
कर्नाटक सरकारने सांगलीतील जत तालुक्यामधील ४० गावांवर दावा सांगण्याची तयारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता राज्यात वातावारण तापलं असून राजकीय नेते व्यक्त होत आहेत. खासदार संजय राऊत यांनीही संताप व्यक्त केला असून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रात अत्यंत दुबळं, हतबल सरकार असल्यानेच महाराष्ट्र-कर्नाटक वाद निर्माण होत आहे. महाराष्ट्रात जे सरकार आलं आहे त्यामुळे अनेक राजकीय दरोडेखोरांना आपण महाराष्ट्राचे लचके तोडू शकतो असं वाटत आहे अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
“त्यांना महाराष्ट्र माहित नाही, महाराष्ट्र समजलेला नाही. मुख्यमंत्र्यांनी सीमाभागातील कोणत्या प्रश्नांना वाचा फोडली आहे? गेली अनेक वर्षं ते या खात्याचे मंत्री आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री, पंतप्रधानांशी चर्चा करु असं त्यांनी परवा जाहीर केलं होतं, आणि लगेच कर्नाटकच्या मुख्यमंत्री सांगतीलील जत तालुक्यावर दावा सांगितला आहे,” असं संजय राऊत म्हणाले.
“कर्नाटकात भाजपाचं सरकार आहे. महाराष्ट्रातही भाजपाच्या नेतृत्वाखाली एक मिंधे सरकार आहे. कोणाला मुंबई तोडायची आहे, तर कोणाला महाराष्ट्रातील गावं आणि जिल्हे तोडायची आहेत. अशारितीने महाराष्ट्र कुरतडण्याचं काम गेल्या साडे तीन महिन्यांपासून जोरात सुरु आहे. हे आमचे मुख्यमंत्री त्यांच्या ४० आमदारांना घेऊन गुवाहाटीला निघाले आहेत. तेथून परतल्यानंतर आसामच्या मुख्यमंत्र्यांनीही महाराष्ट्रातील एखाद्या जिल्ह्यावर दावा सांगितला नाही म्हणजे मिळवलं,” असा टोला संजय राऊतांनी लगावला.
“महाराष्ट्रात जे सरकार आलं आहे, त्यामुळे अनेक राजकीय दरोडेखोरांना आपण महाराष्ट्राचे लचके तोडू शकतो असं वाटत आहे. राज्यपाल, भाजपाच्या प्रवक्त्यांकडून शिवाजीमहाराजांचा अपमान होत आहे. त्यावर मुख्यमंत्री काही बोलण्यास तयार नाहीत आणि उपमुख्यमंत्री समर्थन करतात,” अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
“कर्नाटकचे मुख्यमंत्री बेळगावसह सीमाभाग राहिला बाजूला आणि कोल्हापूरपासून पुढे जात आता थेट सांगलीतल्या तालुक्यांवर दाला करण्यास सुरुवात केली आहे. हे सरकार लवकरात लवकर घालवलं नाही तर महाराष्ट्राचे पाच तुकडे केल्याशिवाय केंद्र सरकार आणि त्यांचे राज्यातील हस्तक राहणार नाहीत,” असा इशारा राऊतांनी दिला आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोमवारी सीमाप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी वकिलांची एक समिती गठित केल्याची घोषणा केली. “सीमाप्रश्न हा महाराष्ट्र आणि तिथल्या राजकीय पक्षांसाठी राजकारणाचा विषय झाला आहे. पण त्यांना यात अजूनपर्यंत यश मिळालेलं नाही. भविष्यातही ते मिळणार नाही. आपण कर्नाटकच्या सीमेचं संरक्षण करण्यासाठी समर्थ आहोत. त्यानुसार पावलंदेखील उचलण्यात आली आहेत. राज्य पुनर्रचना कायद्यामध्ये बदल करण्याचा कुणालाही अधिकार नाही”, असं बोम्मई म्हणाले आहेत.
शहर
- कंत्राटी भरतीला मोठा धक्का! 'आउटसोर्सिंग'वरून हिमाचल उच्च न्यायालय आक्रमक, वरिष्ठ सचिवांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश
- कचरा वर्गीकरणासाठी BMC चा मोठा निर्णय; ओला, सुका, सॅनिटरी आणि स्पेशल केअर कचरा आता होणार वेगळा!
- हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा; विदर्भ-मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता, शेतकरी चिंतेत.
- वांद्रे गरीबनगरात पश्चिम रेल्वेचा 'बुलडोझर'; तणावपूर्ण शांततेत ४०० हून अधिक अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त!
