पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:युद्ध धर्मरक्षणासाठीच व्हावे

सध्या युद्धाची जी दृश्ये समोर येत आहेत, ती पाहून कबीरांचा एक दोहा आठवतो- ‘चींटी चावल ले चली बीच में मिल गई दाल, कहत कबीर दो न मिले एक ले दूजी डाल।’ एक मुंगी तांदळाचा दाणा घेऊन चालली होती. वाटेत तिला डाळ दिसली. तिने विचार केला की डाळही सोबत न्यावी, पण तोंडात आधीच तांदूळ असेल तर डाळ कशी पकडणार? दोन्ही घेण्याच्या प्रयत्नात हातातला तांदूळही गेला. ‘दोन एकाच वेळी मिळणार नाहीत, एक घे आणि दुसरे सोडून दे’-असा संदेश कबीर देऊ इच्छितात. आज हे समजून घेण्याची गरज आहे. कोणताही विचार न करता, केवळ स्वार्थाच्या इच्छेने आणि अहंकारात बुडून युद्ध सुरू झाले. आता ते इतके गुंतागुंतीचे झाले आहे की, सर्वजण मध्यस्थ शोधत आहेत. पण परिस्थिती अशी की, ‘आंधळ्याच्या खांद्यावर पांगळा’ बसला आहे. जेव्हा मध्यस्थीची वेळ येते तेव्हा त्याची निवड तरी योग्य असावी. इतिहासात केवळ तीनच लोकांनी प्रभावी मध्यस्थी केली होती. हनुमान, अंगद व श्रीकृष्ण. त्यांच्यासमोर रावण आणि दुर्योधन होते. या तिघांनीही एकच गोष्ट सांगितली होती- युद्ध हा नेहमी शेवटचा पर्याय असावा, परंतु जर युद्ध अटळ असेलच, तर ते केवळ धर्माच्या रक्षणासाठीच व्हायला हवे.

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *