तर मी राजीनामा देईन…; एसीबीच्या धडक कारवाईनंतर झिरवळांची मोठी प्रतिक्रिया

मंत्रालयातील लाचखोरीच्या प्रकरणानंतर राज्यमंत्री नरहरी झिरवळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्या विभागात घडलेल्या या घटनेबाबत विचारले असता, त्यांनी जर त्यांच्याशी कोणताही थेट संबंध जोडला गेला तर आपण राजीनामा देण्यास तयार असल्याचे सांगितले. झिरवळ यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरही प्रकाश टाकला. ते म्हणाले की, नैतिकता ही माझी आहेच, पण नैतिकता बाजूला होऊनच ती पाळली जाते असे नाही.

घडलेल्या लाचखोरी प्रकरणात जे दोषी आढळले आहेत, त्यांना त्यांची शिक्षा लगेच भोगावी लागेल आणि मी कोणालाही पाठिशी घालणार नाही, असे झिरवळ यांनी ठामपणे सांगितले. एसीबीने केलेल्या कारवाईचे त्यांनी समर्थन केले असून, कायदेशीर प्रक्रिया पुढे जाईल असे म्हटले आहे. संजय राऊत यांनी त्यांच्या मंत्रालयीन कामकाजाच्या ज्ञानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असले तरी, याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे झिरवळ यांनी सांगितले आणि जर असे काही असेल तर स्पष्टीकरण देईन असे म्हटले.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *