‘केस लवकर कसे वाढवावेत?’ आणि ‘माझे केस का गळत आहेत?’ हे केसांच्या निगेबाबत गुगलवर सर्वाधिक शोधल्या जाणाऱ्या दहा प्रश्नांपैकी आहेत. जगभरातील लाखो लोक वेगवेगळ्या प्रश्नांसाठी ‘हेअर ग्रोथ’ हा शब्द वापरून शोध घेतात. गेल्या मंगळवारी कपिवाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमीव शर्मा यांच्याशी बोलत असताना मी ही माहिती त्यांच्यासोबत शेअर केली. त्यावर त्यांनी एक अशी गोष्ट सांगितली की, मला आश्चर्य वाटले. ते म्हणाले, ग्राहकांच्या या जागतिक गरजेमुळे न्यूट्राफॉल हा युनिलिव्हरच्या वेलबिइंग व्यवसायातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ब्रँड बनला आहे. या उत्पादनातील प्रमुख घटक शतावरी असल्याने ते आयुर्वेदाच्या ज्ञानावर चांगली कमाई करत आहेत. आमची चर्चा 45 मिनिटांहून अधिक वेळ चालली. शेवटी आम्ही या निष्कर्षापर्यंत पोहोचलो की, जीवनाची गुणवत्ता आणि आर्थिक समृद्धी वाढवायची असेल, तर केवळ आयुर्वेद नव्हे, तर आपल्या प्राचीन ज्ञानाचाही आधुनिक विज्ञानाशी समन्वय साधून अभ्यास करणे आवश्यक आहे. या चर्चेची आठवण मला शनिवारी झाली. ऑस्ट्रेलियातून आलेल्या माझ्या एका मित्राच्या कुटुंबातील दोन मुलांनी रविवारी बाहेर जेवायला जाण्याचे ठरवले होते. मी त्यांना मला त्यात सहभागी करू नका, अशी विनंती केली. त्यांनी ‘तुम्ही उपवास का करता?’ किंवा ‘त्यामागील विज्ञान काय आहे?’ असे विचारण्याऐवजी, ‘अनेक पिढ्यांनी शेकडो वर्षे ही परंपरा का जपली?’ असा प्रश्न विचारला. अनेकदा अशा प्रश्नातूनच नव्या वैज्ञानिक चर्चेची सुरुवात होते. माझ्या भूमिकेच्या समर्थनार्थ मी जपानी पेशीजीवशास्त्रज्ञ योशिनोरी ओसुमी यांच्या संशोधनाचा उल्लेख केला. पेशीतील ऑटोफॅजी या प्रक्रियेची यंत्रणा शोधून काढल्याबद्दल त्यांना 2016 मध्ये शरीरक्रियाशास्त्र किंवा वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. ऑटोफॅजी म्हणजे पेशीतील खराब किंवा अनावश्यक घटकांचे विघटन करून त्यांचा पुनर्वापर करण्याची प्रक्रिया. त्यांनी एकादशीचा अभ्यास केलेला नव्हता आणि उपवासाने आजार बरे होतात, असेही त्यांनी सिद्ध केले नव्हते. मात्र त्यांनी हे दाखवून दिले की, शरीराला काही काळ पोषणतत्त्वांचा तुटवडा जाणवला, तर पेशी स्वतःची अंतर्गत पुनर्वापर यंत्रणा सक्रिय करतात. त्यामुळे पेशींचे आरोग्य टिकून राहण्यास मदत होते. आपल्या पूर्वजांकडे सूक्ष्मदर्शक नव्हते. जनुकीय अनुक्रमणाचे तंत्रज्ञानही नव्हते. पण त्यांच्याकडे शतकानुशतके जमा झालेला अनुभव आणि निरीक्षणांचा मोठा ठेवा होता. त्यांनी पाहिले होते की, संयमाने आणि मर्यादित प्रमाणात अन्न घेतल्याने आरोग्य सुधारते, मन अधिक एकाग्र होते आणि आत्मशिस्त वाढते. आयुर्वेदातील अनेक ग्रंथांमध्ये ‘लंघन’ म्हणजेच पचनसंस्थेवरील ताण कमी करून शरीरातील संतुलन पुन्हा प्रस्थापित करण्याचा उपाय सांगितला आहे. आधुनिक जीवनशैली मात्र याच्या अगदी उलट दिशेने जाताना दिसते. आपण सतत काही ना काही खात असतो, रात्री उशिरा जेवतो आणि पचनसंस्थेला आवश्यक विश्रांती देत नाही. त्यामुळे शरीरातील दुरुस्तीची अनेक कामे करण्याऐवजी शरीर सतत अन्न पचवण्यातच व्यग्र राहते. म्हणूनच आज इंटरमिटंट फास्टिंग जगभर लोकप्रिय झाले आहे. पण कोट्यवधी भारतीयांसाठी श्रद्धेच्या आधारावर एकादशी किंवा इतर ठरावीक दिवशी उपवास करण्याची शिस्तबद्ध परंपरा शतकानुशतके अस्तित्वात आहे. नियंत्रित उपवासाचे नवे फायदे संशोधनातून समोर येतात, तेव्हा पुन्हा जाणवते की, भारतातील अनेक प्राचीन परंपरा निसर्ग आणि मानवी शरीराच्या सूक्ष्म निरीक्षणांवर आधारित होत्या. जीवशास्त्राच्या पुस्तकांत पेशींच्या पुनर्वापर प्रक्रियेचे वर्णन येण्याच्या खूप आधी आपल्या पूर्वजांनी उपवासाला दैनंदिन जीवनाचा भाग बनवले होते. तो उपचार म्हणून नव्हे, तर विवेकपूर्ण जीवनशैलीचा एक भाग म्हणून. आपल्या पूर्वजांनी कधी सेल्युलर