
New Delhi : आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्यांचे नववे अर्थसंकल्प सादर करत असून 2026साठी देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती या वरून ठरणार आहे. संसदेत त्यांचं भाषण सुरू होताच, निर्मला सितारामन यांनी भारतात 7 नवे हाय स्पीड रेल्वे कॉरिडोर सुरू करण्याची महत्त्वाची घोषणा केली आहे. यामुळे येत्या काही वर्षांत देशातील रेल्वेच्या जाळ्या मोठी सुधारणा होणार आहे.
अर्थमंत्री यांनी यंदाचं अर्थसंक्लपाच्या भाषणाची सुरूवात करताना केंद्र सरकाच्या पायाभूत सुविधांचा आराखडा सादर केला. त्यावेली त्यांनी देशात 7 नवे वेगवान आणि पर्यावरणपूर्व रेल कॉरिडोर सुरू करण्याची घोषणा केली. रेल्वे नेटवर्कचा विस्तार होऊन यामुळे प्रवास अधिक सुखकर होणार आहे.
"सरकार सात हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरद्वारे पर्यावरणास अनुकूल प्रवासी वाहतूक प्रणाली विकसित करण्याचा प्रस्ताव देत आहे," असे त्यांनी आपल्या अर्थसंकल्पीतील भाषणात सांगितले. यामध्ये महाराष्ट्राला मोठा फायदा होणार आहे, कारण मुंबई ते पुणे हाय स्पीड रेल्वेचा या सात रेल्वे कॉरिडोरमध्ये समावेश आहे.
|
|
सर्व सात रेल्वेची यादी पाहा
मुंबई–पुणे
हैदराबाद–बंगळूरू
दिल्ली–वाराणसी
वाराणसी–सिलिगुडी
पुणे–हैदराबाद
हैदराबाद–चेन्नई
चेन्नई–बंगळूरू
हे सात हाय-स्पीड रेल मार्ग देशातील सर्व प्रमुख महानगरांना वेगाने वाढणाऱ्या शहरांशी जोडणार आहेत. यामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल आणि रस्ते व पारंपरिक रेल्वे जाळ्यांवरील ताण कमी होईल अशी अपेक्षा आहे. सध्या मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर एक हाय-स्पीड रेल्वे कॉरिडोर उभारण्याचं काम सुरू आहे. हा प्रकल्प 508 किमी लांब आहे. हा देशातील एकमेव असा रेल्वे मार्ग आहे जिथून 320 किमी प्रतितास वेगाने बुलेट ट्रेन धावण्याची क्षमता आहे. हा रेल्वे मार्ग गुजरात, महाराष्ट्र, दादरा आणि नगर हवेली या भागांमधून जाणाार आहे. हे संपूर्ण अंतर केवळ 2 तास 17 मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे.
स्वतंत्र मालवाहतूक मार्ग
यासोबतच, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशात एक स्वतंत्र मालवाहतूक कॉरिडोर उभारण्याची घोषणासुद्धा केली आहे. हा मार्ग देशातील पूर्व ते पश्चिमेमधील राज्यांना सहजपणे जोडणार आहे. पूर्वेतील डांकुणी ते पश्चिमेमधील सुरतपर्यंत हा मालवाहतूक मार्ग उभारला जाणार आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel





1 thought on “Railway Budget 2026 : मुंबई–पुण्यासह प्रमुख शहरांना जोडणाऱ्या 7 नव्या हाय-स्पीड ट्रेन; रेल्वे नेटवर्क विस्ताराची अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा”