आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात तुमच्या आजूबाजूला असे काही लोक असतात, ते तुमच्या तोंडावर गोड बोलतात. मात्र त्यांच्या मनामध्ये तुमचं चांगलं व्हावं अशी भावना कधीच नसते, त्यामुळे ते तुमच्या पाठीमागे तुमच्यासोबत गद्दारी करतात. तुम्हाला धोका देतात. अशा लोकांपासून आपण नेमही सावध राहिलं पाहिजे. जर आपण बेसावध राहिलो तर असे लोक कधीही आपला घात करू शकतात. चाणक्य म्हणतात जे आपल्या जवळचे असतात तेच आपल्याला अनेकदा धोका देतात, त्यामुळे असे लोकं ओळखणं हे खूप कठीण काम असतं. मात्र कोणत्याही व्यक्तीच्या वागण्या-बोलण्यामध्ये काही वेगळ्या गोष्टी दिसल्या तर तुम्ही सावध होणं गरजेचं असतं, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल?
बदललेली वृत्ती – चाणक्य म्हणतात अनेकदा असं होतं की काही जण हे आपले चांगले मित्र असतात, हितचिंतक असतात. मात्र जेव्हा आपल्या प्रगतीला सुरुवात होते, तेव्हा ती प्रगती त्यांना बघवत नाही. अशा वेळी अचानक अशा व्यक्तींच्या वागण्या-बोलण्यामध्ये फरक जाणवू लागतो, जेव्हा तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तींच्या वागण्या -बोलण्यामध्ये फरक दिसतो, तेव्हा वेळीच सावध व्हा. कारण असे व्यक्ती हे तुमच्याविरोधात कट कारस्थान रचण्याची शक्यता असते.
अतिगोड बोलणारे लोक – चाणक्य म्हणतात जे लोक अतिगोड बोलतात त्यांच्यापासून तर कायम सावध राहण्याची गरज असते. जे लोक तुमच्या तोंडावर स्पष्ट बोलतात, अशा लोकांच्या गोष्टी तुम्हाला भलेही कटू वाटतील, मात्र त्यांच्या मनात जे असतं, तेच त्यांच्या तोंडात देखील असतं. मात्र जे लोक अतिगोड बोलतात, हे लोक कधीच तुम्हाला तुमचे दोष सांगत नाहीत. उलट ते तुमच्या चुकांवर टपलेले असतात. त्यामुळे जर तुमच्याशी एखादा व्यक्ती अतिगोड बोलत असेल तर त्याच्यापासून वेळीच सावध व्हा, त्याचं कारण शोधून काढा असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
समोर कौतुक, मागे निंदा – चाणक्य म्हणतात समाजात असे काही लोक असतात, जे समोर आपलं कौतुक करतात. मात्र पाठीमागे आपली निंदा करतात, अशा लोकांपासून नेहमी सावध राहिलं पाहिजे, असे लोक तुम्हाला धोका देत असतात, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

