
पुणे : केंद्रीय रसायने आणि खत मंत्रालयाने देशातील सर्व रासायनिक खत कंपन्यांना रासायनिक खतांच्या बरोबर सेंद्रिय आणि जैविक खते विक्रेत्यांना पुरविण्याचे आदेश दिले होते. हा आदेश बंधनकारक होता. मात्र, कंपन्यांनी सेंद्रिय आणि जैविक खतांचा पुरवठा करणे तांत्रिकृष्टय़ा शक्य नसल्याचे म्हणत केंद्राच्या आदेशाला धुडकावून लावले आहे. केंद्राचा हा आदेश वस्तुस्थितीला धरून नसल्याचा आरोपही खत कंपन्यांनी केला आहे.
बहुतेक खत कंपन्यांकडे सेंद्रिय, जैविक खतांचे उत्पादन करण्याचे प्रकल्प नाहीत, शिवाय इतक्या मोठय़ा प्रमाणावर सेंद्रिय आणि जैविक खते अन्य कंपन्यांकडून खरेदी करून त्यांचा पुरवठा करावा, अशी देशात स्थिती नाही, असे कंपन्यांनी म्हटले आहे. शिवाय अन्य कंपन्यांकडून खरेदी केलेली सेंद्रिय आणि जैविक खते निकषांप्रमाणे आहेत का, याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्नही उपस्थित केला आहे. सेंद्रिय, जैविक खतांचा आग्रह धरणे योग्य आहे, काळाची गरजही आहे. पण, वस्तुस्थिती विचारात न घेता केंद्राने आदेश दिले आहेत. त्यामुळे हा आदेश बंधनकारक असला तरीही त्याची अंमलबजावणी करणे शक्यच नव्हते. सेंद्रिय, जैविक खतांच्या वापराला प्राधान्य देतो आहोत, हे दाखविण्यासाठीच हा आदेश काढण्याचा फार्स केला गेला आहे, असेच प्रथमदर्शनी दिसते.
वार्षिक गरज..
२०२१-२२ या वर्षांत ३५४.३४ लाख टन रासायनिक खतांचा वापर देशात झाला आहे. त्यात युरिया, डाय अमोनियम फॉस्फेट, मोनेट ऑफ पोटॅश, मिश्र खते, सिंगल सुपर फॉस्फेट या खतांचा समावेश आहे. या तुलनेत सेंद्रिय आणि जैविक खतांचा वापर अगदीच नगण्य आहे. सेंद्रिय आणि जैविक खत उत्पादकांची देशाच्या पातळीवर संघटना नसल्यामुळे एकूण उत्पादन, वापर याची निश्चित आकडेवारी मिळत नाही. शिवाय देशव्यापी धोरणाचाही अभाव आहे.
केंद्राने दिलेले आदेश वस्तुस्थितीला धरून नाहीत. मुळात रासायनिक खते आणि सेंद्रिय, जैविक खतांचे उत्पादन हा दोन भिन्न बाबी आहेत. मोजक्याच रासायनिक खत कंपन्यांचे सेंद्रिय, जैविक खत निर्मितीचे प्रकल्प आहेत आणि त्यांची क्षमताही कमी आहे. सेंद्रिय, जैविक खत निर्मिती क्षेत्रात आघाडीवर असलेल्या कंपन्यांना सर्वतोपरी मदत करून दर्जेदार उत्पादनांवर भर दिला गेला पाहिजे. त्यांचे परवाने आणि दर्जा तपासणीचे कामही पारदर्शक पद्धतीने आणि वेगाने व्हायला पाहिजे. शेतकऱ्यांमध्ये जागृती केली पाहिजे, फक्त आदेश देऊन सेंद्रिय, जैविक खतांचा वापर वाढणार नाही.
-विजयराव पाटील, खत उद्योगाचे अभ्यासक
नक्की काय झाले?
केंद्रीय खते आणि रसायन मंत्रालयाने २७ मे रोजी देशात सेंद्रिय आणि जैविक खतांचा वापर वाढावा, शेतकऱ्यांना रासायनिक खतांबरोबरच सेंद्रिय आणि जैविक खते उपलब्ध व्हावीत, या चांगल्या हेतूने खत कंपन्यांना सेंद्रिय आणि जैविक खतांचा पुरवठा करावा, असे आदेश दिले होते. हे आदेश बंधनकारक होते. मात्र, कंपन्यांनी या आदेशाची अंमलबजावणी केली नाही.
देशभरात सेंद्रीय आणि जैविक खतांचा वापर वाढून, जमिनी सुपीक होण्यासाठी केंद्राचा हा आदेश महत्त्वपूर्ण आहे. अनेक कंपन्यांनी या आदेशाचे पालन केले आहे. ग्रामीण भागात रासायनिक खतांबरोबर सेंद्रिय, जैविक खते दिली जात आहेत, अनेक ठिकाणांहून ते लिंकिंग आहे, अशा तक्रारी आल्या आहेत. पण, ते लिंकिंग नाही. जमिनीच्या सुपीकतेसाठी सेंद्रिय आणि जैविक खतांची गरज आहे.
-दिलीप झेंडे, कृषी संचालक, निविष्ठा व गुणनियंत्रण
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




