महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळ लवकरच एक मोठा बदल करणार आहे. गेल्या काही वर्षांतील आर्थिक चणचण आणि बसेसची कमतरता यावर मात करण्यासाठी परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटीला नवसंजीवनी देणारा कृती आराखडा जाहीर केला आहे. यानुसार एसटीच्या ताफ्यात ८,३०० नवीन बसेस दाखल होणार आहे. तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी १११ कोटी रुपयांचा डिजीटल प्रकल्प राबवण्यात येणार आहे.
नव्या बसेसचा ताफा: प्रवाशांची प्रतीक्षा संपणार
कोरोनापूर्व काळात एसटीकडे सुमारे १९,००० बसेस होत्या. मात्र निवृत्त होणाऱ्या बसेस आणि नवीन खरेदी अभावी ही संख्या १२,६०० पर्यंत खाली आली होती. आता शासनाने टप्प्याटप्प्याने बसेस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर राजमाता जिजाऊ बसेस सुरु करण्यात येणार आहे. येत्या मार्च महिन्यापासून ३,००० नवीन ‘३x२’ आसन रचनेच्या ५५ आसनी बसेस ताफ्यात येतील. या बसेस प्रामुख्याने दोन शहरांदरम्यानच्या गर्दीच्या मार्गांवर धावतील.
तसेच ग्रामीण व दुर्गम भागात ५,००० साध्या बसेसची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. दुर्गम व आदिवासी भागासाठी १०० मिडी बसेसही दाखल केल्या जाणार आहेत. खाजगी ट्रॅव्हल्सशी स्पर्धा करण्यासाठी २०० अत्याधुनिक (Premium) बसेसची खरेदी केली जाणार आहे.
आर्थिक गणिताची जुळवाजुळव
सध्या एसटीला दररोज १ ते १.५ कोटी रुपयांची तूट सहन करावी लागत आहे. सध्या एसटीचा खर्च ३५ कोटी असून त्याचे उत्पन्न ३३.५ कोटी इतके आहे. मात्र, महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत आणि ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास या योजनांमुळे प्रवाशांचा ओघ वाढला आहे. “बसेस वाढल्या की प्रवासी वाढतील आणि प्रवासी वाढले की उत्पन्न वाढून एसटी या वर्षाखेर आर्थिक गर्तेतून बाहेर येईल,” असा विश्वास मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.
सुरक्षेसाठी ७,०३५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे
एसटी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी १११ कोटी रुपये खर्चून डिजीटल सुरक्षा कवच तयार करण्यात येत आहे. राज्यातील ६३३ महत्त्वाच्या ठिकाणी (बसस्थानके, आगार, विभागीय कार्यालये, कार्यशाळा) एकूण ७,०३५ कॅमेरे बसवले जातील. यात पहिल्या टप्प्यात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर विभागातील ६४ संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कार्यान्वित झाले आहेत. मुंबईत उभारलेल्या मध्यवर्ती नियंत्रण कक्षातून संपूर्ण राज्यातील हालचालींवर लक्ष ठेवले जाईल. टेलिकम्युनिकेशन इंडिया लिमिटेड ही संस्था या प्रकल्पाचे काम पाहत आहे.
दरम्यान सध्या एसटीने दररोज ५० लाख प्रवासी प्रवास करतात. नवीन ८,३०० बसेस ताफ्यात आल्यानंतर हे लक्ष्य ७० ते ७५ लाखांपर्यंत नेण्याचे महामंडळाचे मानस आहे. यामुळे ग्रामीण भागातील मुक्कामी फेऱ्या आणि शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होण्यास मदत होईल.
[embedded content]
शहर
- पुणे: हो, आमच्याकडून चुका झाल्या, आवाज आणि स्पर्धा वाढली, आता नियमांचे पालन करू गणेशोत्सवापूर्वी पुणे साऊंड व्यावसायिकांची मोठी कबुली!
- पुणे: यंदाच्या उत्सवात पुणेकरांना अनुभवायला मिळणार कामाचा माणूस, अजितदादांच्या प्रशासकीय शैलीवर आधारित लक्षवेधी हलते देखावे!
- नाशिक: रस्त्यावरील चिखलामुळे दुचाकी घसरली, पाठीमागून आलेल्या बसच्या धडकेत विवाहितेचा जागीच मृत्यू
- पुणे: एक मराठा, लाख मराठा च्या गगनभेदी घोषणा; मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ पुण्यातील कात्रज चौकात मराठा समाज आक्रमक, केला रास्ता रोको
महाराष्ट्र
- पुणे: दहीहंडी वाहतूक अलर्ट; शहरात मोठे वाहतूक बदल आणि निर्बंध लागू, प्रशासनाकडून पर्यायी मार्गांची घोषणा!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- नाशिक: आदिवासी मंत्र्यांच्या राजीनाम्यावर भर द्या; राहुल गांधींच्या दीर्घकालीन बैठकीनंतर आंदोलक विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या सूचना!
- अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ३८ लाखांचा आर्थिक घोटाळा; संशोधन संचालकांसह ७ जणांवर फौजदारी गुन्हा दाखल!
गुन्हा
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
- सांगली: पलूसमध्ये घरगुती वादातून पती-पत्नीचे टोकाचे पाऊल; विषारी औषध प्राशन करून दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू
- उत्तर प्रदेश: आग्रा येथे संतापजनक प्रकार! माजी राष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडूवर पतीकडून हॉटेलमध्ये चाकूने प्राणघातक हल्ला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- अयोध्या: राम मंदिरात ऐतिहासिक निर्णय; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या सीईओ पदी नियुक्ती
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड
- उत्तराखंड: पूर आलेली नदी पार करताना हातातून निसटली चिमुकली, लेकीला वाचवण्यासाठी आईने पाण्यात मारली उडी अन् दोघींचाही मृत्यू
- चेन्नई: थलपती विजय भारताचे पंतप्रधानच काय, अमेरिकेचे अध्यक्षही होऊ शकतात; ई. पलानीस्वामींचा उपरोधिक टोला




























Subscribe to my channel




