
Mumbai Rain : होळी सणात राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. काल मुंबईकरांनी देखील या पावसाचा आनंद घेतला. मुंबईत काल काही उपनगरांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. तसचे काही ठिकाणी सोसाट्याचा वारा सुटला होता. काही उपनगरांमध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. काल ठाणे, कल्याण, उल्हासनगर, बदलापूर, वांगणी या उपनगरांमध्ये पाऊस पडला आहे.
सायंकाळी ५ ते ६ च्या सुमारास ठाण्यात सोसाट्याचा वारा सुटला होता. वाऱ्यामुळे शहरात सर्वत्र धूळ पसरली होती. वाहनांचा धूर आणि धूळीमुळे हवेची गुणवत्ता आणखीन खालावलेली दिसली. तसेच कल्याणमध्ये रीमझीम पावसाच्या सरी बरसल्या. यासह बदलापूरमध्ये देखील सोसाट्याचा वारा सुटला होता.
हवामान खात्याकडून येत्या काही दिवसात महाराष्ट्राच्या विविध भागात ढगाळ वातावरण तसेच अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवलाय.आज राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी लागली. दुपारी चारनंतर अचानक सोसाट्याच्या वारा सुटला होता .वाऱ्यासोबत धूळ ही हवेत उडाल्याने कल्याण डोंबिवलीत धुळीचं साम्राज्य पाहायला मिळालं तर मध्य रात्रीच्या सुमारास अचानक विजेच्या कडकडाटासह रिमझिम पावसाने हजेरी लावली होती.अचानक कोसलेलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रात्रीपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात कुठे हलका तर कुठे मोठा पाऊस पडत आहे. यात रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पैठण, गंगापूर तालुक्यात काही ठिकाणी गारपीट झाली आहे. त्यामुळे गहू, ज्वारी, हरभरा, उन्हाळी बाजरी, कांदाचे मोठे नुकसान होत आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. वादळवारा आणि विजेच्या कडकडाटात मुसळधार पाऊस आणि गारा पडल्याने शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. पारनेर तालुक्यातील बहिरोबावाडी परिसरात आज जोरदार गारपीट झाली असून या अवकाळी पावसामुळे गहू कांदा हरभरा या पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अस्मानी संकटाने हिरावून नेला आहे. तसेच नगर जिल्ह्यातील नगर तालुका परिसरातही जोरदार वारा आणि पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता या नुकसानी बाबतचे पंचनामे लवकरात लवकर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा शेतकरी वर्गाने केली आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




