भारताचा वारसा जतनाचा आराखडा खूपच जड, कोरडाआणि प्रतिकूल परिणाम करणारा आहे. तो ना भूतकाळाचेजतन करू शकत आहे, ना देशाच्या भविष्याला पुढे जाऊदेत आहे. याचे कारण 1958 चा ‘प्राचीन स्मारक आणिपुरातत्त्वीय स्थळे व अवशेष कायदा’ हे आहे. हा कायदादेशातील सुमारे 3700 संरक्षित स्मारकांवर एकसारखेचनियम लागू करतो- ते म्हणजे प्रत्येक स्मारकाच्यासभोवताली 100 मीटरचे प्रतिबंधित क्षेत्र असावे, जिथेकोणतेही बांधकाम होऊ शकत नाही आणि 200 मीटरचेआणखी एक नियंत्रित क्षेत्र असावे, जिथे विकासकामांवरकठोर नियंत्रण असते. अत्यंत कडक वाटणारा हाआराखडा प्रत्यक्षात प्रभावहीन आहे. तो सर्व स्मारकांना एकाच प्रकारच्या नियमांमध्ये बांधतो, जे जतनाच्या दृष्टीने फार कमी फायदेशीर आहे. याची आर्थिक-सामाजिक किंमतही खूप मोठी आहे. भारतातील संरक्षित स्थळांची यादी असामान्यरीत्याविविधतेने नटलेली आहे. यामध्ये जागतिक महत्त्वाच्या स्थळांपासून ते छोट्या-मोठ्या अवशेषांपर्यंतचा समावेश आहे. काही तर वसाहतकाळापासून चालत आलेल्याकबरी आणि दफनभूमी आहेत. शंभरहून अधिक तर‘कोस मिनार’ आहेत, ज्या अंतर मोजण्याच्या खुणा होत्या.काही ‘संरक्षित स्थळे’ प्रत्यक्षात हलवता येण्याजोग्या वस्तूआहेत, तर काही कागदावरच आहेत. पण या सर्वांवर तीच300 मीटरची बंदी लागू होते. ही पद्धत जर खरोखरचअधिक चांगले जतन करत असती तर तिचे समर्थन करताआले असते. पण व्यावहारिक पातळीवर हे अगदी उलटआहे. एकसमान बंदी स्मारकांच्या आसपासच्या घडामोडीसंपवत नाही, तर त्यांना बेकायदेशीर ठरवते. अनेकस्मारकांच्या जवळील अशी बांधकामे आठवा, ज्यांचासाचा स्मारकांच्या भिंतीपर्यंत पोहोचतो. हेच अतिक्रमणकोणत्याही नियंत्रित विकासापेक्षा स्मारकांचे जास्तनुकसान करते. इकडे, औपचारिक विकासावर बंदीअसल्यामुळे आसपास कोणतीही अर्थपूर्ण आर्थिकघडामोडही फोफावू शकत नाही. यामुळे ते महसुलाचेस्रोतही संपतात, जे प्रत्यक्षात या वारशांना टिकवूनठेवतात. उदाहरणार्थ, कॅफे, छोटे व्यवसाय, सांस्कृतिककार्यक्रम. परिणामी, स्मारकांची योग्य देखभाल होऊशकत नाही आणि ती हळूहळू खराब होत जातात.पर्यटनासाठीही हे तितकेच नुकसानकारक आहे. तुम्हीस्मारकांवर असे नियम लादले तर हेरिटेज टुरिझम वेगळ्याप्रकारे वाढू शकत नाही. पर्यटकांसाठी पायाभूत सुविधाआणि मूलभूत सोयी आवश्यक असतात. पण देशातीलअनेक स्मारकांमध्ये या गोष्टी गायब आहेत. निर्बंधांमुळेतिथे संपर्क-रस्ते, पार्किंग, स्वच्छतागृहे, दिवे आणिजन-सुविधा निर्माण करणेही कठीण जाते. म्हणूनच अनेकठिकाणी पोहोचणेही अवघड आहे. याउलट रोमचेकोलोझियम, पॅरिसचा आयफेल टॉवर आणि लंडनच्याऐतिहासिक स्थळांना निर्बंधांऐवजी डिझाइन कंट्रोल,इन्फ्रास्ट्रक्चरशी ताळमेळ, व्यावसायिक घडामोडी आणिसार्वजनिक ठिकाणांच्या माध्यमातून दाट शहरीवातावरणाशी जोडले गेले आहे. त्यामुळे केवळ आयफेलटॉवरवर येणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या भारतातीलसर्व संरक्षित स्मारकांच्या एकत्रित संख्येपेक्षा चार पटअधिक आहे. हा नियम दैनंदिन जीवनाची गुणवत्ता आणिप्रतिष्ठेवरही परिणाम करतो. शहरांमध्ये संपूर्ण भाग यानियमांमध्ये अडकलेले आहेत. केवळ दुरुस्तीच्यापरवानगीसाठी पाच वर्षांपर्यंतचा काळ लागतो. पुण्याच्याशनिवारवाड्याच्या आसपास राहणाऱ्या लोकांचे म्हणणेआहे की निर्बंधांमुळे ते पडक्या घरांमध्ये राहण्यास मजबूरआहेत. मेट्रो कॉरिडॉर, रुग्णालयांचा विस्तार आणि इतरशहरी पायाभूत विकास योजनाही नियमांमध्ये अडकूनवर्षानुवर्षे रखडलेल्या राहतात. दिल्ली आणि कोलकातामेट्रोच्या कामांमध्येही असेच अडथळे आले. यामुळे खर्चवाढतो, जनतेला सेवा वेळेवर मिळत नाही आणि आर्थिकसंधी गमावल्या जातात. याचा सर्वात मोठा परिणाम त्याविशाल जमिनीच्या रूपात दिसून येतो, जी या व्यवस्थेतलॉक झाली आहे. भारतीय शहरांमध्ये अंदाजे जवळपास20 लाख कोटी रुपयांची जमीन या प्रतिबंधित क्षेत्रांमध्येअडकलेली आहे. एकट्या दिल्लीत जवळपास 8.7 लाखकोटी रुपयांची जवळपास 16 हजार एकर जमीन यानियमांमध्ये अडकली आहे. अत्यंत महाग आणि कमीशहरी जमीन असलेल्या देशात ही व्यवस्था पुरवठ्यातअडथळा आणते, किमती वाढवते आणि अंतिमतःविकासाला रोखते. वारसा-जतनाची आपली ही सध्याचीपद्धत या चुकीच्या अंदाजावर आधारित आहे की केवळअंतरामुळेच सुरक्षा निश्चित होऊ शकते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) भारताच्या संरक्षित स्थळांमध्ये जागतिकमहत्त्वाच्या स्थळांपासून ते छोट्या-मोठ्याअवशेषांपर्यंतचा समावेश आहे. अनेक कबरीआहेत. शंभरहून अधिक ‘कोस मिनार’ आहेत.काही ‘संरक्षित स्थळे’ प्रत्यक्षात हलवतायेण्याजोग्या वस्तू आहेत, तर काही फक्तकागदावर आहेत. पण या सर्वांवर 300 मीटरचीबंदी लागू होते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

पवई परिसरातील JVLR मार्गावर L&T गेट क्रमांक ५ जवळ मुख्य रस्त्यावर मोठा खड्डा
🚨 हडपसरमध्ये पावसाने उघड केली ड्रेनेज व्यवस्थेची पोलखोल!
पुणे: हडपसर रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्याची दुरवस्था; खड्डे-चिखलामुळे हजारो प्रवाशांचे हाल.
देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम


























Subscribe to my channel