महाराष्ट्र
- कंत्राटी भरतीला मोठा धक्का! 'आउटसोर्सिंग'वरून हिमाचल उच्च न्यायालय आक्रमक, वरिष्ठ सचिवांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश
- कचरा वर्गीकरणासाठी BMC चा मोठा निर्णय; ओला, सुका, सॅनिटरी आणि स्पेशल केअर कचरा आता होणार वेगळा!
- हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा; विदर्भ-मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता, शेतकरी चिंतेत.
- वांद्रे गरीबनगरात पश्चिम रेल्वेचा 'बुलडोझर'; तणावपूर्ण शांततेत ४०० हून अधिक अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त!
गुन्हा
- अमरावतीत लग्नमंडपात थरार! डीजेवर नाचण्याच्या वादातून स्टेजवरच नवरदेवावर सपासप वार; ड्रोन कॅमेऱ्याने २ किमी केला हल्लेखोराचा पाठलाग!
- नागपुरात मोठा खुलासा! संघ मुख्यालयाची रेकी करण्यासाठी 'केशर व्यापारी' बनून आला होता दहशतवादी रईस! अंधारात कट, कोर्टात साक्ष!
- इचलकरंजीत दारू पार्टीत रक्ताचा खेळ! सराईत गुन्हेगाराने महापालिका सफाई कर्मचाऱ्याच्या डोक्यात ४ दगड घालून केला खून!
- पाटण्यात भयंकर कृत्य! घटस्फोटाचा राग अन् पैशांची हाव; नराधम पतीने दोन चिमुरड्यांसह सासरच्या ५ जणांना पेट्रोल ओतून पेटवले!
राजकीय
- "देशात आर्थिक संकट, अन् मोदी इटलीत चॉकलेट वाटतायेत!" राहुल गांधींचा 'त्या' मेलोडी व्हिडिओवरून थेट हल्लाबोल
- "शेतकऱ्यांची दिशाभूल थांबवा!" शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून महाडिक विरुद्ध विरोधी पक्ष आमनेसामने.
- नगरमध्ये राजकीय आखाडा पेटला! अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी पक्षांची मोर्चेबांधणी सुरू!
- "माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परत येईन"; शेख हसीना यांचा बांगलादेशच्या अंतरिम सरकारला थेट इशारा
इतर
- 'लाडकी बहीण' योजनेबाबत मोठा संभ्रम! ई-केवायसी मुदतवाढीचा फेक व्हिडिओ व्हायरल; सरकारी कार्यालयात महिलांची प्रचंड गर्दी!
- फॅटी लिव्हरचा धोका! शरीरात दिसणारे 'हे' सुरुवातीचे संकेत ओळखा; लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी खा हे अन्न!
- बुलडाणा जिल्ह्यात पाणीटंचाईवर मात! २० गावांमध्ये १२७ 'रिचार्ज शाफ्ट' कामांना मंजुरी; भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय!
- केवायसी (KYC) अपडेट बंधनकारक! लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई.
मनोरंजन
- अभिनेते अंशुमन विचारे यांनी घेतलं तिसरं हक्काचं घर! नव्या घरात केली गणेशपूजा; लाडक्या लेकीने बनवली इवलीशी चूल, पत्नीने शेअर केला गोड व्हिडिओ!
- भारतीय संघात मोठे बदल! जडेजाला विश्रांती की डच्चू? पंतचे उपकर्णधारपद जाण्यामागचे कारण सांगत अजित आगरकरांनी केला खुलासा!
- टीम इंडियात मोठे फेरबदल! पंतचे उपकर्णधारपद गेले; ४ नव्या दमाच्या खेळाडूंना संधी, पाहा संपूर्ण संघ.
- 'कुसुम मनोहर लेले'नंतर सुकन्या मोने आणि डॉ. गिरीश ओक पुन्हा एकत्र; रंगभूमीवर येणार नवे नाटक!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ३०० किमी अंतरावर अचूक वेध! पुण्याच्या कंपनीने बनवलेल्या 'सूर्यास्त्र' रॉकेटची यशस्वी चाचणी!
- व्यापार तूट कमी करण्यासाठी केंद्र सरकारचा मास्टरप्लॅन! अनावश्यक विदेशी वस्तूंच्या आयातीवर बंदी किंवा मोठा कर लावण्याची तयारी!
- परराष्ट्र वर्तुळातून अत्यंत दुर्दैवी बातमी! बांगलादेशमधील भारतीय दूतावासात असिस्टंट प्रोटोकॉल ऑफिसर नरेन धर यांचं निधन.
- नोकरदारांसाठी गूड न्यूज! आता UPI द्वारे होणार PF ट्रान्सफर; 'EPFO 3.0' मध्ये २४ तास व्हॉट्सॲप सेवा सुरू.

























Subscribe to my channel




