
Ganpat Gaikwad : द्वारली गावातील जमिनीच्या वादातून भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात हिल लाईन पोलीस ठाण्यातच रक्तरंजित थरार घडला. द्वारली गावातील शेतकऱ्यांनी आमदार गणपत गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मात्र याच जमिनीच्या वादातून कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्या विरोधात देखील हिललाईन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती आता उघडकीस आली आहे. कल्याण पश्चिमेतील बांधकाम व्यावसायिक जितेंद्र पारिक (वय 37) यांच्या तक्रारीवरुन महेश यांच्यासह राहूल पाटील, अक्षय गायकवाड, किरण फुलोरे, सुनिल जाधव आणि एकनाथ जाधव व 60 ते 70 जण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दाखल गुन्ह्याबाबत पोलिसांनी कमालीची गुप्तता बाळगली होती, परंतू या दाखल गुन्ह्याचे प्रकरण उघड झाले आहे.
|
Nagpur News : नागपूर जिल्ह्यासाठी आऊटर रिंग रोड ‘लाईफलाईन’ ठरेल: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस |
अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावातील जमिनीच्या वादातून भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील वाद समोर आला आहे. यापूर्वी देखील कल्याण पूर्वेत भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यातील वाद चव्हाट्यावर आले आहेत. परंतु द्वारली गावातील जमिनीच्या वादातून दोन्ही गायकवाडांमध्ये उडालेले खटके टोकाला गेले असून यातूनच आमदार गायकवाड यांनी महेश यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळी झाडली.
याच वादातून नीता शिंदे यांच्या तक्रारीवरुन आमदार गणपत गायकवाड यांच्यासह 7 जणांवर हिललाईन पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे गायकवाड यांच्या अडचणीत वाढ झाली असल्याचे बोलले जात आहे. मात्र याच प्रकरणावरुन आता महेश गायकवाड यांच्यासह त्यांचे 5 साथीदार व 60 ते 70 जणांविरोधात विकसित करण्यात येत असलेल्या जागेत बेकायदा घुसून नुकसान केल्याचा आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण पश्चिमेतील बांधकाम व्यावसायिक जितेंद्र पारीक यांच्या तक्रारीवरुन 2 तारखेला हिललाईन पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल तक्रारीनुसार वरटॅक्स स्काय व्हिला बांधकाम कंपनीचे संचालक पारीक तसेच मे. फेअरडील डेव्हलपर्स भागीदार संस्थेचे प्रमोद रंका यांचे द्वारली येथे भागीदारी पध्दतीने जमीन विकसित, गृहप्रकल्प विकसित करण्याचे काम प्रस्तावित आहे. खरेदी-विक्री व्यवहाराने ही जमीन भागीदारांनी कब्जात घेतली आहे.
31 जानेवारीला दुपारी 1.30 वाजता तसेच 2 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजता या जागेत महेश गायकवाड, राहूल पाटील, एकनाथ जाधव, किरण फुलोरे, सुनिल जाधव, अक्षय गायकवाड यांसह 60 ते 70 स्थानिक नागरिक तक्रारदारांच्या मालकी हक्काच्या जागेत बेकायदा घुसले. तेथील सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांना न जुमानता त्या जमावाने जागेत जबरदस्ती घुसून जागेवर आमचा कब्जा असल्याचे सांगून ती जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. तेथील कामगारांना दमदाटी, शिवीगाळ करुन तेथील काम बंद पाडले. बांधकामाच्या ठिकाणचे लोखंडी खांब व संरक्षित भिंत म्हणून लावलेले पत्रे उखडून फेकून दिले. बेकायदा जमाव जमवून तक्रारदार जितेंद्र पारीख यांच्या जागेत घुसखोरी केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली.
कल्याण शहर प्रमुख महेश यांच्याविरोधात देखील या जमिनीच्या वादातून गुन्हा दाखल असल्याबाबत कमालीची गुप्तता पोलिसांनी बाळगली होती. पत्रकारांनी त्यांना याप्रकरणी विचारणा देखील केली मात्र हिललाईन ऐवजी इतर पोलिस स्थानकांची नावे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न पोलिस करत होते. अखेर ही बाब उघडकीस आली आहे.
शहर
- चेन्नई: थलपती विजय भारताचे पंतप्रधानच काय, अमेरिकेचे अध्यक्षही होऊ शकतात; ई. पलानीस्वामींचा उपरोधिक टोला
- पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाइन फ्लूचा विळखा! एका महिन्यात २३ रुग्ण पॉझिटिव्ह; आरोग्य विभागाकडून तातडीने वैद्यकीय तपासणी करण्याचे आवाहन
- पुणे: मेसमधील निकृष्ट जेवण अन् पंतप्रधान मोदींच्या फोटोवरून पुण्याचे शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज आले चर्चेत
- मुंबई: राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! नवरात्रीपूर्वी उद्धव ठाकरेंचे १४ आमदार शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता, राजकीय सूत्रांची माहिती
महाराष्ट्र
- मुंबई: मनसेच्या त्या गुंडांना त्वरित अटक झालीच पाहिजे; भाजप युवा मोर्चाचे नेते कृष्णराज महाडिक आक्रमक, पोलीस कारवाईची मागणी
- कोल्हापुर: बिबट्याचा थरारक हल्ला! भुदरगड तालुक्यात गुरे चरण्यासाठी गेलेल्या दोन शेतकऱ्यांवर झडप, एक जण गंभीर जखमी
- सांगली: चालकाला अचानक चक्कर आल्याने एसटी बस थेट चहाच्या टपरीवर धडकली; टळला मोठा अनर्थ, सर्व प्रवासी सुखरूप
- जालना: उपोषणाचा चौथा दिवस! मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, मळमळ अन् उलट्यांचा त्रास; वैद्यकीय तपासणीस स्पष्ट नकार
गुन्हा
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- पश्चिम बंगाल: ममता बॅनर्जींच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर! भाचीचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू; नोकरी गेल्यामुळे आणि घटस्फोटाच्या प्रकरणामुळे होती तणावात
- उत्तर प्रदेश: आग्रा येथे संतापजनक प्रकार! माजी राष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडूवर पतीकडून हॉटेलमध्ये चाकूने प्राणघातक हल्ला
- नवी दिल्ली: जग चौफेर संकटात, पण भारताची वेगाने प्रगती पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला 'झूठ की गुंज' म्हणत टोला
- उत्तर प्रदेश: कौशांबीत पटाखा कारखान्यात भीषण स्फोट; महिला व बालकांसह ७ ते ८ जणांचा मृत्यू, परिसर हादरला






























Subscribe to my channel


