Mumbai : प्रेमसंबंधांना विरोधानंतर ‘पोक्सो’त अटक; सागर ठाकरेने पोलीस कोठडीत गळफास घेतला, कुटुंबाला भरपाई जाहीर

Pune : पोलीस कोठडीत असताना आरोपीच्या सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित पोलिसांवर असते, असे स्पष्ट करत राज्य मानवाधिकार आयोगाने सागर ठाकरे प्रकरणात महत्त्वाचा निर्णय दिला आहे. कोठडीत मृत्यू झाल्यामुळे सागरच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश आयोगाने राज्य सरकारला दिले आहेत.

8 आठवड्यांत भरपाई देण्याचे निर्देश

आयोगाने आदेशात नमूद केले आहे की, आदेशाची प्रत मिळाल्यापासून आठ आठवड्यांच्या आत सागर ठाकरेच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची भरपाई द्यावी. अन्यथा, रक्कम प्रत्यक्ष देईपर्यंत वार्षिक 8 टक्के दराने व्याज देण्याची तरतूदही करण्यात आली आहे. हा आदेश आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती ए. एम. बदर आणि सदस्य संजय कुमार यांच्या खंडपीठाने दिला.

प्रकरण काय आहे?

१९ ऑगस्ट २०२१ रोजी अमरावती येथील राजापेठ पोलीस ठाण्याच्या कोठडीत सागर ठाकरे याचा मृत्यू झाला होता. तो ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्ह्यात अटक झालेला होता. प्रेमसंबंधांना विरोध आणि वैयक्तिक कारणांमुळे तो मानसिक तणावाखाली असल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे.

चौकशीत काय निष्पन्न?

सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे, सागरने कोठडीत स्वतःच जीव दिल्याचे स्पष्ट झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. सोबतच्या आरोपीच्या जबाबानुसार, त्याने टी-शर्टचा वापर करून गळफास घेतला होता. कुटुंबीयांनीही कोणताही छळाचा संशय व्यक्त केला नव्हता.

पोलिसांची जबाबदारी ठरवली

तथापि, कोठडीत असलेल्या आरोपीची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात संबंधित पोलिसांना अपयश आल्याचे आयोगाने स्पष्ट केले. ‘सरकारी यंत्रणेच्या हलगर्जीमुळे नागरिकाच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाले’, असे निरीक्षण नोंदवत संबंधित पोलिसांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *