अनेक वर्षांपासून राजकीय वर्तुळात एक युक्तिवाद वारंवार मांडला जातो. तो म्हणजे गांधी कुटुंबातील सदस्य नकळतपणे भाजपच्या राजकीय यशाला खतपाणी घालत आहेत. हा युक्तिवाद विशेषतः राहुल गांधींच्या संदर्भात केला जातो. त्यांच्या विरोधात दोन प्रमुख दावे केले जातात. पहिला म्हणजे ते राजकीय घराण्यातून येतात. त्याला आता जनतेचा फारसा पाठिंबा राहिलेला नाही. दुसरा म्हणजे राहुल राजकारणात कुशल नाहीत. परिणामी, भाजपला त्याचा सर्वाधिक फायदा होतो. अनेकांचा असाही दावा आहे की, लोक भाजपला पाठिंबा देतात कारण त्यांना राष्ट्रीय राजकारणात दुसरा कोणताही विश्वासार्ह पर्याय दिसत नाही. चांगल्या कल्पकतेने आणि कुशल राजकीय रणनीतीने अशा मतदारांना आपल्याकडे आकर्षित करता येऊ शकते. अलीकडेच या विचाराला मोठ्या बौद्धिक समर्थनाचा आधार मिळाला आहे. रामचंद्र गुहा हे भारतातील प्रमुख विचारवंत आणि सन्माननीय इतिहासकार आहेत. आपल्या एका लेखात गुहा यांनी गांधी कुटुंबाला ‘मोदींचे मदतनीस’ म्हटले आहे. मात्र, राहुल गांधी हे एक चांगले व्यक्ती आहेत, हेदेखील ते मान्य करतात. गुहा यांच्या मते, राहुल यांच्यात शिस्त, गांभीर्य आणि अनुभवाची कमतरता आहे. राहुल यांनी केवळ ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यानच शिस्त दाखवली होती. त्यांच्या कष्टाची क्षमता सातत्यपूर्ण दिसत नाही. याउलट, त्यांचे विरोधक न थकता सतत काम करत असतात. राहुल ‘एक्स’वर ऊर्जा खर्च करतात, तितकी त्यांनी पक्ष जमिनीवर मजबूत करण्यासाठी लावायला हवी. या टीकेचे विश्लेषण कसे करायचे? गुहा म्हणतात की ते केवळ मत मांडत नाहीत, तर तर्क देत आहेत. त्यांच्या मते त्यांचा लेख तथ्यांवर आधारित आहे, गांधी परिवार किंवा राजकीय घराणेशाहीबद्दलच्या त्यांच्या वैयक्तिक मतांवर नाही. पण, अशा विश्लेषणाची हीच सर्वात मोठी अडचण आहे. व्यक्तींवर (नेत्यांवर) इतका भर देणे आश्चर्यकारक आहे. यात संस्थांच्या भूमिकेकडे पूर्णपणे दुर्लक्ष होते. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात, राजकीय विश्लेषणात निवडणुकीतील पराभव किंवा सत्तापालट यांसारख्या मोठ्या बदलांची कारणे शोधताना नेत्यांचे वर्तन आणि संस्थात्मक बदल या दोन्हीचा विचार करणे आवश्यक असते. सोप्या भाषेत सांगायचे तर, मोठे राजकीय बदल समजून घेण्यासाठी अनेक कारणांकडे एकत्र पाहावे लागते. नेतृत्व हे त्यातील एक कारण असते. सार्वजनिक संस्था कमकुवत झाल्या. प्रसारमाध्यमे व न्यायव्यवस्थेवर दबाव आहे, लोकशाही प्रक्रियेला धक्का पोहोचला आहे, हे गुहा मान्य करतात. मात्र, काँग्रेसच्या पराभवाची कारणे सांगताना ते या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. 1971 नंतरची इंदिरा गांधींची लाट आणि पाकिस्तानवर मिळवलेला विजय यामुळे त्यांना प्रचंड शक्ती मिळाली होती. तरीही, अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशांनी त्यांची निवडणूक रद्द केली होती. 1950 च्या दशकाच्या सुरुवातीला नेहरूंच्या सत्तेची बरोबरी कोणी केली असती? तरीही, न्यायालयाने मालमत्तेचा हक्क हा मूलभूत अधिकार मानून जमीन सुधारणा कायद्यांची वैधता नाकारली होती, जो नेहरूंच्या कृषी धोरणाचा कणा होता. सरकार कितीही मजबूत असले, तरी न्यायालय स्वतंत्रपणे काम करू शकते, हे यातून स्पष्ट होते. राहुल गांधी आपल्या नेतृत्वाच्या शैलीत बदल करू शकतात आणि गुहा यांनी केलेल्या काही टीकेचा विचारही करू शकतात. परंतु, भाजप सतत सत्तेत राहण्यामागचे कारण केवळ राहुल गांधींच्या नेतृत्वातील त्रुटींवर केंद्रित करणे योग्य नाही. