जगामध्ये ' स्व ' सोडून ' लोकं ' नावाचा एक समुदाय असतो. या समुदायाला काय वाटेल याचीच चिंता माणूस सतत करत असतो. अनेक जण या लोकांच्या कल्पनेनुसार जगतात. मी स्वतःला वाटतं तसा राहिलो तर लोक काय म्हणतील? मी माझ्या इच्छेनुसार जगलो तर लोकांना काय वाटेल? मी मनासारखं वागलो तर लोक काय विचार करतील? असा विचार करूनच आजकाल बहुतांशी माणसं लोकांच्या अपेक्षानुसार जगत आहेत. याचाच अर्थ जीवन आपण जगत आहोत परंतु त्या जगण्याला काहीच अर्थ नाही. मी जे जीवन जगतो आहे तो मी नाही,आणि मी जगलेले जीवन माझे नाही. म्हणूनच या अशा जगण्याला अर्थ नाही. जे जीवन आपल्या स्वतःच्या संकल्पनेनुसार जगले, आपल्या विचार ध्येय आणि उद्देशाच्या निश्चितीनुसार जगले, आपल्याला वाटेल तसे मनाप्रमाणे जगत राहिले, तर ते जीवन आपले म्हणावे. आता लोक काय म्हणतील याचा विचार सोडून द्यावा. आपण आपल्या स्वतःच्या इच्छा पूर्ण कराव्यात. आपल्या स्वतःच्या आवडीनिवडी आणि मतानुसार आपल्या जीवनाची आखणी करावी. आणि त्यानुसार पुढे चालावे. लोकही पुढे जात आहेत. कोणीही थांबलेले नाही. जग चाललेले आहे. घड्याळाचे काटे थांबलेली नाहीत. आलेला क्षण मागे जात आहे. पुढचा क्षण वर्तमान होत आहे. हातातून निसटलेला क्षण भूतकाळात जात आहे. यामध्ये लोकांच्या इच्छा अपेक्षा कुठे येतात ? आणि त्यांना कुठवर महत्त्व द्यायचं ? हे आपण ठरवायचं. वाच्यता न करता स्वतःला बदला.लोकं ईर्षेने तळमळतील. जगाला मोठे उत्तर शब्दांनी नव्हे तर परिवर्तनाने द्यायचे असते. तुम्ही दूर जात नाहीत तो पर्यंत त्यांना तुमची किंमत कळत नाही. लोकांना रडून समजावून सांगू नका.ही जाणीव होऊ द्या की त्यांनी काय गमावले आहे. स्वार्थ असेल तिथे आपलेपणा शोधु नये. फक्त उपयोग पाहिला जातो तिथे प्रेम शोधु नये. उणीव आपल्या निवडीमध्ये असते. लोकं जसे असतात तसेच असतात. आता वेळ आली आहे स्वतःकडे परतण्याची. आत्मकेंद्रित होण्याची. वर्तमानातच जगून निघावे. निसटलेले क्षण परत येत नाहीत, याचा चांगला अनुभव प्रत्येकालाच आलेला आहे. म्हणून आयुष्याचा उद्देश निश्चित करावा. आपल्या ध्येयपूर्ती कडे प्रामाणिकपणे, स्व-कष्टाने चालावे. रस्त्यात येणाऱ्यांची चिंता नको, कोणाचा विचारू नको, कोणाबद्दल मनात राग,द्वेष नको. आत्मसन्मान असावा, पण अहंकार नको. असंच आपल्या उद्देशाला धरून, प्रामाणिकपणे, नैतिकतेने, धैर्याने, आत्म सन्मानानं उद्देशाकडे ध्येयाकडे जाता येतं. फक्त आपण आत्मकेंद्रीत असावे. इतरांचा सन्मान आदर असावा परंतु त्यांच्या कल्पनेचा आपल्या जीवनात विचार नको. आपल्या अपेक्षा आणि कल्पनेनुसार लोक जगत आहेत का? हे आपण पाहतच नाहीत. मात्र लोकांना काय वाटते?आपण कसे असावे? म्हणून लोकांना त्यांच्या नजरेत चांगले दिसावे म्हणून आपण एक अभिनयाचे जीवन जगत असतो. आपले स्वतःचे जीवन स्वतःच्या विचाराने आणि आपण निश्चित केलेल्या ध्येयाकरिता जगावे असेच आज या ठिकाणी व्यक्त व्हावे वाटते. (संपर्क- 9420015108)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- ताजमहाल पाहण्याचे स्वप्न अपूर्णच! राजस्थानचा प्रवासी भरकटला सोलापुरात; महिनाभर पडक्या इमारतीत काढले दिवस.
