‘ऑपरेशन सिंदूर’ला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यातून मिळणाऱ्या सर्वात मोठ्या धड्याचा विचार केला तर तो हल्ल्याचा अचूकपणा किंवा अंमलबजावणीचा वेग हा नसून, ती धोरणात्मक स्पष्टता आहे जी याचा आधार बनली. भारताने हे दाखवून दिले होते की, प्रभावी ठरण्यासाठी शक्तीचा वापर हा कमालवादी असणे आवश्यक नाही. अशा काळात, जेव्हा देश अनेकदा प्रदीर्घ संघर्षात गुरफटतात, तेव्हा भारताने एक वेगळा मार्ग निवडला. हा एक संयमित, सुनियोजित व दीर्घकालीन राष्ट्रीय हितांवर आधारित मार्ग होता. याच गोष्टीने भारताच्या जागतिक प्रतिष्ठेला आकार दिला आहे. जगभरातील अलीकडील संघर्षांनी एक कठोर सत्य समोर आणले आहे. आज युद्ध सुरू करणे तर सोपे आहे, परंतु ते संपवणे अधिक कठीण झाले आहे. निर्णायक विजयाची संकल्पना सातत्याने दुर्मिळ होत चालली आहे. तंत्रज्ञानाने अनपेक्षित मार्गांनी शक्तीचे संतुलन समान पातळीवर आणले आहे. लहान किंवा तुलनेने कमी विकसित देशही आता मोठ्या महासत्तांना प्रदीर्घ संघर्षात अडकवू शकतात, जे त्यांच्या संसाधनांना आणि राजकीय इच्छाशक्तीला क्षीण करतात. परिणामी, एक अशी धोरणात्मक अस्पष्टता निर्माण होते, ज्यात खर्च अफाट असतो, साध्य मात्र मर्यादित असते आणि अंतिम स्थिती स्पष्ट नसते. अशा स्थितीत भारताचा दृष्टिकोन या जाणिवेचे प्रतिबिंब आहे की, ताकदीचा वापर केवळ शक्तिप्रदर्शनासाठी नसून व्यापक राष्ट्रीय आराखड्याच्या अंतर्गत विशिष्ट आणि मर्यादित उद्दिष्टे गाठण्यासाठी आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे याच तर्काचे प्रतीक होते. कुणाचा भूगोल बदलणे किंवा टोकाची उद्दिष्टे गाठणे हा त्याचा उद्देश नव्हता तर धोरणात्मक स्थिरता राखून एक स्पष्ट आणि विश्वासार्ह संदेश देणे हा त्याचा हेतू होता. असे करून भारताने त्या तत्त्वाला पुन्हा प्रस्थापित केले, जे समकालीन भू-राजकारणात सातत्याने दुर्मिळ होत चालले आहे. आणि ते म्हणजे शक्तीचा शिस्तबद्ध वापर. या शिस्तीला अनेकदा संयम म्हणून चुकीचे समजले जाते. वास्तवत: हा आत्मविश्वासातून आलेला संयम आहे. भारताच्या नेतृत्वाने हे सिद्ध केले की, त्यांच्याकडे केवळ प्रहार करण्याची क्षमता व इच्छाशक्तीच नाही, तर उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर थांबण्याचा विवेकही आहे. आक्रमकता आणि संयम यांच्यातील हा समतोल सहजासहजी साधता येत नाही. त्यासाठी राजकीय उद्दिष्टांची स्पष्टता, व्यावसायिक लष्करी क्षमता व परिणामांना महत्त्व देणारी संस्थात्मक संस्कृती आवश्यक असते. तसेच भारताचा दृष्टिकोन आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी असलेल्या अढळ वचनबद्धतेवर आधारित आहे. जीवांचे रक्षण आणि सुरक्षिततेचे आश्वासन हे सर्वोपरी राहिले आहे. या गरजेची पूर्तता दीर्घकालीन राष्ट्रीय हितांपासून वेगळी राहून केली जात नाही, तर तिला एका व्यापक धोरणात्मक दृष्टीमध्ये सामावून घेतले गेले आहे. ही अशी दृष्टी आहे, जी मान्य करते की शाश्वत सुरक्षा ही आर्थिक विकास, सामाजिक स्थिरता आणि जागतिक विश्वासार्हतेपासून वेगळी नाही. या दृष्टिकोनातील काही इतर प्रमुख घटक विशेषत्वाने उल्लेखनीय आहेत. जसे की उद्दिष्टांची स्पष्टता, ज्यामध्ये शक्तीचा वापर परिभाषित आणि साध्य करण्यायोग्य परिणामांसाठी केला जातो- अनिश्चित ध्येयांसाठी नाही. नियंत्रित तीव्रता वाढवणे, ज्यामध्ये निर्णायक कारवाईची क्षमता असते. साधनांचा समन्वय, ज्याअंतर्गत राजकीय, लष्करी, राजनैतिक आणि माहितीविषयक साधने एकमेकांशी सुसंवाद राखून कार्य करतात आणि दीर्घकालीन हितसंबंधांची प्रधानता, ज्यामध्ये तात्कालिक प्रतिक्रिया राष्ट्रीय हिताशी सुसंगत असतात. ही चौकट भारताच्या व्यापक आकांक्षांशी खोलवर जोडलेली आहे. एक विकसित आणि समृद्ध राष्ट्राची संकल्पना निरंतर आर्थिक गतीची मागणी करते. व्यापक संघर्ष त्या परिस्थितींमध्ये अडथळा आणतात, ज्या विकास शक्य बनवतात: गुंतवणूकदारांचा विश्वास, पायाभूत सुविधांचा विकास आणि सामाजिक ऐक्य. म्हणूनच भारताचा धोरणात्मक संयम ही त्याची मर्यादा नसून, ती त्याची काळजीपूर्वक निवडलेली प्राथमिकता आहे. हे या समजालाही दर्शवते की राष्ट्रीय शक्तीचा मापदंड केवळ लष्करी क्षमताच नाही, तर आर्थिक सुदृढतेमध्येही दडलेला आहे. अशा काळात, जेव्हा देश अनेकदा दीर्घकाळ चालणाऱ्या संघर्षात अडकतात, तेव्हा भारताने एक वेगळा मार्ग निवडला. हा मार्ग संयमित, सुनियोजित आणि दीर्घकालीन राष्ट्रीय हितांवर आधारित होता. याच मार्गाने भारताच्या जागतिक प्रतिष्ठेला आकार दिला आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




