बुलढाणा हादरले! किरकोळ घरगुती वादातून संतापलेल्या नवऱ्याने बायकोला कुऱ्हाडीने जागीच संपवलं

Minor Dispute Escalates as Husband Brutally Axes Wife to Deathबुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ बुद्रुक गावात किरकोळ कौटुंबिक वादातून एका निर्दयी पतीने आपल्याच पत्नीची कुऱ्हाडीने डोक्यात वार करून निर्घृण हत्या केली. या भीषण हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव मायावती शहादेव भारसाकळे (वय ४६ वर्षे) असे असून, आरोपी पतीचे नाव शहादेव शंकर भारसाकळे आहे. गुरुवारी घरात किरकोळ घरगुती कारणावरून या पती-पत्नीमध्ये जोरदार वाद झाला. या वादाचे रूपांतर बघता बघता मोठ्या भांडणात झाले. संतापाच्या भरात आरोपी शहादेव याने घरात ठेवलेली कुऱ्हाड उचलली आणि थेट मायावती यांच्या डोक्यावर सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की मायावती गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या.

घटनेनंतर जखमी मायावती यांना तात्काळ उपचारासाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी पती शहादेव भारसाकळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतले आहे. किरकोळ वादाचे पर्यवसान अशा भयानक हत्येत झाल्याने संपूर्ण बुलढाणा जिल्हा हादरला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.



शहर

मुंबई: दिव्यांग बांधवांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.. विशेष सहाय्य अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या अनेक लाभार्थ्यांकडे वैश्विक ओळखपत्र (UDID Card) नसल्यामुळे काही ठिकाणी अनुदान मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. ही बाब लक्षात घेऊन शासनाने आता ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील सुमारे १.५० लाख दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना तसेच इतर योजनांचे लाभ विनाव्यत्यय सुरू राहतील. ज्यांच्याकडे अद्याप UDID कार्ड नाही, त्यांचे अनुदान थांबवले जाणार नाही. या कालावधीत लाभार्थ्यांना नवीन कार्ड काढण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक सहकार्य देखील केले जाणार आहे. कोणताही दिव्यांग बांधव शासनाच्या योजनांपासून वंचित राहू नये, यासाठी शासन कटिबद्ध आहे.. #दिव्यांग_कल्याण #महाराष्ट्र_शासन #divyanka_Kalyan #Maharashta #Divyangjan #UDIDCard #GovtDecision #DisabilityWelfare #BigRelief #SocialJustice #DisabledRights #GovtSchemes #DivyangjanBenifits #InclusionMatters #PolicyChange #WelfareNews #Accessibility #Empowerment #SpeciallyAbled

Mega Transpositions and Promotions Ordered Across Mumbai, Pune, and Major Districts

महाराष्ट्र

मुंबई: दिव्यांग बांधवांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.. विशेष सहाय्य अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या अनेक लाभार्थ्यांकडे वैश्विक ओळखपत्र (UDID Card) नसल्यामुळे काही ठिकाणी अनुदान मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. ही बाब लक्षात घेऊन शासनाने आता ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील सुमारे १.५० लाख दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना तसेच इतर योजनांचे लाभ विनाव्यत्यय सुरू राहतील. ज्यांच्याकडे अद्याप UDID कार्ड नाही, त्यांचे अनुदान थांबवले जाणार नाही. या कालावधीत लाभार्थ्यांना नवीन कार्ड काढण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक सहकार्य देखील केले जाणार आहे. कोणताही दिव्यांग बांधव शासनाच्या योजनांपासून वंचित राहू नये, यासाठी शासन कटिबद्ध आहे.. #दिव्यांग_कल्याण #महाराष्ट्र_शासन #divyanka_Kalyan #Maharashta #Divyangjan #UDIDCard #GovtDecision #DisabilityWelfare #BigRelief #SocialJustice #DisabledRights #GovtSchemes #DivyangjanBenifits #InclusionMatters #PolicyChange #WelfareNews #Accessibility #Empowerment #SpeciallyAbled

Mega Transpositions and Promotions Ordered Across Mumbai, Pune, and Major Districts

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *