मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या (NH-66) रुंदीकरणाचे आणि चौपदरीकरणाचे काम मागील १८ वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. मात्र, इतकी वर्षे उलटूनही हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही, त्यातच या रस्त्याच्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप आता प्रवाशांकडून केला जात आहे. उन्हाळा संपून पावसाळा तोंडावर आलेला असतानाच, या महामार्गावरील महाड तालुक्यातील तीन अत्यंत प्रमुख आणि महत्त्वाच्या ठिकाणी यावर्षी पावसाळ्यात भीषण दरड कोसळण्याची (Landslide) दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना यंदाचा पावसाळा जीव मुठीत धरूनच घालवावा लागण्याची भीती व्यक्त होत आहे.
या तीन ठिकाणी आहे सर्वाधिक धोका:
१. दासगाव खिंड (Dasgaon Khind):
या खिंडीतील अत्यंत धोकादायक असलेले वळण राष्ट्रीय महामार्ग विभागाने अद्याप काढलेले नाही. मागील वर्षीच्या पावसाळ्यातही या ठिकाणी अचानक मोठ्या प्रमाणावर दगड आणि माती थेट रस्त्यावर येऊन कोसळली होती. तरीही प्रशासनाने यातून धडा घेतलेला नाही. एकीकडे मुंबई-पुणे अंतर कमी करण्यासाठी बोगदे तयार केले जात असताना, या महामार्गावरील धोकादायक वळणे न हटवल्यामुळे येथे मोठी दुर्घटना घडू शकते.
२. केंबुर्ली (Kemburli):
केंबुर्ली परिसरात महामार्गाच्या रुंदीकरणासाठी एका बाजूने डोंगर मोठ्या प्रमाणावर फोडण्यात आला होता. परंतु, हा डोंगर सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. डोंगराचा हा भाग कमकुवत झाला असून, पहिल्याच मुसळधार पावसात येथील दरड महामार्गावर येण्याची पूर्ण शक्यता आहे.
३. नडगाव (Nadgaon):
महाड शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या नडगाव हद्दीतही परिस्थिती अतिशय बिकट आहे. या ठिकाणी महाकाय दगडांचा डोंगर खालच्या बाजूने पूर्णपणे पोखरण्यात आला आहे. यामुळे डोंगरावरील अजस्त्र दगड कधीही खाली घसरून थेट रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांवर कोसळू शकतात. येथे असलेले धोकादायक वळण न काढताच त्याचे सरळ चौपदरीकरण केल्याने हा पट्टा प्रचंड अपघाती बनला आहे.
प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि प्रवाशांचा संताप
पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, रस्त्याला लागून असलेल्या डोंगरावरील धोकादायक दगड आणि सैल झालेली माती काढण्याचे काम खाजगी ठेकेदाराकडून अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. महामार्गावर आधीच टोल वसुली घाईघाईने सुरू करण्यात आली आहे, परंतु प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न मात्र वाऱ्यावर सोडण्यात आला आहे. पावसाळ्यात जर या तीन ठिकाणी दरडी कोसळल्या, तर कोकणात जाणारी संपूर्ण वाहतूक तासनतास ठप्प होऊन प्रवाशांचे प्रचंड हाल होण्याची शक्यता आहे. या संभाव्य धोक्याची दखल घेऊन राष्ट्रीय महामार्ग विभाग वेळीच जागा होणार का, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.
शहर
- अहिल्यानगर: पहाटेच्या अंधारात निघाला, खड्डा न दिसल्यानं बाईकसह पुलाखाली कोसळला; अहिल्यानगरमधील जामखेड येथे भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू
- पुणे: धनकवडी येथील शंकर महाराज उड्डाणपुलावर साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा मोठा धोका; वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा ८३ टक्क्यांवर पोहोचला, महानगरपालिकेने जाहीर केली जलसाठ्याची आकडेवारी"
- सातारा: पुणे-बेंगळुरू महामार्गावर खंडाळा तालुक्यातील धनगरवाडीजवळ भरधाव खासगी बसची उभ्या ट्रकला धडक; १५ प्रवासी गंभीर जखमी
महाराष्ट्र
- पंढरपुर: आषाढी एकादशीच्या दिवशी मोठी दुर्घट घटना; वारीच्या बंदोबस्तावर आलेल्या SRPF जवानाने स्वतःवर गोळ्या झाडून संपवले आयुष्य
- अहिल्यानगर: पहाटेच्या अंधारात निघाला, खड्डा न दिसल्यानं बाईकसह पुलाखाली कोसळला; अहिल्यानगरमधील जामखेड येथे भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू
- पुणे: धनकवडी येथील शंकर महाराज उड्डाणपुलावर साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा मोठा धोका; वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा ८३ टक्क्यांवर पोहोचला, महानगरपालिकेने जाहीर केली जलसाठ्याची आकडेवारी"
गुन्हा
- उत्तर प्रदेश: हुंड्यात बुलेट बाइक मिळाली नाही म्हणून नराधम पतीने केली २२ वर्षीय पत्नीची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; अवघ्या दोन वर्षांपूर्वीच झाले होते लग्न
- मुंबई: 'पंतप्रधान आवास'मध्ये १८ कोटींचा घोटाळा; तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, नेमके प्रकरण काय?
- अकोला: पोलिसाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आत्महत्येच्या प्रयत्नानंतर पीडित मुलगी कोमात
- उत्तर प्रदेश: संपत्तीच्या हव्यासापोटी बायकोने पार केली क्रूरतेची सीमा तिसऱ्या पतीला बाथरुममध्ये कोंडून जिवंत जाळल्याची अत्यंत संतापजनक घटना
राजकीय
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
इतर
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: 'आताची पिढी प्रश्न विचारतेय, ऐकून घ्यायला हवं'; CJP आंदोलनावर सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य
- बंगळुरू : BMTC बसमध्ये महिलेची छेडछाड, चालकाने आरोपीला दिली कडक शिक्षा
- उत्तर प्रदेश: दंडाची पावती फाडून संतापलेल्या रिक्षाचालकाने स्वतःच्या अंगावर ओतले तेल, पोलिसांची उडाली धावपळ
- उत्तर प्रदेश: संपत्तीच्या हव्यासापोटी बायकोने पार केली क्रूरतेची सीमा तिसऱ्या पतीला बाथरुममध्ये कोंडून जिवंत जाळल्याची अत्यंत संतापजनक घटना

























Subscribe to my channel



