
U19 T20 World Cup Ind vs Eng : अंडर-19 महिला टी-20 विश्वचषकाची पहिली आवृत्ती जिंकून टीम इंडियाला इतिहास रचला आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा सात विकेट्सनी पराभव करत ही स्पर्धा जिंकली आहे.या वर्षी पहिल्यांदाच अंडर-19 महिला टी 20 विश्वचषक खेळला गेला. त्यामुळे विजेत्या भारतीय संघाचे नाव इतिहासात नोंदवले गेले आहे. शेफालीने धोनीच्या 2007 च्या कारनाम्याची पुनरावृत्ती केली आहे.
16 वर्षांपूर्वी 2007 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली, भारत प्रथमच टी 20 विश्वविजेता बनला आणि 1983 नंतर भारतीय संघाने प्रथमच विश्वचषक जिंकला. आज शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारताचा महिला संघांने देखील पहिला अंडर -19 क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे.
2007 मध्ये पहिल्यांदा टी20 वर्ल्ड कप खेळवण्यात आला
2007 मध्ये पुरुषांचा टी20 विश्वचषक पहिल्यांदा खेळला गेला. टी20 फॉर्मेटमध्ये विश्वचषक आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ होती. त्याचप्रमाणे महिला अंडर-19 टी-20 विश्वचषकही प्रथमच खेळवला जात आहे.याआधी पुरुष क्रिकेटमध्ये फक्त अंडर-19 विश्वचषक होता आणि तोही एकदिवसीय प्रकारात. महिला अंडर-19 विश्वचषक पहिल्यांदाच होत आहे. तोही टी-20 फॉरमॅटमध्ये. म्हणजेच धोनी आणि शेफालीमध्ये ही एक गोष्ट समान आहे.
तसेच 2007 मध्ये झालेला सामना दक्षिण अफ्रिका येथे खेळवण्यात आला होता. तेव्हा धोनीने टीम इंडियाला चॅम्पियन बनवले होते. आता महिली अंडर-19 टी20 सामन्याचे आयोजनदेखील दक्षिण अफ्रिकामध्ये करण्यात आले होते आणि भारतीय महिला संघ विजेता ठरला आहे.प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने भारतासमोर 69 धावांचे माफक लक्ष्य ठेवले होते. टीम इंडियाने ते सात विकेट्स गमावून पूर्ण केले.
भारतीय अंडर-19 महिला संघाने T20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा सात गडी राखून पराभव केला. भारताने 36 चेंडू शिल्लक असताना सहज लक्ष्य गाठले. सौम्या तिवारी 24 धावा करून नाबाद राहिली. तेथे जी. त्रिशानेही 24 धावांची खेळी खेळली. कर्णधार शेफाली वर्माने 15 धावांचे योगदान दिले.
भारतीय कर्णधार शफाली वर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर संपूर्ण इंग्लिश संघाला केवळ 68 धावांत गुंडाळले. तितास संधू, अर्चना देवी आणि पार्श्वी चोप्रा यांनी 2-2 विकेट घेतल्या. मन्नत कश्यप, शेफाली वर्मा आणि सोनम यादव यांनी 1-1 विकेट घेतली.
शहर
- "भारताच्या अण्वस्त्र धोरणात ऐतिहासिक बदल; एकूण अण्वस्त्रांची संख्या १९० वर, शेजाऱ्यांना धडकी!"
- सावध राहा! सोलापुरातील 'या' १५ शाळा आहेत बेकायदेशीर; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना आवाहन!
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
महाराष्ट्र
- जळगाव: काळाचा क्रूर खेळ! कार-एसटी आणि दुचाकीच्या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू; दोन आनंदी संसार उध्वस्त.
- सावध राहा! सोलापुरातील 'या' १५ शाळा आहेत बेकायदेशीर; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना आवाहन!
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
गुन्हा
- गडचिरोली: माणुसकीला काळीमा! नवीन घराच्या गच्चीवर ७ वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग; नराधम पेंटरला बेड्या
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- रेल्वे: ४० वर्षे जुनी प्रणाली होणार कालबाह्य, ऑगस्टपासून एआय (AI) आधारित अत्याधुनिक प्रणालीची सुरुवात!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला


























Subscribe to my channel

