
Pune : गेल्या अनेक वर्षांपासून फक्त चर्चेत असणारा पुणे ते मुंबईदरम्यानच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेचा प्रश्न कायम आहे. त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये घोषणादेखील झाली. परंतु त्याचे काम कधी सुरू होणार असा प्रश्न आहे. या दोन मार्गिका सुरू झाल्यास मार्गावरील गाड्यांची संख्यादेखील वाढवता येईल; तसेच लोकल गाड्यांनादेखील त्याचा फायदा होऊ शकतो. रेल्वे गाड्यांची संख्या वाढवल्यास रस्ते वाहतुकीवरील ताणसुद्धा कमी होऊ शकतो. त्यामुळे या गोष्टींकडे सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
सहा तास रेल्वे गाड्याच नाही
पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या सकाळच्या प्रमुख रेल्वेगाड्या सकाळी साडेनऊ वाजेपर्यंतच उपलब्ध असून, त्यानंतर तब्बल सहा तासांचा खंड पडत असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही दिवस बाहेरून येणाऱ्या गाड्या असल्या, तरी त्या फुल्ल असतात. वाढती प्रवासी संख्या आणि कार्यालयीन ये-जा लक्षात घेता सकाळी साडेनऊनंतर किमान दर तासाला एक गाडी सुरू करण्याची मागणी प्रवासी संघटना व नियमित प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
|
|
एसटी बसलाही प्रचंड गर्दी
पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या मार्गावर धावणाऱ्या एसटी बसलादेखील कायम गर्दी असते. व्यवसाय, नोकरी, सरकारी कामासाठी मुंबईला जाणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. पुण्यातून मुंबईला जाण्यासाठी सकाळच्या टप्प्यात सिंहगड एक्सप्रेस (६:०५), डेक्कन क्वीन (७:१५), प्रगती एक्सप्रेस (७:४५) आणि वंदे भारत एक्स्प्रेस (९:२०) या प्रमुख गाड्या उपलब्ध आहेत. त्यानंतर पुण्यातून सुटणारी एकही गाडी दुपारी सव्वातीनपर्यंत नाही. बाहेरून येणाऱ्या काही विशेष गाड्या आहेत; पण त्यांना कायम गर्दी असल्यामुळे तिकीट मिळत नाही. दुपारनंतर डेक्कन एक्सप्रेस (३:१५), इंटरसिटी एक्सप्रेस (५:५०) आणि इंद्रायणी एक्सप्रेस (६:३५) या गाड्या आहेत. काही लांब पल्ल्याच्या गाड्या पुण्यातून जात असल्या, तरी त्यांच्या वेळा मध्यरात्र किंवा पहाटेच्या असल्याने त्या सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपयुक्त ठरत नाहीत.
पुण्यातून सकाळी साडेनऊ ते सव्वातीन असे सहा तास मुंबईसाठी गाड्याच नाहीत. त्यामुळे प्रवाशांची मोठी अडचण होते. त्यामुळे प्रवाशांना एसटी अथवा खासगी कॅबचाच पर्याय राहतो. त्यामुळे पुणे-मुंबईदरम्यान खासगी व्यवसायिकांची संख्या मोठी असल्याचे दिसते. या गाड्या ‘एक्स्प्रेस वे’वरून धावत असल्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्यादेखील वाढते. त्यामुळे साडेनऊनंतर किमान एक ते दोन तासांनी मुंबईसाठी रेल्वे गाड्यांची आवश्यकता आहे. पुणे-मुंबईदरम्यानचा प्रवास साधारण तीन ते चार तासांचा असून, हा राज्यातील सर्वाधिक वर्दळीचा मार्ग मानला जातो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त इंटरसिटी अथवा विशेष गाड्या सुरू करून वेळापत्रकातील दरी भरून काढावी, अशी मागणी होत आहे. यामुळे प्रवास अधिक सुलभ, वेळेवर आणि सुरक्षित होईल, असा विश्वास प्रवाशांनी व्यक्त केला आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel


1 thought on “Pune–Mumbai Trains : सकाळी साडेनऊ नंतर थेट ट्रेन नाही; पुणे-मुंबई प्रवाशांचे हाल, तिसऱ्या-चौथ्या मार्गिकेची प्रतीक्षा कायम”