सकाळी उठल्यावर सर्वात आधी आपण प्रत्येकजण व्यायाम, जिम, तसेच योगा असे रोजच्या रूटिंग फॉलो करतो. अशातच राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) मधील आरोग्य तज्ञ शिफारस करतात की तुमच्या दिवसाची सुरुवात एका ग्लास साधं पाणी पिऊन करावी. ही साधी सवय शरीराला त्वरित हायड्रेट करते आणि संपूर्ण दिवसासाठी ऊर्जा आणि सकारात्मकता प्रदान करते. एनएचएमच्या मते रात्रभर आपल्या शरीरात पाण्याचे सेवन होत नाही, ज्यामुळे सकाळी डिहायड्रेशन होते. एक ग्लास पाणी प्यायल्याने ही कमतरता लगेच भरून निघते आणि शरीराला पुन्हा ताजेतवाने बनवते.
आरोग्य तज्ञ सांगतात की सकाळी उठल्यावर सर्वात आधी एक किंवा दोन ग्लास कोमट पाणी प्यावे. यामध्ये तुम्ही लिंबू किंवा मध मिक्स देखील करू शकता, परंतु साधं पाणी सर्वोत्तम आहे. खूप थंड किंवा खूप गरम पाणी पिणे टाळा. हळूहळू घोट घोट करून पाणी प्या आणि एकाच वेळी जास्त पिऊ नका. ही छोटीशी सवय तुमच्या दैनंदिन दिनचर्येत समाविष्ट केल्याने तुम्ही दीर्घकाळ निरोगी राहू शकता. सकाळी पाण्याने सुरुवात केल्याने तुमचा संपुर्ण दिवस ताजेतवाने, ऊर्जावान आणि सकारात्मक राहते.
सकाळी रिकाम्यापोटी कोमट पाणी प्यायल्याने आरोग्यास होतात हे फायदे
पचनसंस्था
सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते, रोगप्रतिकारक शक्ती सुधारते आणि रोगांशी लढण्याची क्षमता वाढवते. सकाळी पाणी प्यायल्याने आतड्यांची हालचाल उत्तेजित होते, पोट स्वच्छ राहते आणि अन्न योग्यरित्या पचण्यास मदत होते. यामुळे आम्लता आणि वायूसारख्या समस्या देखील कमी होतात, पचनसंस्था मजबूत होते.
वजन कमी होणे
सकाळी एक ग्लास पाणी वजन कमी करण्यास देखील मदत करते. सकाळी पाणी प्यायल्यामुळे चयापचय वाढते, कॅलरी बर्निंग वेगवान होते आणि भूक नियंत्रित होते, ज्यामुळे वजन कमी होण्यास हातभार लागतो. पुरेसे पाणी प्यायल्याने त्वचा हायड्रेट राहते, ज्यामुळे त्वचेवर चमकदार रंग येतो, सुरकुत्या कमी होतात आणि मुरुमांसारख्या समस्या येतात.
बद्धकोष्ठता
बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांना एक ग्लास पाणी प्यायल्याने आराम मिळतो. सकाळी पाणी प्यायल्याने आतडे हायड्रेट राहण्यास मदत होते आणि आतड्यांची हालचाल सुलभ होते. ही सवय नियमितपणे अंगीकारल्याने बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel




