
Kanpur : उत्तर प्रदेशातील कानपूरच्या जालौन कोंच पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने आपल्या आयुष्याची अखेर केली. त्यांनी स्वत:वर गोळी झाडून आपला जीव दिल्याची माहिती आहे. या प्रकरणात आता नवीन खुलासे समोर येत आहेत. अरुण कुमार राय असं जीव देणाऱ्या पोलिसाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस अधिकाऱ्याची एका महिला कॉन्स्टेबलसोबत जवळीक वाढली होती. सहकारी पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, महिला कॉन्स्टेबलने स्टेशन इन्चार्जचे काही व्हिडिओ आणि चॅट्स सेव्ह करुन ठेवले होते, ते वापरून ती त्यांना सतत त्रास देत होते.
आता याप्रकरणी या महिला कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे. तसेच, तिच्या मोबाइलचाही तपास सुरु आहे. ज्यामध्ये पोलिसांना काही मेसेज सापडले आहेत.
|
|
अरुण कुमार राय यांच्या मृत्यू प्रकरणात महिला कॉन्स्टेबल मीनाक्षी शर्माला ताब्यात घेण्यात आले आहे आणि त्यांच्या पत्नीने दिलेल्या लेखी तक्रारीवरून तिची चौकशी केली जात आहे. सूत्रांनुसार, मीनाक्षी आणि अरुण यांच्यात जवळचे संबंध होते. महिला कॉन्स्टेबलशी ही वाढती जवळीक त्यांच्या मृत्यूचे कारण असू शकते, असा संशय आहे.
याप्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, 14 मार्च 2024 रोजी महिला कॉन्स्टेबल मीनाक्षी शर्मा यांची कोंच पोलिस ठाण्यात नियुक्ती झाली होती. 5 जुलै 2024 ला अरुण कुमार राय यांनी कोंच पोलिस ठाण्याचे इन्स्पेक्टर इनचार्ज म्हणून पदभार स्विकारला. दोघेही सुमारे सात महिने एकाच पोलिस ठाण्यात एकत्र तैनात होते. या काळात, त्यांच्यातील जवळीक वाढल्याच्या अफवा तीव्र झाल्या. 22 फेब्रुवारी 2025 ला अरुण यांची ओराई पोलिस ठाण्यात बदली करण्यातआली, तर मीनाक्षीला 28 एप्रिल 2025 रोजी यूपी 112 युनिट- 1577 येथे पाठवण्यात आले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण हे ओराईला गेल्यानंतर मीनाक्षीचे वर्तन बदलले. ती अरुण यांच्यावर विविध मुद्द्यांवरून सतत दबाव आणत होती. ती त्यांच्या अधिकृत निवासस्थानी जाऊन वाद घालत असे, ज्यामुळे अरुण तणावात होते. सततचा ताण, संघर्ष आणि दबाव यामुळे अरुण कुमार राय यांच्या मानसिक स्थितीवर मोठा परिणाम झाला, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, असंही सांगण्यात येत आहे.
या खळबळजनक घटनेत, मृत इन्स्पेक्टरची पत्नी माया राय यांनी महिला कॉन्स्टेबल मीनाक्षी शर्मा यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे की मीनाक्षीच्या कॉल डिटेल्स आणि चॅट्समुळे अनेक गुपिते उलगडू शकतात.
महिला कॉन्स्टेबल आणि स्टेशन इन्चार्ज यांच्यातील मोबाईल फोनवरील संभाषणाची नोंद देखील सापडली आहे. इतकंच नाही तर घटनेच्या काही काळापूर्वी, महिला कॉन्स्टेबलने तिची वर्दी मागण्यासाठी अरुण यांना फोन केला होता, माझी वर्दी द्या, मला घरी जायचे आहे, असं ती म्हणाली होती, अशीही माहिती आहे. घटनास्थळावरून एक पत्रही सापडले आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल


























Subscribe to my channel



