लोकशाही केवळ मतदान, सरकार किंवा सत्तांतरयापुरती मर्यादित नसते. ती सतत सुरू राहणारी संवादाची प्रक्रिया असते. या प्रक्रियेत सहमतीइतकेच असहमतीलाही स्थान असते. मात्र संवादात संयम,संवेदनशीलता आणि परस्परांविषयी आदर टिकून राहतो,तेव्हाच तो सशक्त राहतो. भाषेत अपमान, कटुता वउत्तेजना असते तेव्हा विरोध हळूहळू वैरात रुपांतरित होतो. सध्या भारतीय सार्वजनिक जीवनात हीच सर्वात मोठीचिंता बनली आहे. संसद असो, टीव्हीवरील चर्चासत्रेअसोत, निवडणूक सभा असोत किंवा सोशलमीडियावरील चर्चा — सर्वत्र भाषेतील संयम कमीहोताना दिसतो. विचारांपेक्षा उपरोधिक टीका, तर्कांपेक्षाटोमणे आणि संवादापेक्षा गोंधळ अधिक वाढतानादिसतो. त्यामुळे लोकशाही ही विचारमंथनाचे व्यासपीठ नराहता केवळ आक्रमक प्रदर्शनाचे माध्यम बनतअसल्याची भावना निर्माण होते. भारतीय लोकशाहीपरंपरेत मतभेदांना नेहमीच सन्मानाने व्यक्त करण्याचीसंस्कृती राहिली आहे. एखाद्या धोरणावर कठोर टीकाहोऊ शकते. एखाद्या विचारसरणीशी तीव्र असहमती असू शकते; परंतुव्यक्तीच्या सन्मानावर हल्ला करणे ही लोकशाही संस्कृतीमानली जात नाही. असहमती ही लोकशाहीची ताकदआहे तर अपमान हा तिच्या आत्म्याला धक्का देणाराप्रकार ठरतो.आजचा विरोधाभास असा आहे कीसार्वजनिक जीवनात भाषेचा उद्देश समजावूनसांगण्यापेक्षा प्रतिस्पर्ध्याला हरवणे हा अधिक झाला आहे.शब्द आता संवादाचे पूल बांधत नाहीत, तर दरी निर्माणकरतात. वेगळे मत मांडणाऱ्या व्यक्तींना लगेचदेशविरोधी, व्यवस्था समर्थक किंवा अन्य कोणत्या तरीचौकटीत बसवले जाते. ही प्रवृत्ती केवळ राजकीय मतभेद मर्यादित करत नाही, तरसमाजातील संवादाच्या शक्यताही कमकुवत करते.भारताची सर्वात मोठी शक्ती म्हणजे त्याची विविधता.अनेक भाषा, धर्म, जाती आणि संस्कृतींनी बनलेल्या यादेशात संवादाची भाषा नैसर्गिकपणे समावेशक आणिसंवेदनशील असणे आवश्यक आहे. मात्र गेल्या काही वर्षांत राजकीय भाषाशैली अधिकफुटीरवादी होताना दिसत आहे. ‘आम्ही विरुद्ध ते’ यामानसिकतेचा प्रभाव संवादावरही पडत आहे. त्यामुळेसमस्येवर तोडगा शोधण्यापेक्षा विरोधकाला नैतिकदृष्ट्याचुकीचे ठरवण्यावर अधिक भर दिला जात आहे. सोशल मीडियाने हा प्रश्न आणखी तीव्र केला आहे. यामाध्यमाने संवाद अधिक लोकाभिमुख केला. पणत्याचवेळी संवादातील सभ्यपणा कमी केला. आता एखाद्या विचाराची गंभीरता महत्त्वाची राहिलेलीनाही; तो किती वेगाने व्हायरल होतो. हे अधिक महत्त्वाचेठरते. संयमी आणि विवेकपूर्ण मतांपेक्षा प्रक्षोभकप्रतिक्रिया अधिक वेगाने पसरतात. ट्रोल संस्कृतीमुळे असहमतीचे रूपांतर अनेकदाशिवीगाळीत झाले आहे. त्यामुळे कोणाचा युक्तिवादअधिक भक्कम आहे. यापेक्षा कोणाची प्रतिक्रिया अधिकआक्रमक आहे, हेच जास्त महत्त्वाचे बनले आहे.त्यामुळेच आजचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न कोण सत्तेवरआहे हा नाही, तर आपण एकमेकांशी कोणत्या भाषेतसंवाद साधतो, हा आहे. (लेखकाचे हे वैयक्तिक मत आहे)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- डोंबिवली हादरली! १४० हून अधिक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लाखोंची फसवणूक; 'लव्ह स्कॅम'चा मास्टरमाइंड अटकेत.
- नाशिक हादरले! अनैतिक संबंधांतून ३६ वर्षीय विवाहितेने २६ वर्षीय प्रियकराचा केला गळा आवळून खून;
- ग्रामपंचायत राक्षेवाडी प्रभाग रचनेत मोठा गोंधळ; प्रशासनाने विश्वासात न घेतल्याचा ग्रामस्थांचा आरोप!
- नाशिक हादरले! कढी आवडली नाही म्हणून सासू-पतीने सुनेच्या अंगावर ओतली उकळती कढी, अंगावर शहारे आणणारी घटना.
