‘भारत जोडो’ यात्रेमुळे सध्या चर्चेत असणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केल्याने वाद निर्माण झाला आहे. सावरकरांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली असा आरोप त्यांनी केली आहे. राहुल गांधींच्या टीकेनंतर भाजपा नेते संताप व्यक्त करत असताना सावरकरांच्या कुटुंबीयांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी राहुल गांधींची गळाभेट घेणाऱ्या आदित्य ठाकरेंना त्यांच्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.
सावरकरांचे पणतू रणजीत सावरकर यांनी पत्रकार परिषद घेत राहुल गांधींच्या टीकेला उत्तर दिलं आहे. आपण राहुल गांधींविरोधात पोलीस तक्रार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. “क्रांतीकारकांशी राहुल गांधी यांचं काही देणंघेणं नाही. पण चंद्रशेखर आझाद, सावरकर देशद्रोही असल्याचं ट्वीट त्यांनी केलं होतं. याविरोधात मी भोईवाडा कोर्टात दाद मागितली होती. कोर्टाने पोलिसांना तपास करण्याचा आदेश दिला होता. पण आता मी दुसरी तक्रार दाखल करणार आहे,” असं रणजीत सावरकर यांनी सांगितलं आहे.
पुढे ते म्हणाले की “ब्रिटिशांनीही कधी सावरकरांनी माफी मागितल्याचं म्हटलेलं नाही. पण दुर्दैवाने आपल्या देशात तसं बोललं जात आहे. मणिशंकर अय्यर यांनी सावरकरांचा अपमान केला होता, तेव्हा बाळासाहेबांनी मुंबईत पाय ठेवू देणार नाही असं सांगितलं होतं. शिवतीर्थावरच जोडे मारो आंदोलन झालं होतं. पण दुर्दैवाने आज त्याच शिवसेनेचे वारस वारंवार सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींबरोबर पदयात्रा काढत आहेत. बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी काँग्रेस नेते स्मृतीस्थळावर येणार असल्याचंही मला कळलं आहे”.
“आज बाळासाहेबांचा स्मृतीदिन आहे. अशा पवित्र दिनीही नाना पटोले यांनी पुन्हा असेच आरोप केले आहे. त्यामुळे बाळासाहेबांचे वारसदार त्यांचं कसं स्वागत करतात हे मला पाहायचं आहे,” असंही ते म्हणाले.
“हिंदुत्ववादी शक्तींकडे सत्ता आली म्हणजेच वाजपेयी सरकार आल्यापासून सावकरांनी माफी मागितली अशा भूमिका घेण्यास सुरुवात झाली. तोपर्यंत इतके वर्ष कोणी काही म्हणत नव्हतं. १० वर्ष सरकार नव्हतं तेव्हा आरोप बंद झाले होते. पण २०१४ मध्ये सत्ता गेल्यानंतर पुन्हा आरोप सुरु झाले. त्यामुळे हा फक्त सत्तेचा खेळ आहे. सत्तेच्या खेळात महापुरुषाचा अपमान होत असल्याचं यांच्या लक्षात येत नाही आहे,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
“सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर थुंकी तुमच्या अंगावर पडेल असं प्रत्युत्तर त्यांनी नाना पटोलेंना दिलं आहे. सावकरांना बदनाम केलं तर हिदुत्वाची विचारधारा बंद होईल असं त्यांना वाटत आहे. पण ती हजार वर्षांपासूनची विचारधारा आहे. जोपर्यंत हिंदुत्व असेल तोपर्यंतच भारत सर्व धर्मांना समान न्याय देणारा ठरेल,” असंही त्यांनी सांगितलं.
“काँग्रेसबरोबर जावं लागलं तर माझं दुकान बंद करेन असं बाळासाहेब म्हणाले होते. पण आज त्यांच्या स्मृतिदिनी काँग्रेस नेते सावरकरांचा अपमान करतात. त्यांचं शिवसेने कसं स्वागत करते हे जनतेनेही पाहावं. आदित्य ठाकरे यांनी तर राहुल गांधींची गळाभेट घेतली. अशा व्यक्तीचा सहवासही तुम्ही टाळला पाहिजे. तुम्ही त्यांना ठामपणे आम्ही सावकरांचा अपमान सहन करणार नाही असं सांगितलं पाहिजे,” असा सल्ला रणजीत सावरकर यांनी दिला आहे.