- वरंधा घाटातील दरड हटवली; शिरगावजवळील भोर-महाड मार्ग वाहतुकीसाठी पूर्ववत!
- विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ! शाळेचे मैदान बनले अनधिकृत वाहनतळ; चिखल, निसरडा रस्ता अन् अपघातांची भीती!
- नाशिक कुंभमेळा २०२७ च्या पूर्वतयारीला वेग: विकासकामांसाठी वृक्षतोड टाळण्याचा प्रयत्न, ५००० वृक्षांची लागवड आणि महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी!
महाराष्ट्र
- वरंधा घाटातील दरड हटवली; शिरगावजवळील भोर-महाड मार्ग वाहतुकीसाठी पूर्ववत!
- विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ! शाळेचे मैदान बनले अनधिकृत वाहनतळ; चिखल, निसरडा रस्ता अन् अपघातांची भीती!
- नाशिक कुंभमेळा २०२७ च्या पूर्वतयारीला वेग: विकासकामांसाठी वृक्षतोड टाळण्याचा प्रयत्न, ५००० वृक्षांची लागवड आणि महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी!
- पुणे: वीकेंडला सिंहगडला जाण्याचा विचार करताय? सावधान! पायरीमार्गावर दरड कोसळली, प्रशासनाचे पर्यटकांना आवाहन
गुन्हा
- बीड: पनीर नव्हे, विष खाताय? बीडमध्ये 'सॅफोलाइट' केमिकलच्या भेसळीचा भयानक प्रकार उघड; लाखो रुपयांचा साठा नष्ट!
- पुणे: जेसीबीखाली चिरडलेल्या मजुराचा मृतदेह डिकीत कोंबून रस्त्यावर फेकला; 'अपघाताचा' बनाव उघड
- बसच चोरीला! तेही थेट बसस्थानकातून.. आरोपीकडून तब्बल २० बसेस चोरल्याची कबुली; पोलीसही चक्रावले!
- बीड: स्कॉर्पिओ आणि १० लाखांच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ; पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल.
राजकीय
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
इतर
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतमालाच्या प्रक्रिया आणि साठवणूक प्रकल्पासाठी मिळणार २ कोटींपर्यंत कर्ज.
- तुम्हीही खाताय का 'डर्टी' पाणीपुरी? कल्याणमध्ये अस्वच्छ कारखान्यावर केडीएमसीचा धडक छापा, कारखाना सील!
- आजचे राशिभविष्य २ जुलै २०२६: या राशींच्या आयुष्यात येणार 'टर्निंग पॉईंट', गुरू देणार पाठबळ!
- आजचे राशिभविष्य (१ जुलै २०२६): 'या' राशींवर बरसणार गणपती बाप्पाची कृपा, करिअरमध्ये मिळेल मोठे यश!
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
विडियो गॅलेरी

मुंबईची शान असलेला जुहू बीच कचऱ्याच्या विळख्यात! #JuhuBeach #Mumbai #MumbaiNews #Beach #IndiaNews
Chief Minister Devendra Fadnavis and Deputy CM Sunetra Pawar Murlidhar Mohol #Leadership v
अमळनेरमध्ये संतापजनक प्रकार! बेवारस मृतदेह कचऱ्याच्या घंटागाडीतून स्मशानभूमीत #Amalner #Jalgaon
देश विदेश
- वनडे क्रिकेट संपणार? आर. अश्विनच्या मोठ्या वक्तव्याने क्रिकेटविश्वात खळबळ; ५० षटकांच्या फॉरमॅटवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह!
- बलुचिस्तान हादरलं! प्रवास अर्ध्यावरच संपला... भीषण बस अपघातात ४० जणांचा मृत्यू, ८ प्रवासी गंभीर जखमी.
- भारत-इंग्लंड दुसरा T20 सामना रात्री १० वाजता नाही, तर 'या' वेळी होणार सुरू; जाणून घ्या सविस्तर वेळ!
- खामेनेई यांनी जिथे घेतला अंतिम श्वास, तिथेच आणले पार्थिव; अंत्यविधीला २ कोटी लोकांचा महासागर उसळणार


























Subscribe to my channel