रिसायकलिंग, मेटाबॉलिक स्विचिंग किंवा ऑटोफॅजी यांसारखे शब्द वापरले नाहीत. त्यांनी संशोधनपर लेखही प्रकाशित केले नाहीत. त्यांनी फक्त पिढ्यान्पिढ्या निसर्ग, ऋतू, मानवी वर्तन आणि आरोग्य यांचे बारकाईने निरीक्षण केले. त्यांचे ज्ञान प्रयोगशाळेतील उपकरणांमधून नव्हे, तर शतकानुशतके साठलेल्या अनुभवातून विकसित झाले. त्यामुळे परंपरा आणि विज्ञान यांच्यात संघर्षाचे नाते असणे आवश्यक नाही. परंपरा अनेकदा एखादी संकल्पना मांडते, तर विज्ञान तिची पडताळणी करते. एक अनुभव जपते, तर दुसरे त्यामागील कारण स्पष्ट करते. फंडा असा आहे की, आपला वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवा. त्यांना डोळे झाकून त्यावर विश्वास ठेवायला सांगू नका आणि तो नाकारायलाही सांगू नका. त्याऐवजी विज्ञानाच्या मदतीने आदर, कुतूहल आणि चिकित्सक दृष्टीने त्याचा शोध घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करा.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: भारत आता मार खाणारा देश राहिलेला नाही, गरज पडल्यास घरात घुसून मारणारा देश बनलाय: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- पुणे: ३० कोटींच्या कर्जाचे आमिष दाखवून बांधकाम व्यावसायिकाची १६ लाखांची फसवणूक; पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: डिंभे धरणातून १०,४३८ क्युसेक पाण्याचा विसर्ग; घोद नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
महाराष्ट्र
- पुणे: भारत आता मार खाणारा देश राहिलेला नाही, गरज पडल्यास घरात घुसून मारणारा देश बनलाय: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- पुणे: ३० कोटींच्या कर्जाचे आमिष दाखवून बांधकाम व्यावसायिकाची १६ लाखांची फसवणूक; पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- अमरावती: पश्चिम विदर्भातील ४५ तालुक्यांमध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार; पावसामुळे वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू
- गडचिरोली: भामरागडला महाप्रलयाचा विळखा; ३०० हून अधिक घरांमध्ये पाणी, वीज आणि मोबाईल सेवा सलग दोन दिवसांपासून ठप्प
गुन्हा
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
- वाशिम: अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची पत्नी आणि प्रियकराकडून निर्घृण हत्या; दारू पाजून दोरीने गळा आवळत केला गेम
- ठाणे: डोंबिवलीत संतापजनक प्रकार; नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर तिघा नराधमांकडून अत्याचार; मानपाडा पोलिसांकडून आरोपी जेरबंद
- नागपुर: विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या संघात निवड न झाल्याने १७ वर्षीय महिला क्रिकेटपटूचे टोकाचे पाऊल
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
- आजचे राशिभविष्य २७ जुलै २०२६ : या राशींना नोकरीत प्रमोशन तर काही राशींना व्यवहारात सतर्क राहण्याचा इशारा, जाणून घ्या आजचे भविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

राम मंदिर देणगी मुद्द्यावर संसद परिसरात विरोधकांचे अनोखे आंदोलन; नाटिकेद्वारे केंद्र सरकारवर निशाणा
एक नाही, दोन नाही... तब्बल १२ ट्रॅक्टर लागले! करंजावणेत चिखलातून ट्रॅक्टर बाहेर काढण्यासाठी प्रयत्न
धुळ्यात पुराचे संकट; कन्हेर नदीत पिता-पुत्र वाहून गेले, युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू
देश विदेश
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली
- पश्चिम बंगाल: पश्चिम बंगालमध्ये माजी सरकारी बस चालकाच्या घरी पोलिसांची धाड, २८ कोटींची रोकड आणि १५ किलो सोने जप्त
- उत्तर प्रदेश: डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या ६५ वर्षीय महिलेची अंत्यविधीची तयारी सुरू असताना १७ तासांनी पुन्हा परतली प्राणांतून सुटका;



























Subscribe to my channel



