
Pune : देशभरात गेल्या वर्षी कमी पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे मका उत्पादनात घट झाली आहे. दुसरीकडे कुक्कुटपालन, पशुखाद्य, प्रक्रिया उद्योग, कापड उद्योग आणि इथेनॉल निर्मितीसाठी मक्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे बाजारात मक्याचा खडखडाट आहे. मकाटंचाईचा मोठा फटका कुक्कुटपालन व्यवसायाला बसत आहे.
देशात दर वर्षी सरासरी ३५० ते ३८० लाख टन मक्याचे उत्पादन होते. तर देशांतर्गत मक्याची मागणी सुमारे ४०० लाख टन आहे. त्यामुळे दर वर्षी मक्याचा काही प्रमाणात तुटवडा असतोच. खरीप आणि रब्बी हे मका उत्पादनाचे दोन प्रमुख हंगाम असले, तरीही देशाच्या कोणत्या ना कोणत्या राज्यात जवळपास वर्षभर मक्याची लागवड होते. त्यामुळे मागणी – पुरवठ्याची साखळी वर्षभर सुरू असते. पावसाळ्याच्या पहिल्या टप्प्यात दर वर्षी बिहारमधील मका देशभराची गरज पूर्ण करतो. बिहार सरकारने जैवइंधनाला प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे बिहारच्या मक्याला बिहारमधूनच मागणी वाढली आहे. साधारण १७ -१८ रुपये प्रतिकिलो दराने मिळणारा मका बिहारमध्येच २२ ते २३ रुपयांनी विकला जात आहे. प्रामुख्याने इथेनॉल किंवा जैव इंधनासाठी मक्याचा वापर वाढल्याचा थेट फटका कुक्कुटपालन व्यवसायाला बसत आहे.
|
|
राज्यातील बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना मक्याला प्रतिकिलो २२ ते २८ रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे, तर कुक्कुटपालकांना सध्या बाजारातून २८ ते ३० रुपये किलो दराने मका विकत घ्यावा लागत आहे. कोंबड्यांच्या एकूण खाद्यात मक्याचा वापर ६० टक्क्यांपर्यंत असतो. अडचणीच्या काळात मक्याला पर्याय म्हणून काही प्रमाणात कमी दर्जाच्या तांदळाचा वापर केला जातो. यंदा अपेक्षित प्रमाणात तांदूळही मिळत नाही. कोंबड्याच्या खाद्याच्या दरात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तितकी वाढ चिकन आणि अंड्यांच्या विक्री दरात झालेली नाही. त्यामुळे कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत आला आहे. महाराष्ट्र राज्य पोल्ट्री फॉर्मर्स ॲण्ड ब्रीडर्स असोसिएशनने केंद्र सरकारकडे बाजारातील मक्याची टंचाई दूर करण्यासाठी आयात कर हटवून मका आयात करण्याची मागणी केली आहे.
मक्याच्या दरवाढीमुळे कोंबडी खाद्याच्या खर्चात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. पुढे श्रावण महिना असल्यामुळे चिकन, अंड्याच्या दरात पडझड होणार आहे. कुक्कुटपालकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने आयात कर हटवून मक्याच्या आयातीला परवानगी द्यावी, तसेच अतिरिक्त आणि कमी दर्जाचा तांदूळ उपलब्ध करून द्यावा. – संजय नळगीरकर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पोल्ट्री फॉर्मर्स ॲण्ड ब्रीडर्स असोसिएशन
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



