
U19 T20 World Cup Ind vs Eng : अंडर-19 महिला टी-20 विश्वचषकाची पहिली आवृत्ती जिंकून टीम इंडियाला इतिहास रचला आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा सात विकेट्सनी पराभव करत ही स्पर्धा जिंकली आहे.या वर्षी पहिल्यांदाच अंडर-19 महिला टी 20 विश्वचषक खेळला गेला. त्यामुळे विजेत्या भारतीय संघाचे नाव इतिहासात नोंदवले गेले आहे. शेफालीने धोनीच्या 2007 च्या कारनाम्याची पुनरावृत्ती केली आहे.
16 वर्षांपूर्वी 2007 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली, भारत प्रथमच टी 20 विश्वविजेता बनला आणि 1983 नंतर भारतीय संघाने प्रथमच विश्वचषक जिंकला. आज शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारताचा महिला संघांने देखील पहिला अंडर -19 क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे.
2007 मध्ये पहिल्यांदा टी20 वर्ल्ड कप खेळवण्यात आला
2007 मध्ये पुरुषांचा टी20 विश्वचषक पहिल्यांदा खेळला गेला. टी20 फॉर्मेटमध्ये विश्वचषक आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ होती. त्याचप्रमाणे महिला अंडर-19 टी-20 विश्वचषकही प्रथमच खेळवला जात आहे.याआधी पुरुष क्रिकेटमध्ये फक्त अंडर-19 विश्वचषक होता आणि तोही एकदिवसीय प्रकारात. महिला अंडर-19 विश्वचषक पहिल्यांदाच होत आहे. तोही टी-20 फॉरमॅटमध्ये. म्हणजेच धोनी आणि शेफालीमध्ये ही एक गोष्ट समान आहे.
तसेच 2007 मध्ये झालेला सामना दक्षिण अफ्रिका येथे खेळवण्यात आला होता. तेव्हा धोनीने टीम इंडियाला चॅम्पियन बनवले होते. आता महिली अंडर-19 टी20 सामन्याचे आयोजनदेखील दक्षिण अफ्रिकामध्ये करण्यात आले होते आणि भारतीय महिला संघ विजेता ठरला आहे.प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने भारतासमोर 69 धावांचे माफक लक्ष्य ठेवले होते. टीम इंडियाने ते सात विकेट्स गमावून पूर्ण केले.
भारतीय अंडर-19 महिला संघाने T20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा सात गडी राखून पराभव केला. भारताने 36 चेंडू शिल्लक असताना सहज लक्ष्य गाठले. सौम्या तिवारी 24 धावा करून नाबाद राहिली. तेथे जी. त्रिशानेही 24 धावांची खेळी खेळली. कर्णधार शेफाली वर्माने 15 धावांचे योगदान दिले.
भारतीय कर्णधार शफाली वर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर संपूर्ण इंग्लिश संघाला केवळ 68 धावांत गुंडाळले. तितास संधू, अर्चना देवी आणि पार्श्वी चोप्रा यांनी 2-2 विकेट घेतल्या. मन्नत कश्यप, शेफाली वर्मा आणि सोनम यादव यांनी 1-1 विकेट घेतली.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




