राज्यात दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसात राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी कंटाळून आत्महत्या केली. अशातच जळगाव जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हे दोन्ही शेतकरी जळगावच्या धरणगाव तालुक्यातील रहिवासी असून सलग दोन दिवस दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. या घटनेने जळगाव जिल्हा हादरलाय.
कर्जाला कंटाळून या दोन्ही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. हे दोन्ही शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. ऋषिकेश गुलाबराव पाटील आणि बापू तुळशीराम कोळी अशी या दोन शेतकऱ्यांची नावे आहेत. ऋषिकेश गुलाबराव पाटील हे शेरी गावचे रहिवासी असून ते अवघे २६ वर्षांचे होते. तर बापू तुळशीराम कोळी हे वंजारी खापट गावचे रहिवासी असून ते 53 वर्षांचे होते.
ऋषिकेश पाटील यांनी शनिवारी दुपारी शेतात विष प्राशन करत आत्महत्या केली त्यानंतर त्याला रुग्णालयात आणण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. हृषीकेश पाटीलला वृध्द आई आणि वडिल असे कुटूंब आहे.
बापू तुळशीराम कोळी हे आजारपणामुळे त्रस्त झाले होते. सोबत कर्जबाजारीही होते. त्यांना प्रकृतीवर उपचार घ्यायचे की कर्ज फेडायचे, हा मोठा प्रश्न होता. परिस्थितीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, चार मुली, एक मुलगा असा परिवार आहे
शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि इतर योजना राबवल्यानंतरदेखील शेतकरी आत्महत्या कमी झालेल्या नाहीत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत असून २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये आत्महत्यांच्या घटना वाढलेल्या दिसून आल्या. शेतकऱ्यांचे मानसिक आरोग्य खचले असून त्यामुळे आत्महत्यांच्या संख्येत वाढ झाली असल्याचे समोर आले आहे.
आत्महत्या झालेल्या शेतकरी कुटुंबांना महाराष्ट शासनातर्फे एक लाख रुपयांची मदत दिली जाते. ही मदतदेखील सरासरी फक्त ५० टक्के शेतकरी कुटुंबांना दिली आहे; तर उर्वरित ५० टक्के कुटुंबे ही त्या मदतीसाठी अपात्र ठरली आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी शासनाने १९ डिसेंबर २००५ मध्ये घातलेल्या जाचक नियम आणि अटी प्रमुख अडथळा ठरल्या आहेत. १५ वर्षांनंतरही या नियमांमध्ये शासनाने कोणताही बदल केलेला नसल्याने आत्महत्याग्रस्त कुटुंबांना शासकीय मदतीपासून वंचित राहावे लागत आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




