
पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे माघारी फिरताच राज्यातील हवामानात झपाटय़ाने बदल होत आहे. रात्रीच्या किमान तापमानात मोठी घट झाली असून, राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडय़ात गारवा वाढत आहे. विदर्भातही रात्री हलका गारवा जाणवत आहे. राज्यात पुढील आठवडाभर कोरडय़ा हवामानाची स्थिती राहणार आहे. त्यामुळे रात्रीचे किमान तापमान सरासरीखालीच राहण्याचा अंदाज असून, दिवसाच्या कमाल तापमानात काही प्रमाणात वाढ होऊन उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे.
देशात १४८ दिवसांचे वास्तव्य करून २३ ऑक्टोबरला र्नैऋत्य मोसमी वारे देशातून माघारी परतले. त्यामुळे संपूर्ण राज्यातच सध्या कोरडय़ा हवामानाची स्थिती निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे बहुतांश भागात आकाश निरभ्र झाले आहे. बाष्प कमी झाल्याने पावसाळी स्थिती निवळली आहे. दिवाळीच्या कालावधीत पाऊस विश्रांती घेऊन आकाश निरभ्र होण्याची शक्यता आठवडय़ापूर्वीच व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार सध्याची स्थिती आहे. मध्य महाराष्ट्रात बहुतांश भागांत, तर कोकणात काही ठिकाणी रात्रीच्या किमान तापमानात घट झाली आहे. विदर्भ आणि मराठवाडय़ातही काही भागांत किमान तापमानात घट होत आहे.
पावसाळी स्थिती असताना अगदी दोनच दिवसांपूर्वी राज्यात सर्वच भागांत रात्रीचे किमान तापमान २० अंशांच्या पुढे होते. मध्य महाराष्ट्रात २१ ते २२ अंश, मराठवाडा आणि विदर्भात २१ ते २३ अंश, तर मुंबई परिसरासह कोकण विभागात रात्रीचे किमान तापमान २४ ते २६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. हे तापमान सरासरीच्या तुलनेत १ ते ४ अंशांनी अधिक होते. त्यात दोनच दिवसांत मोठा बदल झाला आहे. रात्रीचे किमान तापमान कमी होत असून, दिवसाचे कमाल तापमान वाढत आहे. सध्या सर्वत्र रात्रीचे किमान तापमान सरासरीच्या खाली आले आहे. सध्या मध्य महाराष्ट्रात किमान तापमान १२ ते १४ अंशांपर्यंत खाली आले आहे. कोकणात १९ ते २२, मराठवाडय़ात १४ ते १७, तर विदर्भात १७ ते १८ अंशांपर्यंत रात्रीचे तापमान खाली आले आहे. राज्यातील निचांकी तापमान महाबळेश्वर येथे १२.२ अंश सेल्सिअस नोंदिवले गेले.
किमान तापमान (कंसात दोन दिवसांपूर्वीचे तापमान)
पुणे १४.४ (२१.८), जळगाव १५.०(२०.५), कोल्हापूर १८.६ (२२.६), नाशिक १४.२ (२१.२), सोलापूर १६.९ (२२.५), महाबळेश्वर १२.२ (१७.६), सांगली १६.५ (२१.६), सातारा १४.६ (२१.८), मुंबई २३.८ (२६.०), सांताक्रुझ २०.६ (२६.०), रत्नागिरी १९.२ (२४.६), औरंगाबाद १४.१ (२१.१), परभणी १७.० (२३.५), अमरावती १५.३ (१९.५), गोंदिया १७.८ (२०.०), नागपूर १७.० (२१.१), चंद्रपूर १८.० (२३.०)
‘सित्रांग’ चक्रीवादळ दोन देशांत
- बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या ‘सित्रांग’ चक्रीवादळाने सध्या तीव्र रूप धारण केले आहे. त्याचा महाराष्ट्राला कोणताही फटका बसणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे.
- देशाच्या ईशान्य भागाला त्याचा तडाखा बसणार आहे. उत्तरेच्या दिशेने निघालेले हे चक्रीवादळ उत्तर-पूर्व भागात वळले असून, २५ ऑक्टोबरला हे चक्रीवादळ बांगलादेशात धडकणार आहे.
- बांगलादेश पार करून ते भारतात प्रवेश करून ईशान्येकडील भागाला तडाखा देणार आहे. ओदिशा आणि पश्चिम बंगाल भागातही त्याचा परिणाम दिसून येणार आहे.
शहर
- मोफत गणवेश योजनेचा 'तोटा'; २४० रुपयांत शर्ट-पॅन्ट आणि शिवणकाम कसं करायचं? मुख्याध्यापकांसमोर मोठा पेच.
- पुणे: तळेगाव दाभाडेमध्ये १२ वर्षांच्या मुलीवर मित्राकडून अत्याचार; अश्लील फोटोची धमकी देत कॅफेत नेले, तिघांना अटक!
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! १० वीच्या नोकरीसाठी पदवीधर उमेदवार अपात्र; सरकारी भरतीचे नियम बदलणार.
- पुणे: स्वारगेट पीएमपी स्थानकावर महिला वाहकांची कुचंबणा; स्वच्छ स्वच्छतागृहांच्या अभावी आरोग्याचा गंभीर प्रश्न!
महाराष्ट्र
- मोफत गणवेश योजनेचा 'तोटा'; २४० रुपयांत शर्ट-पॅन्ट आणि शिवणकाम कसं करायचं? मुख्याध्यापकांसमोर मोठा पेच.
- पुणे: तळेगाव दाभाडेमध्ये १२ वर्षांच्या मुलीवर मित्राकडून अत्याचार; अश्लील फोटोची धमकी देत कॅफेत नेले, तिघांना अटक!
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! १० वीच्या नोकरीसाठी पदवीधर उमेदवार अपात्र; सरकारी भरतीचे नियम बदलणार.
- पुणे: स्वारगेट पीएमपी स्थानकावर महिला वाहकांची कुचंबणा; स्वच्छ स्वच्छतागृहांच्या अभावी आरोग्याचा गंभीर प्रश्न!
गुन्हा
- ८ वर्षांनंतर न्याय! दिल्लीतील गोळीबार प्रकरणी भाजप आमदार राजू सिंह दोषी; महिलेचा घेतला होता बळी.
- मध्य प्रदेश: एकतर्फी प्रेमातून तरुणाचा अल्पवयीन तरुणीवर कुऱ्हाडीने हल्ला; छताला लटकवून दिला फास.
- कल्याणमध्ये गोळीबार; व्हॉट्सअॅप स्टेटसच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, खडकपाडा पोलिसांकडून दोघांना अटक.
- लातूरच्या मुदगड प्राथमिक आरोग्य केंद्रात संतापजनक प्रकार; रुग्णांच्या जीवाशी खेळ, मोठ्या प्रमाणात मुदत संपलेली औषधे सापडली.
राजकीय
- महाराष्ट्राची मोठी भरारी! मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ४,०८० कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार.
- टीएमसीमध्ये मोठा भूकंप! २२ खासदार बंडाच्या तयारीत, ममता बॅनर्जींच्या पक्षावर अस्तित्वाचे संकट.
- भाजपला रामराम! के. अण्णामलाई यांची नवी राजकीय 'चळवळ'; आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली!
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
इतर
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- ५ वाजताची डेडलाईन! अभिजीत दिपकेच्या 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाला सायंकाळी ५ पर्यंतच परवानगी; दिल्ली पोलिसांचे कडक नियम लागू!
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
























Subscribe to my channel




