
Pune : शहरी आणि ग्रामीण भागाचा समावेश असलेल्या हडपसर विधानसभा मतदारसंघातील लढत तिरंगी असली, तरी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात प्रतिष्ठेची लढाई होणार आहे. या भागात विविध समाजांचे वर्चस्व असल्याने जातीय समीकरणेही निर्णायक ठरणार आहेत.
हडपसर मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर या मतदारसंघात तीन वेळा निवडणूक झाली. हा मतदारसंघ पुण्यात येत असला, तरी लोकसभेसाठी हा मतदारसंघ शिरूर मतदारसंघात जातो. त्यामध्ये शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. सध्या राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे चेतन तुपे मतदारसंघाचे आमदार आहेत. या मतदारसंघातून चेतन तुपे महायुतीचे उमेदवार, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे प्रशांत जगताप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे साईनाथ बाबर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही लढाई वर्चस्वाची आणि प्रतिष्ठेची झाल्याचे चित्र आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये हडपसर मतदारसंघ शिवसेनेला (ठाकरे) मिळावा, अशी आग्रही मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. मात्र, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने हा मतदारसंघ स्वत:कडे ठेवण्यात यश मिळविले होते. मात्र, त्यानंतर शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षातील नाराज पदाधिकाऱ्यांनी हडपसर विकास आघाडी स्थापन केली होती. त्याला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील काही माजी नगरसेवकांनीही पक्षाचा राजीनामा देऊन पाठिंबा दर्शविला होता. त्यामुळे सन २०१२ च्या महापालिका निवडणुकीप्रमाणे हडपसर विकास आघाडी लढा देईल, असे चित्र असताना नाराज पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्यात महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना यश आले.
महायुतीचा विचार करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही या मतदारसंघावर दावा केला होता. मात्र, विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. या मतदारसंघात माळी समाजाचे प्राबल्य आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने माजी आमदार योगेश टिळेकर यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे भाजप या मतदारसंघात उमेदवारी देणार नाही, हे स्पष्ट झाले होते. जातीय समीकरणे लक्षात घेऊनच टिळेकर यांना संधी देण्यात आली होती.
या सर्व बाबींचा विचार करता हडपसरमध्ये राष्ट्रवादीविरोधात राष्ट्रवादी अशीच लढत होणार आहे. वर्चस्वाच्या दृष्टीने राष्ट्रवादीसाठी हा मतदारसंघ महत्त्वाचा ठरणार आहे. या मतदारसंघातील तुपे कुटुंबियांचे वर्चस्व, नातीगोती या चेतन तुपे यांच्या जमेच्या बाजू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर तुपे यांनी प्रारंभी तटस्थ भूमिका घेतली होती. मात्र, त्यानंतर ते अजित पवार यांच्या गोटात गेले. काही दिवसांपूर्वी ते शरद पवार यांना साथ देणार असल्याची चर्चाही मतदारसंघात रंगली होती.
प्रशांत जगताप यांचा विचार करता त्यांनी शहराचे महापौर म्हणून काम केले आहे. वानवडी प्रभागात त्यांची मोठी ताकद आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षाची ताकद जगताप यांच्या मागे आहे. या मतदारसंघात मनसेचीही ठरावीक भागात मतपेढी आहे. हडपसर मतदारसंघात काही मुस्लिमबहुल भागही येत असल्याने मनसेचे उमेदवार बाबर यांच्यापुढे आव्हान असणार आहे. बाबर कोणत्या राष्ट्रवादी काँग्रेसची मते घेणार, ही बाबही दोन्ही राष्ट्रवादीसाठी निर्णायक ठरणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीतही मनसे उमेदवारामुळे भाजप उमेदवाराचा पराभव झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे मनसेची काही मतेही निर्णायक ठरणार आहेत.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



