अनिल चोपडा यांचा कॉलम:युद्धाच्या नियमांना आपण‎ नव्याने परिभाषित केले आहे

6-7 मे 2025 च्या रात्री भारताने ऑपरेशन सिंदूर लाँच‎केले होते. ही 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम‎दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल राबवलेली एक‎सुनियोजित व कालबद्ध लष्करी मोहीम होती. त्यानंतर‎पुढील 88 तासांत जे काही घडले, ते भारताच्या नव्या व‎पूर्णपणे विकसित धोरणात्मक सिद्धांताचे प्रदर्शन होते :‎एक असा सिद्धांत, ज्याला स्पष्ट उद्दिष्ट, तांत्रिक‎आत्मनिर्भरता, राजकीय इच्छाशक्ती आणि राष्ट्राची‎एकजूटता याद्वारे परिभाषित केले जाऊ शकते.‎ ऑपरेशन सिंदूरने अण्वस्त्रांनी सज्ज असलेल्या‎शेजारी देशांमधील लष्करी संघर्षाचे नियम नव्याने‎लिहिले आणि एक असा आदर्श प्रस्थापित केला, जो ‎‎आगामी अनेक दशकांपर्यंत दक्षिण आशियाच्या सुरक्षेची ‎‎दिशा ठरवेल. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पहिल्यांदाच ‎‎भारताने अशा एका शत्रूविरुद्ध लढा दिला आणि विजय ‎‎मिळवला, जो प्रत्यक्षात एकाच आघाडीवर दोन‎देशांच्या- पाकिस्तान आणि चीनच्या संयुक्त ताकदीच्या ‎‎रूपात समोर आला होता. चीनने तसे तर स्वतःला या‎प्रकरणापासून दूर ठेवले, पण त्याने पाकिस्तानला सक्रिय‎उपग्रह गुप्तचर माहिती, इलेक्ट्रॉनिक युद्धात मदत, सायबर‎मदत आणि पीएल-15 सारख्या दृष्टी-मर्यादेपलीकडी ल‎(बीव्हीआर) क्षेपणास्त्रांसह आघाडीवरील लष्करी‎साधनसामग्री उपलब्ध करून दिली होती. आधुनिक‎संघर्षांचे एक प्रमुख अपयश- रशिया-युक्रेन युद्धाच्या 5‎वर्षे प्रदीर्घ संघर्षापासून ते पश्चिम आशियातील सध्याच्या‎युद्ध क्षेत्रापर्यंत- हे राहिले आहे की यामध्ये बाहेर‎पडण्याची कोणतीही रणनीती नसते. अशा मोहिमा,‎ज्यांचा कोणताही निश्चित शेवट नसतो, त्या‎अर्थव्यवस्थांना कमकुवत करतात, जनतेचे मनोधैर्य‎खचवतात आणि विजयही मिळवून देत नाहीत व‎शांतताही प्रस्थापित करत नाहीत. ऑपरेशन सिंदूरने‎जाणीवपूर्वक या जाळ्यातून स्वतःला वाचवले. त्याने ते‎करून दाखवले जे फार कमी आधुनिक सैन्य करू‎शकतात : पहिले क्षेपणास्त्र डागण्यापूर्वीच यशाची‎व्याख्या निश्चित करणे. भारत या मोहिमेत आपल्या‎उद्दिष्टाबाबत पूर्णपणे स्पष्ट होता : दहशतवादी पायाभूत‎सुविधा आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांना संपवणे आणि‎स्वतःच्या अटींवर बाहेर पडणे- ज्यामध्ये कोणत्याही‎बाजूच्या सामान्य नागरिकांना कोणतेही नुकसान होऊ‎नये. राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांनी पुरेशा गुप्तचर माहितीच्या‎आधारे 9 उद्दिष्टे निश्चित केली होती. यापैकी प्रत्येकाला‎लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल‎मुजाहिद्दीनची दहशतवादी इको-सिस्टिम टिकवून‎ठेवण्यात त्यांच्या विशिष्ट भूमिकेसाठी निवडले गेले होते.‎पहिला हल्ला केवळ 23 मिनिटांत पूर्ण करण्यात आला.‎संपूर्ण मोहीम 88 तासांच्या आत संपली.‎ हा सिद्धांत- म्हणजेच एका उद्दिष्टासह प्रवेश करणे,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎अचूकतेसह कार्य करणे आणि कोणत्याही‎अतिरेकाशिवाय बाहेर पडणे- नियंत्रित युद्धाची अशी एक‎शैली आहे, जिचे प्रदर्शन आधुनिक लष्करी इतिहासात‎दुर्मिळच पाहायला मिळते. ऑपरेशन सिंदूरच्या‎भौगोलिक व्याप्तीनेही मागील सीमा मोडल्या. भारताने‎आपले सुरुवातीचे हल्ले केवळ पीओकेपुरते मर्यादित‎ठेवले नाहीत, तर तो पाकिस्तानचा मुख्य भूभाग‎असलेल्या पंजाबच्याही खूप आतपर्यंत पोहोचला.‎भारतीय सीमेपासून 140 किलोमीटरहून अधिक अंतरावर‎अत्यंत अचूक हल्ले करण्यात आले. संदेश स्पष्ट होता :‎कोणतेही ठिकाण आमच्या आवाक्याबाहेर नाही.‎ सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ऑपरेशन सिंदूरने अण्वस्त्र‎ब्लॅकमेलचा पर्दाफाश केला. तर अनेक दशकांपासून‎पाकिस्तानच्या अण्वस्त्र छत्राचा वापर राज्य-पुरस्कृत‎दहशतवादाला सूट देण्यासाठी केला जात होता.‎(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे)‎ आपले काम अजून संपलेले नाही. संरक्षण‎ बजेटमध्ये टप्प्याटप्प्याने जीडीपीच्या 3 ‎टक्क्यांपर्यंत वाढ करावी लागेल.‎ऑपरेशन सिंदूरमधून झालेले फायदे‎ कधीही कमी होऊ न देणे हे सुनिश्चित‎ करण्यात धोरणात्मक अनिवार्यता आहे.‎‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *