मैलोनमैल वाहतूक कोंडी; पुराच्या पाण्यामुळे चालक-प्रवासी बेहाल!
- कोकण रेल्वेचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे मान्सूनचे वेळापत्रक कोलमडले; अनेक गाड्या तासनतास उशिराने, प्रवाशांचे प्रचंड हाल!
महाराष्ट्र
- मुंबई-गोवा महामार्गावर चाकांचा खोळंबा! वाकण ते नागोठणे दरम्यान मैलोनमैल वाहतूक कोंडी; पुराच्या पाण्यामुळे चालक-प्रवासी बेहाल!
- कोकण रेल्वेचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे मान्सूनचे वेळापत्रक कोलमडले; अनेक गाड्या तासनतास उशिराने, प्रवाशांचे प्रचंड हाल!
- ५०० रुपयांच्या दंडाचा धाक! मध्य रेल्वेवर विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठी घट; 'फुकट्या' प्रवाशांना रेल्वेचा दणका!
- सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी आधीच साजरी होणार! जुलैपासून महागाई भत्त्यात ३% वाढीची शक्यता; ८व्या वेतन आयोगाबाबतही मोठी अपडेट!
गुन्हा
- सरपंचपदासाठी काय पण! मराठा असूनही मिळवले 'पारधी' जातीचे बोगस प्रमाणपत्र; बीड जिल्हा जात पडताळणी समितीने दाखला ठरवला रद्द!
- भ्रष्टाचाराचा कुबेर! देवळाली कॅन्टोन्मेंटचे माजी सीईओ अजय कुमार यांच्यावर सीबीआयचा गुन्हा; १० वर्षांत ५२ हजारांची संपत्ती झाली थेट पाऊणेसहा कोटी!
- "जे लग्न कधी होणारच नाहीये, त्यासाठी आधार कशाला?" केतन अगरवाल हत्या प्रकरणात आरोपी सियाचे खळबळजनक व्हॉट्सॲप चॅट व्हायरल!
- उत्तर प्रदेश: पतीची हत्या करून मृतदेह बाथरुमच्या फरशीखाली गाडला; ४५ दिवस मृतदेहावरच आंघोळ केली!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- धाराशिवच्या जमिनीचा पोत खालावला! मृद आरोग्य पत्रिकेच्या अहवालात 'नत्र' कमतरतेची गंभीर नोंद; खरिपासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याचे आवाहन.
- शनीच्या दृष्टीचा राशींवर होणार परिणाम, जाणून घ्या ४ जुलै २०२६ चा दिवस कसा असेल!
- ३ जुलै २०२६ आजचे राशीभविष्य: संकष्टीच्या शुभ मुहूर्तावर या ४ राशींवर होणार बाप्पाची विशेष कृपा!
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतमालाच्या प्रक्रिया आणि साठवणूक प्रकल्पासाठी मिळणार २ कोटींपर्यंत कर्ज.
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
देश विदेश
- बाप रे, भामट्यांचा नवा कारनामा! चालती ई-रिक्षा ब्लूटूथने बंद करून थेट पैशांची मागणी; सायबर गुंडांचा नवा हायटेक स्कॅम उघड!
- इराणमध्ये युद्धाच्या छायेत सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यसंस्काराला सुरुवात! तेहरानमध्ये लाखो जनसमुदाय रस्त्यावर, डोनाल्ड ट्रम्प विरोधात संतापाचा उद्रेक!
- म्हैसूर दसऱ्याच्या 'जंबो सवारी'चा मानकरी; प्रसिद्ध 'अभिमन्यू' हत्तीचा सुळा तुटला! वन विभागाकडून उपचार सुरू
- E20 इथेनॉल मिश्रित इंधन वाहनांसाठी सुरक्षित, पण मायलेजवर होणार किंचित परिणाम; टोयोटा, बजाज, टीव्हीएस आणि सुझुकीचे मोठे स्पष्टीकरण!



























Subscribe to my channel