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात निवडणूक निकाल किंवा सत्तांतर यांसारख्या मोठ्या राजकीय बदलांचे विश्लेषण करताना नेत्यांचे वर्तन आणि संस्थात्मक बदल या दोन्ही गोष्टींचा एकत्रित विचार केला गेला आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नागपुर: FDAची धडक मोहीम; स्वीट फॅक्टरीचा परवाना निलंबित, बेकायदेशीर सौंदर्यप्रसाधनांचा पर्दाफाश
- पुणे: 'ताई, काम नको करू सांगत होतो...', मोशी येथे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या बहिणीसाठी भावाचा हंबरडा
- कोल्हापूर: एसटी स्टँड परिसरात पतीकडून पत्नीची भरदिवसा हत्या
- मुंबई: नालासोपाऱ्यात पूर २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू, नागरिकांची धडपड ठरली निष्फळ
महाराष्ट्र
- पुणे: कचऱ्याचा डोंगर कोसळून इमारत जमीनदोस्त, बचावकार्य युद्धपातळीवर
- हिंगोली: पहिली पत्नी जिवंत असतानाच दुसरं लग्न; मंडपातच पोलिसाने पत्नीला बेदम मारहाण
- मराठवाडा: हिंगोली, परभणी आणि नांदेडमध्ये दोन तासांत चार वेळा धरणीकंप; जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन!
- नागपुर: FDAची धडक मोहीम; स्वीट फॅक्टरीचा परवाना निलंबित, बेकायदेशीर सौंदर्यप्रसाधनांचा पर्दाफाश
गुन्हा
- कोल्हापूर: एसटी स्टँड परिसरात पतीकडून पत्नीची भरदिवसा हत्या
- सोलापुरात मालमत्तेच्या वादातून काका-काकूंची निर्घृण हत्या; पुतण्यांनी चोरीचा बनाव रचला, साहिल शेख मुंबईतून अटकेत
- "उत्तर प्रदेशात भीषण अपघात: पंक्चर काढताना अज्ञात वाहनाची धडक; ४ तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू"
- पश्चिम बंगाल: बारुईपूर १२ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा एन्काऊंटरमध्ये खात्मा.
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- हाय ब्लड प्रेशरचे ५ गंभीर संकेत! शरीरात ही लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष.
- आर्थिक राशिभविष्य ८ जुलै २०२६: 'सम योगा'मुळे कोणाचे नशीब उजळणार? जाणून घ्या आजचे विशेष शुभ संकेत!
- 'लाडकी बहीण' योजनेच्या लाभाची रक्कम २१०० रुपये होणार का? केंद्राच्या अहवालामुळे पुन्हा चर्चेला उधाण!
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
मनोरंजन
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
देश विदेश
- उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टरला महाराष्ट्रात मोठा झटका; उमरग्यातील दाल मिलसह १०० कोटींची मालमत्ता जप्त!
- देश-विदेश: पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार इंडोनेशियातील प्रंबनम मंदिराला भेट!!
- "उत्तर प्रदेशात भीषण अपघात: पंक्चर काढताना अज्ञात वाहनाची धडक; ४ तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू"
- मोठी बातमी! पीएफ काढण्याचे नियम बदलले; आता पैसे काढताना 'हे' नियम पाळावे लागणार!


























Subscribe to my channel



