ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा अनपेक्षित पाऊल उचललेआहे. बंगालच्या पराभूत मुख्यमंत्र्यांनी आपण राजीनामादेणार नसल्याची घोषणा केली आहे. निवडणुकीत मतांचीलूट झाली आणि मतदार याद्यांमधून आपल्या समर्थकांचीनावे वगळण्यात आली, असा त्यांचा आरोप आहे. परंतुसध्याच्या परिस्थितीत सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे त्याइंडिया आघाडीसाठी काम करतील, हे त्यांचे विधान आहे.तर भूतकाळात या आघाडीसोबतचे त्यांचे संबंध डळमळीतराहिले आहेत. एखाद्या लोकप्रिय आणि शक्तिशालीनेत्याच्या पराभवाचा क्षण नेहमीच अतिशय आवेगपूर्णअसतो. 1977 मध्ये जेव्हा सार्वत्रिक निवडणुकांचे निकालयेत होते, तेव्हा निराश झालेल्या इंदिरा गांधींनी त्यांच्यामैत्रीण पुपुल जयकर यांना म्हटले होते- ‘पुपुल, मी हरले.’दोन्ही महिला एकमेकींसोबत शांतपणे बसून राहिल्या. काहीमिनिटांतच त्या वेळच्या जगातील सर्वात शक्तिशालीमहिलांपैकी एक अचानक असुरक्षित झाली होती. बाहेरवाजणारे ढोल-ताशे आता त्यांचे कौतुक करत नव्हते, तरत्यांच्या निरोपाचा उत्सव साजरा करत होते. तर 1977 च्याया निवडणुका स्वतः इंदिरा गांधींनीच तेव्हा आयोजित केल्याहोत्या, जेव्हा देशात अजूनही आणीबाणी लागू होती. उत्तरभारतात त्यांच्या पक्षाचा सुपडा साफ झाला, इतकेच कायतर त्या स्वतःची जागाही हरल्या. प्रस्थापित परंपरेनुसार,इंदिरा यांनी राजीनाम्याची घोषणा केली आणि त्यानंतरतत्कालीन प्रभारी राष्ट्रपती बसप्पा दानप्पा जट्टी यांच्याकडेराजीनामा सुपूर्द करण्यासाठी पोहोचल्या. मात्र त्यांनी पर्यायीव्यवस्था होईपर्यंत त्यांना पदावर राहण्याची विनंती केली.माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांनी एकदा म्हटले होतेकी, भारताच्या लोकशाहीच्या असामान्य दृढतेचे एक कारणहेदेखील आहे की निवडणुकांनंतर ती एका सरकारमधूनदुसऱ्या सरकारमध्ये शांततापूर्ण आणि हिंसा किंवाविरोधाविना सुरळीतपणे संक्रमण करू शकते. गुजराल1996 कडे लक्ष वेधत होते. तेव्हा नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सार्वत्रिक निवडणूक हरली होतीआणि वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकारस्थापन झाले होते. पण तेदेखील अवघ्या 13 दिवसांतकोसळले, कारण ते बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरलेहोते. यानंतर देवेगौडा यांच्या नेतृत्वाखाली संयुक्तआघाडीचे सरकार स्थापन झाले. संसदेत नाट्यमयघडामोडी पाहायला मिळाल्या आणि सत्तेच्या वर्तुळात पडद्यामागे हालचाली सुरू राहिल्या. पण या सगळ्यानंतरही सत्तांतर शांततापूर्ण आणि सुरळीतपणेच झाले. पण असे पहिल्यांदाच घडत आहे जेव्हा एखाद्या मुख्यमंत्र्यानेनिवडणूक हरल्यानंतर पद सोडण्यास नकार दिला आहे.यामुळे एक गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झाली आहे. बंगाल विधानसभेचा कार्यकाळ आज संपुष्टात येत आहे. याचदिवशी मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळही संपुष्टात येईल आणि कायदेशीर तसेच घटनात्मक तज्ज्ञांचे मत आहे की त्यांनापद सोडावे लागेल. जर त्यांनी तसे केले नाही, तर राज्यपाल त्यांना बडतर्फ करू शकतात आणि विजयी पक्षाच्यानेत्याला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करूशकतात. इंदिरा गांधींच्या उलट- ज्यांनी त्वरित राजीनाम्याची घोषणा केली होती आणि नंतर जनता सरकारच्या विरोधात पुनरागमनाची लढाई लढण्यात मग्न झाल्या होत्या- ममतायांनी लगेचच आक्रमक भूमिका घेण्याचा पर्याय निवडला आहे. असे नाही की एसआयआर प्रक्रिया राबवण्याच्या पद्धतीवर त्यांचा आक्षेप पूर्णपणे निराधार आहे. घाईघाईत हेपार पाडले गेले आणि त्यामुळे सुमारे 27 लाख मतदारमतदान करू शकले नाहीत, कारण त्यांच्या प्रकरणांचानिपटारा होऊ शकला नव्हता. सर्वोच्च न्यायालयाने त्यांनासांगितले की ते पुढच्या वेळी मतदान करू शकतात. हे उघडआहे की या संपूर्ण प्रक्रियेला अधिक चांगल्या प्रकारेहाताळले जाऊ शकले असते. पण राजीनामा न देऊन ममतायांनी दूरदृष्टी दाखवली आहे की नाही, हे तर काळचठरवेल. हे असे पाऊल आहे, ज्याचे दूरगामी परिणाम होऊशकतात. हे एक अनावश्यक उदाहरण प्रस्थापित करते,कारण यानंतर भविष्यात इतर मुख्यमंत्री (आणि शक्यतोपंतप्रधानही) सहजपणे आपल्या उत्तराधिकाऱ्यासाठी रस्तामोकळा करण्यास नकार देऊ शकतात. भारतासारख्याविशाल देशात निवडणूक प्रक्रियेच्या पावित्र्यावर सातत्यानेप्रश्न उपस्थित होत राहतात आणि जवळजवळ प्रत्येकनिवडणुकीत मतचोरीचे आरोप कोणत्या ना कोणत्यास्वरूपात समोर येत राहतात. पण याच्या विरोधात इतरउपायही उपलब्ध आहेत. 1971 मध्ये राज नारायण यांनी तेव्हा इंदिरा गांधींच्याविजयाला आव्हान दिले होते, जेव्हा त्या त्यांच्या शिखरावरहोत्या. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाने त्यांनानिवडणूक अनियमिततेसाठी दोषी ठरवले होते आणि यालाउत्तर म्हणून इंदिरा यांनी आणीबाणी लागू केली होती.महत्त्वाचे हे आहे की 1971 ते 1975 पर्यंत निर्णय येण्यासाठीचार वर्षे लागली होती. आज विविध संस्थांमधील समतोलआधीच प्रचंड दबावाखाली आहे. देशात वाढती आणि तीव्रहोत चाललेली ध्रुवीकरणाची प्रवृत्ती- जी पश्चिम बंगालनिवडणुकांदरम्यान पुन्हा एकदा समोर आली- यावरआणखी ताण टाकणारी आहे. ममता यांना चांगल्या प्रकारेमाहीत आहे की त्या मुख्यमंत्रिपदी राहू शकत नाहीत. परंतुत्यांनी स्पष्टतः राजकीय कारणांमुळे हे पाऊल उचललेआहे. त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मनोधैर्य टिकवूनठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, जे अशा पराभवानंतरस्वाभाविकपणे खचू शकते. कार्यकर्त्यांचे राज्य हीचतृणमूलची ओळख आहे. 2011 मध्ये जेव्हा त्या सत्तेतआल्या, तेव्हापासून ही एक समांतर व्यवस्था म्हणून कामकरत आहे. पण या वेळी भाजपने या रचनेत खिंडार पाडलेआहे. अशा स्थितीत ममता आपल्या समर्थकांना संदेश देतआहेत की त्या इतक्या सहजपणे हार मानणाऱ्या नाहीतआणि पुनरागमन करतील. बंगालचा जनादेश स्वीकार नकरता, त्या स्वतःला भविष्यातील राजकीय लढायांसाठीपुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत. जर ममता चौथ्यांदाही जिंकल्या असत्या तर त्या इंडियाआघाडीच्या नेतृत्वाच्या स्वाभाविक दावेदार ठरल्याअसत्या. पण पराभवातही त्या स्वतःला एका प्रमुख भूमिकेतपाहू इच्छित आहेत- एका हरलेल्या नेत्याच्या रूपात नाही,तर अशा पीडितेच्या रूपात जिच्यावर अन्याय झाला आहे.जरी काँग्रेसने केरळमध्ये विजय मिळवला असला तरी,त्यांना माहीत आहे की 2027-28 मध्ये होणाऱ्यानिवडणुकांमध्ये त्यांच्यासमोर मोठी आव्हाने आहेत. राहुलगांधी यांनी ज्याप्रकारे शेवटच्या क्षणी ममता बॅनर्जी यांनासमर्थन देण्याचे आवाहन केले, तेदेखील याच संदर्भातपाहिले जावे. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे) स्पष्टपणे राजकीय कारणांमुळेउचललेले पाऊल...ममता यांना माहीत आहे की त्यामुख्यमंत्रिपदी राहू शकत नाहीत. परंतुत्यांनी स्पष्टपणे राजकीय कारणांमुळे हेपाऊल उचलले आहे. त्या पक्षाच्याकार्यकर्त्यांचे मनोधैर्य टिकवून ठेवण्याचाप्रयत्न करत आहेत, जे अशा पराभवानंतरस्वाभाविकपणे खचू शकते. कार्यकर्ते हाचतृणमूलचा कणा आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel




