
Eknath Shinde : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पालघरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवण बंदराचा पायाभरणीचा शुभारंभ केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आदी नेते यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा प्रकल्प गेमचेंजर ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
"आजचा दिवस पालघरच्या इतिहासात व महाराष्ट्राच्या व देशाच्या इतिहासातील सोनेरी दिवस आहे. हा प्रकल्प गेम चेंजर प्रकल्प आहे. महाराष्ट्राला तर याचा फायदा होईलच, पण आपल्या देशाला व पालघरच्या जनतेला सर्वाधिक होईल.आज मोदींच्या हस्ते हे भूमिपूजन होत आहे, मोदींच्या हातात सफलतेचा पारस आहे. जसे भूमिपूजन झाले, तसेच बंदराचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होईल, असा विश्वास व्यक्त करतो," असे मुख्यंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
|
|
तसेच "पंतप्रधान मोदींच्याच हस्ते भूमिपूजन व्हावा असा योग असणार, त्यामुळे इतक्या वर्षांनंतर हे बंदर मार्गी लागत आहे. डहाणू पालघर हे जगाच्या नकाशावर मोलाचे स्थान मिळवणार आहे. हे महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे आहे, या बंदरामुळे आयात व निर्यातीस चालना मिळेल. भारत जागतिक व्यापारात अजून समर्थ पणे उतरू शकेल," असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
"स्थानिकांना रोजगार, नोकरी मिळेल, वाढवण बंदर विकासात मच्छीमार बंदर व स्थानिकांना न्याय दिला जाईल. कुणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही, पर्यावरणाची आपण काळजी घेत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आपण चालवत आहोत. आता नरीमन पॉईंट पासून कोस्टल रोड विरार, ते पालघर पर्यंत आणण्याचा सरकारचा विचार आहे. सिंगापूर, कोलंबो या बंदरांवर आता भारताला अवलंबून राहावे लागणार नाही," असेही ते म्हणाले.
"दिघी पोर्टच्या विकासाला केंद्र सरकारने आता हिरवा झेंडा दाखवला आहे. म्हणून दिघी पोर्ट शेजारी हे दुसरे औद्योगिक मोठे बंदर असेल. पंतप्रधानांचे मी आभार मानतो. मुंबईला वैष्विक फिनटेक शहरात बदलण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. मुंबई महानगरासह पालघर, रायगड विकासावर आता लक्ष केंद्रित केले जाते आहे. २०३० पर्यंत २६ लाख कोटींपर्यंत एमएमआर विभागाची उलाढाल नेण्याचा विचार आहे. मोदींच्या नेतृत्वात आता देश आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. २०४७ पर्यंत विकसित भारत जगाची महासत्ता म्हणून उदयास येईल," असे प्रतिपादन एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



