पुणे: खासगी शाळांमधील प्रवेश रद्द केल्यानंतर शुल्क परतावा न मिळाल्याने पालकांना होणारा आर्थिक भुर्दंड आता थांबणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. राज्य शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी खासगी शाळांसाठी शुल्क परतावा धोरण तयार करण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. ही समिती एक महिन्यात अहवाल सादर करणार असून, लवकरच शासन निर्णय जारी होण्याची शक्यता आहे.
का घेतला हा निर्णय?
सध्या राज्यात खासगी शाळांसाठी शुल्क परताव्याचे कोणतेही स्पष्ट धोरण नाही. पालक एकापेक्षा जास्त शाळांमध्ये अर्ज करतात. पहिल्या शाळेत तात्पुरता प्रवेश घेऊन चांगली शाळा मिळाल्यास प्रवेश रद्द करतात. मात्र, शाळा शुल्क परत देत नाहीत. यामुळे पालकांना हजारो रुपयांचा तोटा आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. आरटीई प्रवेश सोडतीच्या वेळीही अशा तक्रारी समोर आल्या. उच्च शिक्षणात यूजीसी व एआयसीटीईचे नियम असतानाही शालेय स्तरावर हे धोरण नव्हते. यामुळे शिक्षण आयुक्तांनी पुढाकार घेतला.
समिती काय करणार?
प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्या अध्यक्षतेखालील समितीत सेवानिवृत्त शिक्षण संचालक दिनकर टेमकर, विविध जिल्ह्यांचे शिक्षणाधिकारी, शाळा प्रतिनिधी आणि पालक प्रतिनिधींचा समावेश.
दिल्ली सरकारच्या धोरण, सीबीएसई, यूजीसी आणि विद्यमान शुल्क नियमन कायद्याचा अभ्यास करून एकसमान नियमावली तयार करणार.
इयत्ता पहिली, पाचवी, सहावी, नववी या प्रवेश टप्प्यांसाठी प्राधान्याने लागू करण्याची शक्यता.
संभाव्य शुल्क परतावा नियम (माजी संचालक दिनकर टेमकर यांच्या सूचनेनुसार)
शाळा सुरू झाल्यानंतर १ महिन्याच्या आत प्रवेश रद्द केल्यास → १००% शुल्क परतावा.
१ ते २ महिन्यांत → नोंदणी + प्रवेश शुल्क + १ महिन्याचे शिक्षण शुल्क वजा करून उर्वरित परत.
२ महिन्यानंतर प्रथम सत्रापर्यंत → नोंदणी + प्रवेश + चालू महिन्यांचे शुल्क वजा करून उर्वरित.
सत्रानंतर → आंशिक किंवा कोणताही परतावा नसावा, अशी रचना प्रस्तावित.
पालकांसाठी महत्त्वाचे
हा निर्णय लागू झाल्यास खासगी शाळांच्या मनमानीला लगाम बसणार आहे. पालकांना आता शुल्क परताव्याची आशा निर्माण झाली आहे. शिक्षण विभागाने पालकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या तक्रारी तातडीने जिल्हा शिक्षण अधिकारी किंवा संबंधित समितीकडे नोंदवा.
शिक्षण आयुक्तांचे म्हणणे
“शुल्क परताव्याची नियमावली हा धोरणात्मक निर्णय आहे. सर्व मंडळांच्या खासगी शाळांसाठी एकसमान धोरण आणण्यात येईल,” – सचिंद्र प्रताप सिंह, शिक्षण आयुक्त.
ही बातमी लाखो पालकांसाठी मोठा दिलासा मानली जात आहे. समितीचा अहवाल आणि शासन निर्णय लवकरच अपेक्षित आहे.
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
























Subscribe to my channel


