रविवारच्या एका शांत सकाळची कल्पना करा. आकाशात ढग दाटून आले आहेत, खिडकीवर हलकीशी पावसाची सर पडत आहे आणि हवामान अगदी आल्हाददायक आहे. कोणतीही घाई नाही, तयार होण्याचे कोणतेही दडपण नाही आणि ऑफिसलाही जायचे नाही. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत शांतपणे बसला आहात- एका हातात चहा, दुसऱ्या हातात सकाळचे वर्तमानपत्र. तेवढ्यात थंड हवेची एक झुळूक तुमच्या गालाला स्पर्श करते आणि तुम्ही दोघेही डोळे मिटून घेता. कोणत्याही पूर्वनियोजनाविना तुम्ही एका पूर्ण शांततेच्या अवस्थेत पोहोचता. जग जणू दिसेनासे होते. तुमचा चहा थंड होत आहे, पण तुम्हाला त्याची पर्वा नाही. तुम्ही पूर्णपणे समाधानी आहात. जेव्हा शेवटी तुम्ही तुमचे डोळे उघडता तेव्हा तुमच्यापैकी एक जण हळूच म्हणतो, ‘काय उत्तम रविवार आहे’. दुसरा फक्त होकारार्थी मान हलवतो. आपण आपले संपूर्ण आयुष्य नेमक्या याच अनुभूतीच्या शोधात घालवतो. पण तो क्षण इतका परिपूर्ण का होता? असे यासाठी नव्हते की तुमच्या घराचे कर्ज फिटले होते किंवा नुकताच तुमचा पगार बँक खात्यात जमा झाला होता. हे यासाठीही नव्हते की तो वीकेंड होता. तो क्षण यासाठी परिपूर्ण होता. कारण काही निवांत मिनिटांसाठी तुमचे लक्ष केवळ एकाच गोष्टीवर केंद्रित होते- तुमचा श्वास. स्वतःचा वेग मंदावून तुम्ही तुमच्या मेंदूला त्याच्या ‘फाइट-ऑर-फ्लाइट’ मोडमधून बाहेर काढले होते आणि तुमच्या पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टिमला- शरीराच्या स्वाभाविक ‘रेस्ट-अँड-डायजेस्ट’ प्रतिसादाला सक्रिय केले होते. तुम्ही तुमच्या मेंदूला असा संकेत दिला की तुम्ही सुरक्षित आहात, ज्यामुळे वर्षानुवर्षे साचलेला ताण वितळू लागला.याला स्थिरतेचे विज्ञान म्हणतात. त्या काही शांत मिनिटांमध्ये तुमच्या शरीराच्या आत एक अद्भुत जैविक बदल झाला होता. तुमच्या हृदयाची गती मंदावली होती. रक्तदाब कमी झाला होता. तणावाचे प्रमुख संप्रेरक कॉर्टिसोल वेगाने कमी झाले होते. मेंदूचे भावनिक फिअर-सेंटर अमिग्डाला शांत झाले होते, तर तर्कसंगत विचार आणि भावनिक संतुलनावर नियंत्रण ठेवणारा प्री-फ्रंटल कॉर्टेक्स सक्रिय झाला होता. आपले पूर्वज ही अवस्था दररोज साधत असत आणि याला ते ध्यान म्हणायचे. आजचे आधुनिक शास्त्रज्ञ याला ‘पीक जेन’ म्हणतात- सखोल रिलॅक्सेशन, मानसिक स्पष्टता आणि भावनिक संतुलनाची सर्वोच्च अवस्था. शेवटी ‘पीक जेन’ किंवा ध्यान म्हणजे काय? हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील भूलतज्ज्ञ प्राध्यापक डॉ. बाला सुब्रमण्यम- ज्यांचे काम प्राचीन ध्यान-विज्ञान आणि आधुनिक वैद्यकशास्त्राची सांगड घालते- याबद्दल सोप्या शब्दांत सांगतात : ‘ध्यानाचे ध्येय अशा अवस्थेत पोहोचणे हे आहे, जिथे तुम्ही तुमच्या विचारांना येता-जाताना पाहता, पण त्यांच्यात अडकत नाही.’ ध्यानाचा अर्थ मनाला जबरदस्तीने रिकामे करणे असा नाही. याचा अर्थ आपल्या मानसिक उलथापालथीमध्ये सहभागी न होता त्याचे तटस्थ साक्षीदार बनणे हा आहे. जेव्हा तुम्ही शांत बसता तेव्हा तुमचे मन मंदावू लागते. यातून एका अशा प्रक्रियेला सुरुवात होते, ज्याला शास्त्रज्ञ ‘टाइम-डायलेशन’ म्हणतात. हे अगदी त्याच ‘फ्लो-स्टेट’सारखे आहे, ज्याचा अनुभव सर्वोच्च स्तरावरील खेळाडू घेतात. विश्वचषकातील जगातील सर्वोत्तम फुटबॉल खेळाडूंची कल्पना करा. चेंडू गोलपोस्टच्या आत पोहोचवण्याआधीच्या एका क्षणी प्रेक्षकांनी खचाखच भरलेले स्टेडियम त्यांच्यासाठी जणू पूर्णपणे अदृश्य होते. गोंधळ संपुष्टात येतो. वेळ जणू विस्तारू लागते. त्यांना बचाव फळीमध्ये एक छोटीशी मोकळी जागा दिसते आणि ते शॉट मारतात. ध्यानदेखील तुम्हाला थेट तशाच हायपर-फोकस्ड स्पष्टतेच्या अवस्थेत घेऊन जाते, जिथे बाह्य जगाचा गोंधळ मंदावतो, जेणेकरून तुम्ही तुमच्या आंतरिक प्रज्ञेपर्यंत पोहोचू शकाल. म्हणूनच स्थिरता हा उत्पादकतेचा सर्वात प्रभावी उपाय आहे. मनात सुरू असलेला गोंधळ शांत करण्याचा दैनंदिन सराव मेंदूच्या नैसर्गिक न्यूरोप्लास्टिसिटीचा वापर करत तुमच्या न्यूरल-पाथवेजला पूर्णपणे आनंदासाठी री-वायर करून टाकतो. तुमच्या मनासाठी हे स्मरणशक्ती तीक्ष्ण करते, सखोल एकाग्रता वाढवते आणि रोजच्या निराशेचा सामना करण्यासाठी तुम्हाला मनोवैज्ञानिकदृष्ट्या मजबूत बनवते. तुमच्या शरीरासाठी हे दीर्घकालीन इन्फ्लमेशन कमी करते, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनवते आणि झोपेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा घडवून आणते. फंडा असा आहे की, ध्यान वास्तवात तुमचा वेळ घेत नाही, तर ते तुमच्यासाठी वेळ वाचवते. हे मनात सतत सुरू असणारा गोंधळ शांत करते, ज्यामुळे तुम्ही अधिक सजग, अधिक शांत आणि पूर्णपणे वर्तमानात उपस्थित राहता. दररोज संडेवाली फिलिंग अशीच मिळते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: गणेशोत्सवाची विडंबना खपवून घेतली जाणार नाही पुण्यात भाजप नेते धीरज घाटे आणि हेमंत बिडकर यांचा सज्जड इशारा!
- मुंबई: स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नयेत; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
- पुणे: अभ्यासाचा आणि परीक्षेचा प्रचंड ताण; बारामतीत १६ वर्षीय विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल, शैक्षणिक वर्तुळात मोठी हळहळ!
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
महाराष्ट्र
- पुणे: गणेशोत्सवाची विडंबना खपवून घेतली जाणार नाही पुण्यात भाजप नेते धीरज घाटे आणि हेमंत बिडकर यांचा सज्जड इशारा!
- कोल्हापूर: स्वतंत्र गृहमंत्री असल्याशिवाय राज्यात कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहणार नाही काँग्रेस नेते सतेज पाटील यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- जालना: माझ्यामधी वळवळ करू नका.. मराठा आरक्षण मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांचे छगन भुजबळांवर अत्यंत तिखट शब्दांत हल्लबोल!
- मुंबई: स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नयेत; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: राजकारणात मोठा भूकंप होणार? संजय राऊतांचा मोठा दावा, देवेंद्र फडणवीस होऊ शकतात देशाचे नवे 'उपपंतप्रधान'!
- नवी दिल्ली: 'काॅक्रोच जनता पार्टी'मध्ये उभी फूट! मनीष ब्रह्मभट्ट यांनी 'CJP-डेमोक्रेटिक' पक्षाची केली घोषणा, अरविंद केजरीवाल आणि अभिजीत दिपकेंवर गंभीर आरोप!
- अयोध्या: राम मंदिरात ऐतिहासिक निर्णय; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या सीईओ पदी नियुक्ती
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड


























Subscribe to my channel




