Brahmagiri Hills : ब्रह्मगिरीवरून अचानक दगड कोसळले; नवविवाहित दाम्पत्य थोडक्यात बचावले. तिघेजण जखमी

Nashik : नाशिक शहर व परिसरात कालपासून जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान नाशिक शहरापासून जवळ असलेल्या ब्रह्मगिरी पर्वतावर जाताना लगतच्या डोंगरावरून अचानक दगड कोसळले. यावेळी ब्रम्हगिरीवर जात असलेल्या भाविकांच्या अंगावर दगड पडल्याने तीन भाविक जखमी झाले. सुदैवाने यात मोठी दुर्घटना टाळली आहे.

नाशिक शहर आणि परिसरात रात्रीपासून पुन्हा संततधार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे गोदावरी नदीला पूर आलेला आहे. शिवाय शहर व परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर जोरदार पावसामुळे डोंगर परिसरात दरड कोसळत आहेत. ब्रह्मगिरी किल्याच्या मुख्य पायऱ्यांनी जाताना डाव्या बाजूला असलेला डोंगरकडा सुटला आहे. तेथे निखळलेले दगड उतारावर जमा झाले आहेत. धबधबा असलेल्या या ठिकाणी माकडांची धावपळ झाल्यास दगड खाली घसरून पडतात.

Thackeray : ठाकरे गटाचा गड राखणारा आमदार नाराज? व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स होतंय व्हायरल; 'दिव्याला तेलाची गरज...'

नवविवाहित दाम्पत्य बचावले

दरम्यान मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास ब्रह्मगिरी पर्वतावर दगड कोसळला आहे. यात विशाल प्रतापसिंह गिरासे आणि जयश्री विशाल गिरासे या नवविवाहित दाम्पत्याला गंभीर दुखापत झाली. वरून दगड पडल्याने जयश्रीच्या हातावर मार लागला. यात त्यांचा हात फॅक्चर झाला आहे. तर विशाल यांच्या डोक्यावर खोल जखम झाली असून हाताला देखील गंभीर दुखापत झाली आहे.

यापूर्वीही घडलीय घटना

तसेच तेथे असलेल्या नेहा डावरी यांच्या हाताच्या बोटाला दुखापत झाली. या घटनेवेळी काही भाविक बालंबाल बचावले आहेत. यापूर्वी देखील त्याच ठिकाणावर दगड पडले आणि एका भाविकाचा जीव गेला होता आणि काही भाविक जखमी झाले होते. त्याच जागेवर पुन्हा ही घटना घडलीय. यामुळे येथे फिरायला जाणाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.

 

 

 

 

 

 

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *