नीरज कौशल यांचा कॉलम:आपल्याला एआय मोफत ‎वाटते, पण सत्य वेगळेच‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎जनरेटिव्ह एआय आश्चर्य आणि भीती दोन्ही निर्माण‎करते. त्यात भविष्य दडलेले आहे, पण उद्या कसा‎असेल? काही भाकिते विशिष्ट परिस्थितीकडे लक्ष‎वेधतात. एआय सर्वव्यापी निगराणी, भावनिक ओळख‎व स्वयंचलित सामग्री निर्मितीद्वारे समाजावर नियंत्रण‎ठेवेल. पण या चिंता बाजूला ठेवूनही हे खरे आहे की‎एआय आपले जग बदलत आहे आणि पुढेही बदलत‎राहील.‎ जीडीपीच्या बाबतीत एआय पाश्चात्य जगात आधीच‎वर्तमानाला आकार देत आहे. भारतातही त्याची‎लक्षणीय उपस्थिती असेल असा अंदाज आहे.‎अमेरिकेत 2025 च्या पहिल्या नऊ महिन्यांत जीडीपी‎वाढीमध्ये एआय गुंतवणुकीचा वाटा जवळपास 40%‎होता. अर्न्स्ट अँड यंगच्या अंदाजानुसार कौशल्य विकास‎आणि शिक्षणातील गुंतवणुकीद्वारे एआय पुढील सात‎वर्षांत भारतीय जीडीपीमध्ये 1.2 ते 1.5 ट्रिलियन‎डॉलर्सचे योगदान देईल. मायक्रोसॉफ्ट, गूगल, ॲमेझॉन ‎‎आणि मेटा यांनी पुढील पाच वर्षांत डेटा सेंटर्स आणि ‎‎एआय-आधारित गुंतवणुकीसाठी 67.5 अब्ज डॉलर्स ‎‎देण्याचे वचन दिले आहे. भारताचे स्वतःचा औद्योगिक ‎‎समूह—टाटा, रिलायन्स आणि अदानी—देखील फार‎मागे नाहीत. अदानी पुढील 10 वर्षांत अक्षय ऊर्जेवर ‎‎चालणाऱ्या, एआय-सज्ज डेटा सेंटर्समध्ये 100 अब्ज ‎‎डॉलर्सची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहेत.‎हे आकडे कितीही मोठे वाटत असले तरी पुढील पाच ‎‎वर्षांतील अंदाजित जागतिक गुंतवणुकीच्या तुलनेत ते‎नगण्य ठरतात. मॅकिन्से अँड कंपनीच्या अंदाजानुसार ही‎गुंतवणूक 6.7 ट्रिलियन डॉलर्स असेल. बहुतेक नवीन‎गुंतवणूकदार स्पर्धेतून बाहेर फेकले जाण्याची शक्यता‎आहे. परंतु काही जण टिकून राहतील आणि उत्पादकता‎वाढवतील. या अकल्पनीय मोठ्या आकड्यांच्या‎पलीकडे, मूलभूत प्रश्न हा आहे की एआयचा सामाजिक‎परिणाम काय होईल? एआयच्या प्रसारामुळे उत्पादकतेत‎व्यापक वाढ होईल का, की त्याचा वापर विशिष्ट उद्योग‎आणि समाजाच्या ठराविक वर्गांपुरता मर्यादित राहील?‎रोजगारक्षम कौशल्ये विकसित होतील अशा प्रकारे‎शिक्षणात परिवर्तन घडवण्यासाठी आपण एआयचा‎वापर करू शकू का? की ते केवळ नोकऱ्यांची जागा‎घेईल? चॅटजीपीटी किंवा जेमिनी वापरणारे बहुतेक लोक‎एआयला एक अतिवेगवान यांत्रिक घटक म्हणून‎पाहतात. ते इंटरनेट शोधांना त्वरित उत्तरे देते. सॉफ्टवेअर‎प्रोग्राम्स लिहिते. व्याकरण दुरुस्त करते. परीक्षणे आणि‎लेखही लिहिते. बहुतेक वापरकर्ते या सेवेसाठी पैसे देत‎नाहीत. केवळ काही गंभीर एआय वापरकर्तेच याची‎सदस्यता घेतात. त्यामुळे आपण असे गृहीत धरतो की ते‎आपल्यासाठी आणि आपल्या समाजासाठी विनामूल्य‎आहे. आपल्या हे लक्षात येत नाही की या एआय प्रणाली‎प्रचंड प्रमाणात वीज वापरते. मोठे हार्डवेअर वापरतात.‎म्हणून एआयबद्दलच्या या सर्व उत्साहाच्या काळात‎आपण प्रश्न विचारला पाहिजे : एआय प्रदूषण कमी‎करणारे व ऊर्जा वाचवणारे उपायही प्रदान करेल का?‎की एआयची ऊर्जेची अतृप्त भूक टंचाई आणि प्रदूषण‎आणखी वाढवेल? वैद्यकीय क्षेत्रात एआयचा मोठ्या‎प्रमाणावर वापर केला जात आहे. एलॉन मस्क यांच्या‎मते 2030 पर्यंत प्रगत एआय-शक्तीवर चालणारे‎रोबोट्स—विशेषतः टेस्लाचा ऑप्टिमस—सर्वोत्कृष्ट‎मानवी शल्यचिकित्सकांनाही मागे टाकतील. त्यामुळे‎पारंपरिक वैद्यकीय शिक्षण बहुदा निरर्थक ठरेल.‎आशावादी लोकांचा असाही युक्तिवाद आहे की मानवी‎सर्जनशीलतेमुळे नवीन क्षेत्रांमध्ये रोजगार निर्माण‎होतील. अलीकडील एका शोधनिबंधात टिकटॉकच्या‎संशोधक शास्त्रज्ञ शुपेंग चेन यांनी युक्तिवाद केला की,‎एआयमुळे प्रचंड बुद्धिमत्ता येत असली तरी त्याच्या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎वेगाने होणारा स्वीकार लाखो उच्च-स्तरीय व्यावसायिक‎व्हाईट-कॉलर नोकऱ्यांना निरर्थक ठरवेल. अमेरिकेच्या‎अर्थव्यवस्थेतील आकडेवारीचा वापर करून चेन असा‎युक्तिवाद करतात की ग्राहक खर्चात व्हाईट-कॉलर‎कर्मचाऱ्यांचा वाटा निम्म्याहून अधिक असल्याने‎एआयचा परिणाम केवळ नोकऱ्यांवरच नाही तर‎एआयद्वारे उत्पादित वस्तूंच्या मागणीवरही होईल. यामुळे‎विकासाऐवजी एक प्रकारची ‘घोस्ट इकॉनॉमी'' निर्माण‎होऊ शकते.‎ तरीही एआय खरोखरच त्याच्या वापरकर्त्यांना वाटते‎तितके शक्तिशाली असेल तर त्यावर नियंत्रण ठेवण्याचे‎मार्ग सुचवणे व्यर्थ ठरेल. आशा ही आहे की मानवी‎सर्जनशीलता एआयच्या गतीशी जुळवून घेईल व त्याचे‎नकारात्मक परिणाम कमी करेल.‎ (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे. )‎ बहुतेक वापरकर्ते एआयसाठी पैसे देत‎नाहीत. त्यामुळे आपल्याला वाटते की ते‎आपल्यासाठी व आपल्या समाजासाठी‎मोफत आहे. आपल्याला हे लक्षात येत‎नाही की ही एआय प्रणाली प्रचंड‎प्रमाणात विजेचा वापर करते.‎


शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *