Pandharpur : आधी बायकोची मुलांसोबत आत्महत्या, नवऱ्यानंही उचललं टोकाचं पाऊल; पंढरपूर हादरलं

Pandharpur : पंढरपुरातून एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून आसबे कुटुंबीयांनी टोकाचं पाऊल उचललं. आधी पत्नीने दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. नंतर पतीने घरात गळफास घेत आयुष्य संपवलं. या घटनेनंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

पंढरपूर तालुक्यातील कासेगावात ही धक्कादायक घटना घडली. ४ जुलै रोजी पत्नी मोनाली म्हमाजी आसबे आणि पती म्हमाजी आसबे यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. वाद टोकाला गेला. यानंतर पत्नीने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. घटनेच्या दिवशी मोनाली म्हमाजी आसबे आपल्या दोन चिमुकल्या मुलांसह गावातील विहिरीजवळ गेल्या.

नंतर मोनालीने आपल्या मुलांसह आत्महत्या केली. पत्नी आणि मुलांनी आत्महत्या केल्यामुळे पतीला मानसिक धक्का बसला. त्यानं ५ जुलै रोजी सकाळी गळफास घेत स्वतःला संपवलं. या घटनेने एकाच घरातील चार जणांनी आपली जीवनयात्रा संपवली. राग आणि वादामुळे एका कुटुंबाचा अंत झाला.

Heavy Rain : नाशिक, भंडाऱ्यात पावसाची संततधार; बागलाण मधील हरणबारी धरण ओव्हरफ्लो

या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण गाव हादरलं आहे. स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

आषाढी एकादशीच्या दिवशी दर्शन घेतल्यानंतर ३४ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या

छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज रांजणगाव येथे राहणाऱ्या ३४ वर्षीय धनंजय आत्माराम पडघम या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी उघडकीस आली. विशेष म्हणजे, आत्महत्या करण्याआधी धनंजयने पंढरपूरला जाऊन विठ्ठल-रुखमाईचे दर्शन घेतले होते. त्याचा व्हिडीओ त्याने शूट करून सोशल मीडियावरही शेअर केला होता. मात्र, रात्रीच त्याने घरात गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *