अशी दृश्ये एकेकाळी राजकारण्यांसाठी लज्जास्पद ठरू शकली असती. दिल्लीत तृणमूलच्या खासदारांनी पक्ष बदलण्याची तयारी सुरू असताना, त्यांना ज्येष्ठ भाजप नेत्यांसोबत अत्यंत सहज वावरताना पाहिले गेले. ही गोष्ट लपवून ठेवण्याचा प्रयत्नही केला गेला नाही. महाराष्ट्रात शिवसेनेचे बंडखोर आमदार चार्टर्ड विमानाने प्रवास करताना दिसले, आलिशान हॉटेल्समध्ये कडेकोट सुरक्षेत आपल्या राजकीय भवितव्यावर चर्चा करत राहिले. ते असे लोकप्रतिनिधी वाटत नव्हते, जे अंतरात्म्याच्या संघर्षातून जात आहेत. त्याऐवजी, ते एखाद्या कॉर्पोरेट प्रकरणावर चर्चा करणारे अधिकारी जास्त वाटत होते! येथे धक्कादायक बाब ‘पक्षांतर’ ही नाही. कारण भारतीय राजकारण दशकांपासून पक्षांतर पाहत आले आहे. अधिक महत्त्वाची बाब ही आहे की, आता जनमताची कोणतीही चिंता उरलेली नाही. विचारधारेत अचानक बदल का झाला, याचे कोणतेही स्पष्टीकरण दिले जात नाही. हे करण्यामागे काही मोठे उद्दिष्ट आहे, हे मतदारांना पटवून देण्याचा प्रयत्नही केला जात नाही. संदेश जणू स्पष्ट होता: राजकारण हा एक व्यवहार आहे आणि प्रत्येकाला या सौद्याच्या अटी ठाऊक आहेत. आता तर राज्यसत्तेच्या संसाधनांपर्यंत पोहोचणे हा सुद्धा या सौद्याचाच एक भाग वाटतो. जसे एका शिवसेना खासदाराने म्हटले: ‘जर मला माझ्या मतदारसंघातील प्रकल्पांसाठी विकासनिधी हवा असेल, तर मी दुसरे काय करू?’ पक्षांतरकडे आता निवडणुकीतील जनादेशाचा विश्वासघात म्हणून पाहिले जात नाही. ते आता सामान्य झाले असून सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात एक साधन म्हणून स्वीकारले गेले आहे. काँग्रेस राजवटीतही पक्षांतरे झाली होती. याआधीही विरोधी पक्षांची सरकारे बरखास्त केली गेली, आमदारांनी पद मिळवण्यासाठी, अंतर्गत वाद सोडवण्यासाठी किंवा त्या काळातील प्रभावशाली पक्षासोबत जाण्यासाठी पक्ष बदलले. राजकीय संधीसाधूपणा नेहमीच फोफावला आहे. परंतु प्रश्न असा आहे की, आता पक्षांतराचे स्वरूप बदलले आहे का? काँग्रेसच्या काळात पक्षांतर हे एका प्रबळ पक्षव्यवस्थेचे लक्षण होते. तर आज ती एक प्रभावी पक्ष व्यवस्था निर्माण करण्याची आणि टिकवून ठेवण्याची रणनीती बनली आहे. हा फरक महत्त्वाचा आहे, कारण समकालीन भारतीय राजकारणात झालेला सर्वात मोठा बदल समजून घेण्यास तो मदत करतो. गेल्या एका दशकात भाजप स्वतंत्र भारतातील सर्वात प्रभावशाली निवडणूक यंत्रणांपैकी एक म्हणून उभी राहिली आहे. तिची संघटनात्मक शक्ती, आर्थिक संसाधने, दळणवळण यंत्रणा आणि नेतृत्व रचना अभूतपूर्व आहे. तिचे निवडणूक यश स्वीकारले पाहिजे, परंतु याने एका नवीन राजकीय विचारालाही जन्म दिला आहे. निवडणूक जिंकणे हे आता फक्त सत्ता चालवण्याचे माध्यम राहिलेले नाही. तर क्षेत्र विस्तारणे हे मुख्य उद्दिष्ट बनले आहे. या दृष्टिकोनातून, पक्षांतर आता अपवाद नसून ‘अधिग्रहण’ बनले आहेत. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य सिंधिया आणि त्यांच्या समर्थकांनी साथ सोडल्यानंतर काँग्रेस सरकार कोसळले. महाराष्ट्रात आधी शिवसेनेत आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली. ईशान्य भारतात भाजपने प्रतिस्पर्धी पक्षांचे नेते आणि आमदारांना सोबत घेऊन आपला विस्तार केला आहे. या सर्वांचे उद्दिष्ट प्रतिस्पर्धी पक्षांना संरचनात्मकदृष्ट्या कमकुवत करणे आणि सत्ताधारी पक्षाची राजकीय व्याप्ती सतत वाढवणे हे आहे. जो भाजप कधी वैचारिक बांधिलकी आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या निष्ठेवर गर्व करायचा, तोच आता विरोधी गटांतील नेत्यांना मोठ्या प्रमाणावर आपल्या पक्षात सामील करत आहे. अटलबिहारी वाजपेयींच्या काळातील भाजप मुख्यत्वे युती, सामाजिक समीकरणे आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याद्वारे विस्तार करू इच्छित होती. वाजपेयींना समजायचे की राजकीय विस्तार हा सहमती आणि विनवणीतून होतो. पण आज तसे नाही. ‘पक्षांतरविरोधी कायद्या’लाही सतत बगल दिली जात आहे. प. बंगालमध्ये एका कमी ज्ञात राजकीय पक्षाचा - ‘नॅशनलिस्ट सिटीझनशिप पार्टी ऑफ इंडिया’चा - वापर कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी व पक्षांतर सोपा करण्यासाठी केला गेला. पक्षांमधील फूट आणि अपात्रतेशी संबंधित प्रकरणे न्यायालयात महिने आणि कधीकधी वर्षे प्रलंबित राहतात. जोपर्यंत निकाल येतो, तोपर्यंत सरकारे आपला कार्यकाळ पूर्ण करून मंत्रिपदाचा लाभही उपभोगून झालेली असतात. पक्ष विकसित होतात. आघाड्या बदलतात. नेतेही आपले विचार बदलू शकतात, परंतु जर पक्षांतर हेच सत्ता मिळवण्याचे साधन बनले, तर ते लोकशाहीसाठी धोकादायक आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) मतदार फक्त एका उमेदवाराला निवडून देत नाहीत. ते एक पक्ष, निवडणूक चिन्ह, कार्यक्रम आणि राजकीय दृष्टिकोनालाही निवडत असतात. निवडणुकीनंतर राजकीय जुळवाजुळव करून जनतेचा हा कौल बदलणे अनैतिक आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



