रविवारच्या एका शांत सकाळची कल्पना करा. आकाशात ढग दाटून आले आहेत, खिडकीवर हलकीशी पावसाची सर पडत आहे आणि हवामान अगदी आल्हाददायक आहे. कोणतीही घाई नाही, तयार होण्याचे कोणतेही दडपण नाही आणि ऑफिसलाही जायचे नाही. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत शांतपणे बसला आहात- एका हातात चहा, दुसऱ्या हातात सकाळचे वर्तमानपत्र. तेवढ्यात थंड हवेची एक झुळूक तुमच्या गालाला स्पर्श करते आणि तुम्ही दोघेही डोळे मिटून घेता. कोणत्याही पूर्वनियोजनाविना तुम्ही एका पूर्ण शांततेच्या अवस्थेत पोहोचता. जग जणू दिसेनासे होते. तुमचा चहा थंड होत आहे, पण तुम्हाला त्याची पर्वा नाही. तुम्ही पूर्णपणे समाधानी आहात. जेव्हा शेवटी तुम्ही तुमचे डोळे उघडता तेव्हा तुमच्यापैकी एक जण हळूच म्हणतो, ‘काय उत्तम रविवार आहे’. दुसरा फक्त होकारार्थी मान हलवतो. आपण आपले संपूर्ण आयुष्य नेमक्या याच अनुभूतीच्या शोधात घालवतो. पण तो क्षण इतका परिपूर्ण का होता? असे यासाठी नव्हते की तुमच्या घराचे कर्ज फिटले होते किंवा नुकताच तुमचा पगार बँक खात्यात जमा झाला होता. हे यासाठीही नव्हते की तो वीकेंड होता. तो क्षण यासाठी परिपूर्ण होता. कारण काही निवांत मिनिटांसाठी तुमचे लक्ष केवळ एकाच गोष्टीवर केंद्रित होते- तुमचा श्वास. स्वतःचा वेग मंदावून तुम्ही तुमच्या मेंदूला त्याच्या ‘फाइट-ऑर-फ्लाइट’ मोडमधून बाहेर काढले होते आणि तुमच्या पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टिमला- शरीराच्या स्वाभाविक ‘रेस्ट-अँड-डायजेस्ट’ प्रतिसादाला सक्रिय केले होते. तुम्ही तुमच्या मेंदूला असा संकेत दिला की तुम्ही सुरक्षित आहात, ज्यामुळे वर्षानुवर्षे साचलेला ताण वितळू लागला.याला स्थिरतेचे विज्ञान म्हणतात. त्या काही शांत मिनिटांमध्ये तुमच्या शरीराच्या आत एक अद्भुत जैविक बदल झाला होता. तुमच्या हृदयाची गती मंदावली होती. रक्तदाब कमी झाला होता. तणावाचे प्रमुख संप्रेरक कॉर्टिसोल वेगाने कमी झाले होते. मेंदूचे भावनिक फिअर-सेंटर अमिग्डाला शांत झाले होते, तर तर्कसंगत विचार आणि भावनिक संतुलनावर नियंत्रण ठेवणारा प्री-फ्रंटल कॉर्टेक्स सक्रिय झाला होता. आपले पूर्वज ही अवस्था दररोज साधत असत आणि याला ते ध्यान म्हणायचे. आजचे आधुनिक शास्त्रज्ञ याला ‘पीक जेन’ म्हणतात- सखोल रिलॅक्सेशन, मानसिक स्पष्टता आणि भावनिक संतुलनाची सर्वोच्च अवस्था. शेवटी ‘पीक जेन’ किंवा ध्यान म्हणजे काय? हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील भूलतज्ज्ञ प्राध्यापक डॉ. बाला सुब्रमण्यम- ज्यांचे काम प्राचीन ध्यान-विज्ञान आणि आधुनिक वैद्यकशास्त्राची सांगड घालते- याबद्दल सोप्या शब्दांत सांगतात : ‘ध्यानाचे ध्येय अशा अवस्थेत पोहोचणे हे आहे, जिथे तुम्ही तुमच्या विचारांना येता-जाताना पाहता, पण त्यांच्यात अडकत नाही.’ ध्यानाचा अर्थ मनाला जबरदस्तीने रिकामे करणे असा नाही. याचा अर्थ आपल्या मानसिक उलथापालथीमध्ये सहभागी न होता त्याचे तटस्थ साक्षीदार बनणे हा आहे. जेव्हा तुम्ही शांत बसता तेव्हा तुमचे मन मंदावू लागते. यातून एका अशा प्रक्रियेला सुरुवात होते, ज्याला शास्त्रज्ञ ‘टाइम-डायलेशन’ म्हणतात. हे अगदी त्याच ‘फ्लो-स्टेट’सारखे आहे, ज्याचा अनुभव सर्वोच्च स्तरावरील खेळाडू घेतात. विश्वचषकातील जगातील सर्वोत्तम फुटबॉल खेळाडूंची कल्पना करा. चेंडू गोलपोस्टच्या आत पोहोचवण्याआधीच्या एका क्षणी प्रेक्षकांनी खचाखच भरलेले स्टेडियम त्यांच्यासाठी जणू पूर्णपणे अदृश्य होते. गोंधळ संपुष्टात येतो. वेळ जणू विस्तारू लागते. त्यांना बचाव फळीमध्ये एक छोटीशी मोकळी जागा दिसते आणि ते शॉट मारतात. ध्यानदेखील तुम्हाला थेट तशाच हायपर-फोकस्ड स्पष्टतेच्या अवस्थेत घेऊन जाते, जिथे बाह्य जगाचा गोंधळ मंदावतो, जेणेकरून तुम्ही तुमच्या आंतरिक प्रज्ञेपर्यंत पोहोचू शकाल. म्हणूनच स्थिरता हा उत्पादकतेचा सर्वात प्रभावी उपाय आहे. मनात सुरू असलेला गोंधळ शांत करण्याचा दैनंदिन सराव मेंदूच्या नैसर्गिक न्यूरोप्लास्टिसिटीचा वापर करत तुमच्या न्यूरल-पाथवेजला पूर्णपणे आनंदासाठी री-वायर करून टाकतो. तुमच्या मनासाठी हे स्मरणशक्ती तीक्ष्ण करते, सखोल एकाग्रता वाढवते आणि रोजच्या निराशेचा सामना करण्यासाठी तुम्हाला मनोवैज्ञानिकदृष्ट्या मजबूत बनवते. तुमच्या शरीरासाठी हे दीर्घकालीन इन्फ्लमेशन कमी करते, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनवते आणि झोपेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा घडवून आणते. फंडा असा आहे की, ध्यान वास्तवात तुमचा वेळ घेत नाही, तर ते तुमच्यासाठी वेळ वाचवते. हे मनात सतत सुरू असणारा गोंधळ शांत करते, ज्यामुळे तुम्ही अधिक सजग, अधिक शांत आणि पूर्णपणे वर्तमानात उपस्थित राहता. दररोज संडेवाली फिलिंग अशीच मिळते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- हॉटेलमधील 'जार'च्या अशुद्ध पाण्याला बसणार लगाम! तुकाराम मुंढे तयार करणार कडक SOP; राज्य सरकारचे विधानसभेत मोठे निर्देश!
- कोल्हापुरात महापूर सदृश परिस्थिती! राजाराम बंधाऱ्याची पातळी २९ फुटांवर; जिल्ह्यातील ३३ बंधारे पाण्याखाली!
- ठाणेकरांचा पर्यावरण रक्षणासाठी एल्गार! संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षणासाठी नागरिकांची 'मानवी साखळी'; मुख्य प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने!
- पनवेलमध्ये पुराचा वेढा, ३३४ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले! महानगरपालिकेकडून तात्काळ अन्न आणि वैद्यकीय मदत सुरू
महाराष्ट्र
- कोल्हापुरात महापूर सदृश परिस्थिती! राजाराम बंधाऱ्याची पातळी २९ फुटांवर; जिल्ह्यातील ३३ बंधारे पाण्याखाली!
- ठाणेकरांचा पर्यावरण रक्षणासाठी एल्गार! संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षणासाठी नागरिकांची 'मानवी साखळी'; मुख्य प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने!
- पनवेलमध्ये पुराचा वेढा, ३३४ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले! महानगरपालिकेकडून तात्काळ अन्न आणि वैद्यकीय मदत सुरू
- भ्रष्टाचाराचा कुबेर! देवळाली कॅन्टोन्मेंटचे माजी सीईओ अजय कुमार यांच्यावर सीबीआयचा गुन्हा; १० वर्षांत ५२ हजारांची संपत्ती झाली थेट पाऊणेसहा कोटी!
गुन्हा
- "जे लग्न कधी होणारच नाहीये, त्यासाठी आधार कशाला?" केतन अगरवाल हत्या प्रकरणात आरोपी सियाचे खळबळजनक व्हॉट्सॲप चॅट व्हायरल!
- उत्तर प्रदेश: पतीची हत्या करून मृतदेह बाथरुमच्या फरशीखाली गाडला; ४५ दिवस मृतदेहावरच आंघोळ केली!
- पेट्रोल पंप घोटाळ्यामागे थकीत भाड्याची 'ती' गंभीर कहाणी; बीडीओच्या अपहरणनाट्याचा विधानपरिषदेत झाला उलगडा!
- पुणे: ५ कोटींच्या वेतन घोटाळ्यात सिंहगड इन्स्टिट्यूटच्या संस्थापकासह ७ जणांवर गुन्हा दाखल.
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- धाराशिवच्या जमिनीचा पोत खालावला! मृद आरोग्य पत्रिकेच्या अहवालात 'नत्र' कमतरतेची गंभीर नोंद; खरिपासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याचे आवाहन.
- शनीच्या दृष्टीचा राशींवर होणार परिणाम, जाणून घ्या ४ जुलै २०२६ चा दिवस कसा असेल!
- ३ जुलै २०२६ आजचे राशीभविष्य: संकष्टीच्या शुभ मुहूर्तावर या ४ राशींवर होणार बाप्पाची विशेष कृपा!
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतमालाच्या प्रक्रिया आणि साठवणूक प्रकल्पासाठी मिळणार २ कोटींपर्यंत कर्ज.
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
विडियो गॅलेरी

पवई परिसरातील JVLR मार्गावर L&T गेट क्रमांक ५ जवळ मुख्य रस्त्यावर मोठा खड्डा
🚨 हडपसरमध्ये पावसाने उघड केली ड्रेनेज व्यवस्थेची पोलखोल!
पुणे: हडपसर रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्याची दुरवस्था; खड्डे-चिखलामुळे हजारो प्रवाशांचे हाल.
देश विदेश
- पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल मिसळल्याने इंजिन खराब होत नाही! केंद्र सरकार आणि पेट्रोलियम मंत्र्यांचे व्हायरल दाव्यांवर स्पष्टीकरण
- आग्रा हादरले! पतीची निर्घृण हत्या करून मृतदेह बाथरूममध्ये पुरला; ४५ दिवसांनंतर धक्कादायक गुन्ह्याचा उलगडा!
- इंधन दरांचे मोठे गुपित: पेट्रोल ६ रुपये तर डिझेल १८९ रुपये कसे? कंपन्या दर वाढवण्याचे धाडस का करत नाहीत? जाणून घ्या सत्य.
- भारतीय सैन्याची ताकद वाढणार! ५२,००० कोटींच्या संरक्षण खरेदीला मंजुरी; लष्कर, नौदल आणि वायुदलाला मिळणार आधुनिक शस्त्रास्त्रे.

























Subscribe to my channel