एकीकडे देशासाठी अवघ्या २४ व्या वर्षी बलिदान देणारे बिरसा मुंडा आहेत आणि दुसरीकडे स्वत:ला स्वातंत्र्यवीर म्हणवून घेणारे सावरकर आहेत, ज्यांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली. अंदमान तुरुंगातील शिक्षा कमी करण्यासाठी त्यांनी अनेकवेळा माफीची पत्रे इंग्रज सरकारला लिहिली, अशी टीका खासदार राहुल गांधी यांनी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त मंगळवारी आयोजित कार्यक्रमात केली.
राहुल गांधी म्हणाले, सावरकर खरे देशभक्त नाहीत. ते तर इंग्रज राज्यकर्त्यांकडून निवृत्ती वेतन घेत होते. बिरसा मुंडा यांनी इंग्रज सरकारच्या विरोधात उठाव केला. त्यावेळी राज्यकर्त्यांनी मुंडा यांना पैसा, जमीन देण्याचा प्रयत्न केला. आमच्या कडून जे हवे ते घ्या, पण विद्रोह करू नका असे इंग्रजांचे म्हणणे होते, पण ते आमिषाला बळी पडले नाहीत. त्यांनी इंग्रज सरकारचा सामना केला. यात त्यांना आपले प्राण गमवावे लागले. सावरकर यांची विचारधारा देशाला तोडणारी आहे, तीच विचारधारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.
शहर
- Maharashtra Weather Update : हवामान खात्याकडून 'या' भागात गारपीटचा येलो अलर्ट, अवकाळीचे ढग कायम
- Mega Block : मुंबईकरांनो लक्ष द्या! रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक, किती रेल्वे लोकल रद्द?
- Mumbai : एमएमआरडीएचा ४० हजार १८७ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर,मेट्रोसह अनेक प्रकल्पांना गती
- Pune : शाळा आता सकाळच्या सत्रात; का देण्यात आले निर्देश?
महाराष्ट्र
- Shirdi News : व्हीआयपींना पहाटेच दर्शन द्या, सुजय विखे यांची साईबाबा संस्थानकडे मागणी
- Beed : '... नाहीतर संतोष देशमुखांचा जीव वाचला असता', अपहरणाआधी नेमकं काय घडलं? कार चालकाने सांगितला घटनाक्रम
- Latur Crime : दुचाकीवर बसवून शेतात नेलं, ३ मुलींसोबत भयंकर घडलं; आजोबांकडून लैंगिक अत्याचार
- Udayanraje Bhosale : वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत उदयनराजे भोसले यांनी मांडली भूमिका; म्हणाले, “इतिहासात…”
गुन्हा
- Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईत ३८ दिवसांच्या बाळाची विक्री करण्यासाठी चोरी? पोलिसांनी असा उधळला चोरट्यांचा डाव
- Pune : शनिवार पेठेतून दुचाकी चोरणारा गजाआड, चोरट्याकडून दुचाकी चोरीसह घरफोडीचे गुन्हे उघड
- Pune Crime : टोळक्याकडून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; तलवारी उगारुन घरातील साहित्याची तोडफोड
- Ghatkoper Crime : नकोशी! पाळण्याच्या दोरीनेच ४ महिन्याच्या लेकीचा बापाने जीव घेतला, घाटकोपर हादरलं
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Supreme Court : 'स्तन पकडणे बलात्कार नाही...', हायकोर्टाच्या या निर्णायावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे
- CM Chandrababu Naidu : ‘तिरुपती मंदिरात फक्त हिंदूंनीच काम करावं’, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचं मोठं विधान
- Bill Gates : “भारत अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने विकसित होतोय”, बिल गेट्स यांच्याकडून कौतुक; म्हणाले, “नवनिर्मितीचं केंद्र…”
- Vasanthy Cheruveetil : कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय ५९ वर्षीय भारतीय महिलेने सर केलं एव्हरेस्ट, यूट्युबवरून घेतलेले धडे; पुढचं लक्ष्यही ठरवलं