महाराष्ट्र
- डोंबिवली हादरली! १४० हून अधिक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लाखोंची फसवणूक; 'लव्ह स्कॅम'चा मास्टरमाइंड अटकेत.
- नाशिक हादरले! अनैतिक संबंधांतून ३६ वर्षीय विवाहितेने २६ वर्षीय प्रियकराचा केला गळा आवळून खून;
- ग्रामपंचायत राक्षेवाडी प्रभाग रचनेत मोठा गोंधळ; प्रशासनाने विश्वासात न घेतल्याचा ग्रामस्थांचा आरोप!
- वाढवण बंदर महामार्ग प्रकल्पात फसवणूक; आदिवासी कुटुंबाचे ५० लाख रुपये लुटले!
गुन्हा
- डोंबिवली हादरली! १४० हून अधिक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लाखोंची फसवणूक; 'लव्ह स्कॅम'चा मास्टरमाइंड अटकेत.
- नाशिक हादरले! अनैतिक संबंधांतून ३६ वर्षीय विवाहितेने २६ वर्षीय प्रियकराचा केला गळा आवळून खून;
- वाढवण बंदर महामार्ग प्रकल्पात फसवणूक; आदिवासी कुटुंबाचे ५० लाख रुपये लुटले!
- नाशिक हादरले! कढी आवडली नाही म्हणून सासू-पतीने सुनेच्या अंगावर ओतली उकळती कढी, अंगावर शहारे आणणारी घटना.
राजकीय
- जनसांख्यिकीय बदलांवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; अवैध घुसखोरीच्या तपासणीसाठी उच्चस्तरीय समिती गठीत!
- विदर्भात राजकीय भूकंप; काँग्रेसच्या २३ नगरसेवकांना ५ लाखांचे आमिष दाखवून 'पळवून नेले', वडेट्टीवारांचा भाजपवर गंभीर आरोप!
- 'नवीन नागपूर'च्या विकासाला रॉकेट गती! भूसंपादनाचा धडाका; ७८ एकर जमीन ताब्यात, शेतकऱ्यांना १५० कोटींचे वाटप
- महिला बालविकास विभागात खळबळ! मंत्री अदिती तटकरेंच्या खासगी सचिवावर बदल्यांचे रॅकेट चालवल्याचा आणि महिला अधिकाऱ्यांना धमकावल्याचा रोहिणी खडसेंचा गंभीर आरोप
इतर
- आजचे राशिभविष्य २७ मे २०२६: गजकेसरी योगाचा या राशींना होणार फायदा, आजचा दिवस कसा असेल?
- आजचे राशिभविष्य २६ मे २०२६: मंगळाच्या राजयोगाने ४ राशींचे होणार मंगल, भाग्य उजळणार आणि धनलाभ मिळणार!
- अमरावतीत उन्हाचा हाहाकार! पारा थेट ४७ अंशांवर पोहोचल्याने २ दिवसांत ३ जणांचा उष्माघाताने मृत्यू; प्रशासनाचा रेड अलर्ट
- शेतकऱ्याच्या घामाची क्रूर चेष्टा! बीडमध्ये कांदा विकून हाती काहीच नाही, उलट वाहतूक भाड्यासाठी खिशातूनच द्यावे लागले ३०१ रुपये; बळिराजाच्या डोळ्यांत पाणी
मनोरंजन
- खिलाडी अक्षय कुमारचे मोठे पाऊल! काश्मीरमधील सरकारी शाळेच्या उभारणीसाठी दिली तब्बल १ कोटी रुपयांची देणगी
- 'दुनियादारी'च्या यशानंतर मी हवेत होतो अन् तो माज..."; 'प्यारवाली लव्हस्टोरी' फ्लॉप झाल्याची संजय जाधवांनी सांगितली कटू आठवण
- दार उघड बये' हाक पुन्हा घुमणार! लाडके आदेश बांदेकर 'होम मिनिस्टर'च्या नव्या सीझनसह छोट्या पडद्यावर परतणार?
- आयपीएल २०२६ मध्ये युवा वादळ! 'ऑरेंज कॅप'धारक वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम; टी२० क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी टीनेजर फलंदाज!
विडियो गॅलेरी

नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
बच्चू कडूंची शिवसेनेत अधिकृत एन्ट्री…मुद्द्यांसाठी राजकारण की नवं राजकीय समीकरण?
देश विदेश
- भारतात इबोलाची धास्ती! बेंगळुरूत संशयित रुग्ण क्वारंटाईन, अद्याप एकही पॉझिटिव्ह केस नाही.
- एकाच कंपनीने घडवला चमत्कार! 'AI' च्या लाटेवर स्वार होत तैवानने भारतीय शेअर बाजाराला टाकले मागे
- युद्धविरामाच्या चर्चेदरम्यान अमेरिकेचा इराणवर मोठा हल्ला; होर्मुज सामुद्रधुनीजवळ उडवल्या इराणी नौका!
- खिलाडी अक्षय कुमारचे मोठे पाऊल! काश्मीरमधील सरकारी शाळेच्या उभारणीसाठी दिली तब्बल १ कोटी रुपयांची देणगी


















Subscribe to my channel


