टी20 वर्ल्डकप विजयाचा आणखी एक योग 43 वर्षांनी जुळून आला, झिम्बाब्वेचं जिंकणं टीम इंडियासाठी लकी!Image Credit source: PTI
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत टीम इंडिया प्रबळ दावेदार आहे. त्याला कारण तसंच आहे. गेल्या काही वर्षात व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये टीम इंडियाची कामगिरी चांगली राहिली आहे. त्यामुळे सलग टी20 वर्ल्डकप जिंकण्याची संधी टीम इंडियाकडे आहे. आता काही योग देखील जुळून आले आहेत. त्यामुळे टीम इंडियाचे चाहते खूश झाले आहेत. हे काही तज्ज्ञ किंवा भारतीय चाहत्यांचं मत नाही, तर तसा योगच दिसत आहे. याचं कारण ठरला आहे ते झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियावर मिळवलेला विजय.. झिम्बाब्वेने गट ब मध्ये ऑस्ट्रेलियाला 23 धावांनी धोबीपछाड दिला आहे. त्यामुळे सुपर 8 फेरीचं ऑस्ट्रेलियाचं गणित चुकलं आहे. तर झिम्बाब्वे सुपर 8 फेरीत जागा मिळवेल अशी स्थिती आहे. या गटाशी टीम इंडियाचं काही देणं घेणं नाही. पण योग विजयाचं गणित जुळवून जात आहे.
क्रिकेट वर्ल्डकपच्या इतिहासात झिम्बाब्वेने तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली आहे. जेव्हा झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं तेव्हा भारताने जेतेपदाची चव चाखली आहे. सर्वात पहिल्यांदा हा योग 1983 साली म्हणजेच 43 वर्षांपूर्वी जुळून आला होता. तेव्हा झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं होतं आणि भारताचे पहिल्यांदा वनडे वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर झिम्बाब्वेने 2007 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला मात दिली होती. तेव्हा भारताने जेतेपद मिळवलं होतं. आता 19 वर्षानंतर झिम्बाब्वेने पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पराभूत केलं आहे. त्यामुळे यंदाही भारत जेतेपद मिळवेल असं भाकीत काही क्रीडाप्रेमी वर्तवत आहेत.
खरं तर योग वगैरे जेतेपदाचं गणित काही सोडवत नाही. पण त्याची चर्चा होत असते. जेतेपदासाठी चांगल्या कामगिरीची गरज असते. मग योग जुळून यावा की नाही यावर काही ठरत नाही. भारताने या स्पर्धेत जबरदस्त सुरूवात केली आहे. पहिल्या सामन्यात अमेरिकेला, दुसऱ्या सामन्या नामिबियाला पराभूत केलं आहे. आता भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. या सामन्यात विजय मिळवला तर सुपर 8 फेरीचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यानंतर सुपर 8 फेरीत तगडे संघ असून खरा कस लागणार आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




