CAN vs UAE : युएईने कॅनडाला 5 विकेट राखून नमवलं, शेवटच्या दोन षटकात असा रंगला थरारImage Credit source: Icc X account
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या 20व्या सामन्यात कॅनडा आणि युएई हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात कॅनडाच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. या सामन्यात कॅनडाने 20 षटकात 7 गडी गमवून 150 धावा केल्या. तसेच विजयासाठी 151 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना युएईची सुरुवातीला दमछाक झाली. कारण आघाडीचे चार फलंदाज एकेरी धावसंख्येवर तंबूत परतले होते. त्यामुळे विजयाची बाजू पूर्णपणे कॅनडाच्या बाजूने झुकली होती. पण एका बाजूने आर्यांश शर्मा किल्ला लढवत होता. त्याला सोहेब खानची साथ मिळाली. आर्यांश शर्माने 41 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. तर दुसऱ्या बाजूने सोहेब खान फटकेबाजी करत होता. त्यामळे शेवटच्या षटकांमध्ये सामना कधी येथे तर कधी त्या बाजूला झुकत होता.
शेवटच्या दोन षटकात काय झालं?
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील पहिल्या विजयासाठी युएईला 12 चेंडूत 26 धावांची गरज होती. तसेच हातात 6 विकेट होत्या. आर्यांश शर्मा आणि सोहेब खान ही जोडी जमली होती. त्यामुळे हे आव्हान शक्य आहे असंच वाटत होतं. कलीम साना हा कॅनडाकडून षटक टाकण्यासाठी आला. पहिल्या चेंडूवर आर्यांशने 2 धावा काढल्या. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर चौकार मारला. त्यामुळे 9 चेंडूत 16 अशी स्थिती आली. चौथ्या चेंडूवर 1 धाव घेतली आणि सोहेल खानला स्ट्राईक दिली. स्ट्राईकला आलेल्या सोहेल खानला नो बॉल टाकला. आणि फ्री हीट मिळाला. त्याने त्या चेंडूवर चौकार मारला आणि स्थिती 7 चेंडूत 10 धावा अशी आणली. शेवटच्या चेंडूवर 2 धावा काढल्या आणि सोहेल खानने अर्धशतक पूर्ण केलं. त्याने 28 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकार मारत अर्धशतक पूर्ण केलं. तर 6 चेंडूत 8 धावा अशी स्थिती आली.
खेळपट्टीवर जम बसवलेला आर्यांश शर्मा स्ट्राईकला होता. त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला आणि सामना आपल्या बाजूने खेचला. त्यामुळे 5 चेंडूत 2 धावा अशी स्थिती आली. दुसऱ्या चेंडूवर 1 धाव काढली आणि सामना बरोबरीत आणला. 4 चेंडूत 1 धाव आवश्यक असताना सोहेल खान स्ट्राईकला आला. त्याने तिसऱ्या चेंडूवर फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि झेल बाद झाला. त्यामुळे सामन्यात ट्विस्ट आला. तीन चेंडूत 1 धाव अशी स्थिती असताना नवा फलंदाज स्ट्राईकला आला. मुहम्मद अरफान स्ट्राईकला आला आणि एक धाव काढली आणि हा सामना युएईने 5 गडी राखून जिंकला.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




