
बेळगाव : पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाल्याचे कारण देत आलमट्टी धरणातील विसर्ग कमी करण्यात आला आहे. शुक्रवारी (ता. २८) दुपारी तीनपासून धरणातून विसर्ग १ लाख २५ हजार क्युसेक करण्यात आला आहे.
कर्नाटक राज्य पाटबंधारे खात्याकडून ही माहिती देण्यात आली आहे. गुरुवारी (ता. २७) धरणातील पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला होता. सकाळी सहा वाजता जलाशयातून १ लाख २५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. दुपारी बारा वाजता विसर्ग १ लाख ५० हजार क्युसेक झाला. तर, सायंकाळी सहा वाजता विसर्ग तब्बल १ लाख ७५ हजार क्युसेक इतका केला होता; पण गुरुवारी सायंकाळपासून आलमट्टी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाल्याचे पाटबंधारे खात्याचे म्हणने आहे. त्यामुळेच धरणातील पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे विसर्ग कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाटबंधारे खात्याने धरणाची क्षमता १२३.०१ टीएमसी इतकी आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजता धरणातील पाणीसाठा ८८.५०३ टीएमसी इतका होता. म्हणजे धरण ७१.०९ टक्के इतके भरले आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक दीड लाख क्युसेकपर्यंत झाल्यानंतर विसर्ग कमी करण्याचा निर्णय घेतला.
पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढल्यानंतर आलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्याची मागणी होत होती. धरणातील पाण्याची आवक व विसर्ग यासंदर्भात माहिती घेण्यासाठी महाराष्ट्राच्या पाटबंधारे खात्याकडून वरिष्ठ अधिकारी आलमट्टीत नियुक्त केले आहेत. त्यांच्याकडून याबाबतची माहिती वारंवार महाराष्ट्र शासनाला दिली जात आहे.
दोन्ही राज्यांच्या पाटबंधारे खात्याने गतवर्षीपासून समन्वय ठेवल्याने आलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग नियमितपणे केला जात आहे. बेळगाव जिल्ह्यातील हिडकल धरणाची पाण्याची पातळीही वाढली आहे. हिडकल धरणाची क्षमता ५१ टीएमसी आहे.
शुक्रवारी (ता. २८) धरणातील एकूण पाणीसाठा ३१.६५८ टीएमसी तर जिवंत पाणीसाठा २९.६३८ टीएमसी इतका होता. पण गतवर्षीच्या तुलनेत यंदा हिडकलमधील पाणीसाठा कमी आहे. गतवर्षी २८ जुलै रोजी हिडकल धरणातील एकूण पाणीसाठा ३६.८२६ टीएमसी होता तर जिवंत पाणीसाठा ३४.८०६ टीएमसी इतका होता.
|
|
हिडकलमधून विसर्ग नाही’
गतवर्षीच्या तुलनेत यंदा हिडकलमधील पाण्याची आवक मात्र जास्त आहे. गतवर्षी २८ जुलैला धरणातील पाण्याची आवक ४,७१२ क्युसेक्स होती. यंदा मात्र तब्बल २९ हजार ४१५ क्युसेक्स आवक आहे. हिडकल अद्याप पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. त्यामुळे धरणातून अद्याप विसर्ग सुरू झालेला नाही.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




