Mumbai : वरळीत १९ हजार ३३३ मतदार गडबडीतले आहेत; निवडणुकीच्या तोंडावर आदित्य ठाकरेंनी मोठा बॉम्ब टाकला

Mumbai : ठाकरे गटाच्या निर्धार मेळाव्यात आमदार आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर थेट निशाणा साधला. त्यांनी वरळी मतदारसंघातील मतदारयादीत मोठी गडबड झाल्याचा आरोप करत “१९,३३३ मतदार संशयास्पद आहेत” असा दावा केला. “निवडणूक आयोग भाजपसाठी काम करत आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी या मेळाव्यात केला.

आदित्य ठाकरे म्हणाले, “मतदारयादीचं वाचन न झाल्यास बोगस सरकार डोक्यावर बसेल. वरळी मतदारसंघात नैसर्गिक वाढ मानली तरी आकडेवारीत अनियमितता स्पष्ट दिसते. मृत व्यक्तींची नावे यादीत असून त्यांनी मतदान केल्याची उदाहरणेही मिळाली आहेत.”

Nagpur: : अजित पवारांच्या राष्ट्रवादी कार्यालयात लावणीचा ठसका; महिला पदाधिकाऱ्यांच्या अदांनी सगळे फिदा, व्हिडिओ व्हायरल

त्यांनी पुढे सांगितले, “लोकसभेपासून विधानसभेपर्यंत १६,०४३ मतांची वाढ झाली असून, मतदारयादीतील फोटो भूरकट आहेत. काही ठिकाणी एका व्यक्तीचे अनेक नोंदी दिसत आहेत. निवडणूक आयोगाकडे अशा चुका पकडणारे सॉफ्टवेअर असूनही कारवाई होत नाही.”

“वरळीत २२ ते २३ हजार मतदारांमध्ये गडबड असण्याची शक्यता आहे. अजून यादीचे वाचन सुरू असून खरी आकडेवारी आणखी मोठी असू शकते,” असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला. या भाषणानंतर ठाकरेंच्या आरोपांमुळे मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *