हवामान बदलाच्या विरोधात संपूर्ण जग एक लढा देतआहे. या संघर्षात ध्येये आणि वचनबद्धतेची कोणतीहीकमतरता राहिलेली नाही. पण शेवटी लोक या दिशेनेझालेली प्रगती या आधारावर मोजतात की ते त्यांच्यादैनंदिन जीवनात काय अनुभवतात आणि हवामानकृतीचा प्रभाव जगातील शहरांत जास्त थेट दिसून येतो. शहरांमध्ये आता ही समज निर्माण होऊ लागली आहेकी हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करणारे आणिहवामानविषयक आव्हानांचा सामना करण्याची क्षमतावाढवणारे उपाय लोकांचे दैनंदिन जीवनही अधिकचांगले बनवतात. ऊर्जा-कार्यक्षम घरे विजेचे बिल कमीकरतात. अक्षय ऊर्जा आयातित-इंधनांवरीलअवलंबित्व आणि तेल-गॅसच्या किमतीत होणारी वाढयामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी कमी करते. उत्तमसार्वजनिक वाहतूक आणि सुरक्षित सायकल पायाभूत सुविधा लोकांना येण्या-जाण्यासाठी अधिककिफायतशीर आणि निरोगी पर्याय उपलब्ध करून देतात. झाडे आणि ग्रीन बेल्ट हवेच्या गुणवत्तेत सुधारणाघडवून आणतात, परिसर थंड ठेवतात आणि शहरे राहण्यासाठी अधिक सुखद बनवतात. पण हवामान कृतीचा उद्देश केवळ एवढाच नाही. हा उष्ण होतअसलेल्या पृथ्वीच्या आधीच स्पष्ट झालेल्याप्रभावांपासून लोकांना सुरक्षित ठेवण्याचाही प्रयत्न आहे.उष्णतेची लाट, पूर, दुष्काळ आणि अति-हवामानाच्याघटना सतत अधिक तीव्र होत आहेत. शहरे आणि त्यांचेरहिवासी या आव्हानांचा सर्वात आधी सामना करतआहेत. म्हणूनच हवामान बदलाचा सामना करण्यासाठीअनुकूलतेच्या उपायांची साखळी पुढे वाढवावी लागेल. जगभरात स्थानिक नेतृत्व शाळा, रुग्णालये, नर्सिंगहोम्स आणि सार्वजनिक ठिकाणे अति उष्णता तसेचइतर हवामान धोक्यांपासून नागरिकांच्या सुरक्षेसाठीअनुकूल बनवण्याचा प्रयत्न करत आहे. सावलीचीव्यवस्था, ग्रीन रूफ आणि नैसर्गिक कूलिंग सिस्टिम्सवाढत्या तापमानाप्रति शहरांची क्षमता वाढवू शकतात,ज्याचा सर्वात जास्त लाभ मुले, वृद्ध आणि इतरसंवेदनशील गटांना मिळतो. आज जगातील अनेकमोठ्या शहरांमध्ये हरितगृह वायू उत्सर्जन घटले आहे,तर त्यांची लोकसंख्या सतत वाढत राहिली आहे.याशिवाय, सर्व प्रकारची शहरे मिळून त्या प्रगतीलाअधिक वेगवान करण्यासाठी सहकार्य करत आहेत, जीत्यांनी वेगवेगळ्या स्तरांवर साध्य केली आहे. गेल्या दशकात ग्लोबल कोवेनंट ऑफ मेयर्स फॉरक्लायमेट अँड एनर्जी (जीसीओएम) 150 देशांच्या14,000 पेक्षा जास्त शहरे आणि स्थानिक सरकारांच्यायुती म्हणून विकसित झाले आहे, जे एक अब्जापेक्षाजास्त लोकांचे प्रतिनिधित्व करते. यामध्ये भारताचीही 29शहरे सामील आहेत आणि सर्वात नवीन सदस्यतिरुवनंतपुरम आहे. याच्या अनेक सदस्य शहरांनीत्यांच्या सरकारांच्या तुलनेत अधिक महत्त्वाकांक्षीहवामान ध्येये स्वीकारली आहेत आणि ती अधिकवेगाने साध्य करण्याच्या दिशेने पुढे गेली आहेत. तरीही,जर त्यांना अधिक सहकार्य मिळाले तर ती अधिकवेगाने आणि अधिक व्यापक स्तरावर काम करूशकतात. त्यांना तांत्रिक तज्ज्ञता आणि निधीपर्यंतपोहोचण्याची तातडीची गरज आहे. अनेक स्थानिकस्वराज्य संस्थांकडे अजूनही इतकी संसाधने नाहीत कीत्या हवामान प्रकल्पांची ओळख, विकास आणिअंमलबजावणी करू शकतील. भागीदारीतून या गरजापूर्ण करता येऊ शकतात. सिटी क्लायमेट फायनान्स गॅपफंड - ज्याला जीसीओएम आणि जागतिक बँकेचापाठिंबा प्राप्त आहे - आधीच अशा प्रकल्पांचा विकासकरण्यासाठी शहरांना मदत करत आहे, जे गुंतवणुकीलाआकर्षित करू शकतील आणि लोकसंख्येला लाभपोहोचवू शकतील. गेल्या काही वर्षांत याने 1,400 पेक्षाजास्त शहरांना हवामानविषयक महत्त्वाकांक्षांनाव्यावहारिक कृतीत बदलण्यास मदत प्रदान केली आहे. राष्ट्रीय सरकारे आता हवामान बदलाचा सामनाकरण्यात शहरांची क्षमता वेगाने स्वीकारत आहेत. पणयाला केवळ सुरुवात मानले पाहिजे. सर्वात यशस्वीहवामान-धोरणे तीच असतात, ज्यांचा परिणाम लोकत्यांच्या रोजच्या जीवनात पाहू आणि अनुभवू शकतात,म्हणजे स्वच्छ हवा, अधिक सुरक्षित रस्ते, विजेचे कमीबिल, अधिक आरोग्यदायी घरे आणिअति-हवामानापासून अधिक चांगली सुरक्षा. (@प्रोजेक्ट सिंडिकेट) लोक रोजच्या जीवनात अनुभवू शकतात.तिच खरी हवामान धोरणे म्हटलीपाहिजेत. म्हणजे स्वच्छ हवा, सुरक्षित रस्ते,विजेचे कमी बिल, अधिक आरोग्यदायीघरे,तीव्र हवामानापासून चांगली सुरक्षा.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
महाराष्ट्र
गुन्हा
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम
- मुंबई: मालाडमध्ये मालमत्तेच्या वादातून मुलाने वृद्ध आईला आणि बहिणीला लाथाबुक्क्यांनी मारले; नराधम अटकेत!
- पुणे: शिक्रापूरमध्ये माजी महिला सरपंचाच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरट्यांनी हिसकावले
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला जिवंत जाळले; पोलीस तपासात धक्कादायक कबुली!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
- दैनिक राशिभविष्य: आज या राशींचे नशीब फळफळणार; आर्थिक प्रगती आणि नोकरीत बढतीचे योग!
- मराठवाड्यात जुलैच्या सुरुवातीलाही पावसाची ओढ! पहिल्या आठवड्यात केवळ २३.२ मिमी पाऊस; धरणे कोरडी, पेरण्या रखडल्याने बळीराजा हवालदिल!
- धाराशिवच्या जमिनीचा पोत खालावला! मृद आरोग्य पत्रिकेच्या अहवालात 'नत्र' कमतरतेची गंभीर नोंद; खरिपासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याचे आवाहन.
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
देश विदेश
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
- एलपीजी गॅस सिलिंडरची चिंता मिटणार! ऊर्जा सुरक्षेसाठी भारताचा मोठा निर्णय; आखाती देशांवरील अवलंबित्व घटणार!
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला जिवंत जाळले; पोलीस तपासात धक्कादायक कबुली!
- फिफा विश्वचषक २०२६ मध्ये थरार! बेलिंगहॅम चमकला, १० खेळाडूंसह खेळणाऱ्या इंग्लंडने मेक्सिकोला नमवून गाठली उपांत्यपूर्व फेरी
























Subscribe to my channel

