पुणे: महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! प्रसिद्ध 'लोणावळा चिक्की' आणि माहूरच्या 'रेणुका माता तांबूल'ला मिळाला जीआय टॅग.

पुणे: महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृती आणि ऐतिहासिक वारशाचा गौरव करणारी दोन महत्त्वाची उत्पादने आता जागतिक नकाशावर चमकली आहेत. प्रसिद्ध 'लोणावळा चिक्की' आणि माहूर गडावरील पारंपरिक 'रेणुका माता तांबूल' या दोन पदार्थांना केंद्र सरकारच्या 'जीओग्राफिकल इंडिकेशन्स' (जीआय टॅग) विभागाने अधिकृत मानांकन दिले आहे. यासोबतच राज्यातील जीआय टॅग मिळणाऱ्या उत्पादनांची संख्या ५० वर पोहोचली आहे.


जीआय टॅगचे महत्त्व: भौगोलिक मानांकन हे संबंधित उत्पादनाचे मूळ, गुणवत्ता आणि ऐतिहासिक वारसा दर्शवते. या टॅगमुळे आता या दोन्ही पदार्थांच्या बनावट विक्रीवर अंकुश बसेल.

लोणावळा चिक्कीचा इतिहास: १८८२ मध्ये भिवराज अग्रवाल यांनी रेल्वे मजुरांसाठी गूळ, शेंगदाणे आणि मुरमुरे वापरून 'गूळदाणी' स्वरूपात चिक्की तयार केली होती. पुढे ही चिक्की लोणावळ्याची ओळख बनली.

 

माहूरचा 'तांबूल' प्रसाद: माहूरच्या रेणुका माता मंदिरात पुरणपोळीच्या नैवेद्यानंतर 'तांबूल' अर्पण करण्याची पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा आहे. यात नागवेलीची पाने, जायफळ, वेलची, ज्येष्ठमध यांसारख्या औषधी घटकांचा वापर केला जातो.

प्रक्रियेतील प्रयत्न: हे मानांकन मिळवण्यासाठी ऐतिहासिक संदर्भ आणि तांत्रिक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून तज्ज्ञांनी पाठपुरावा केला होता. जीआय तज्ज्ञ डॉ. गणेश हिंगमिरे आणि स्थानिकांच्या मेहनतीमुळे हे यश साध्य झाले आहे.

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *