Shirur : पोट खराबा नोंदीतील चुकीमुळे शिरूरमधील शेतकरी योजनांपासून वंचित

Shirur : शिरूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना शासनाच्या नोंदीतील त्रुटींमुळे विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात अडथळे निर्माण होत असल्याचे समोर आले आहे.

वर्ग दोनच्या जमिनींचे वाटप करताना या जमिनी “पोट खराबा” म्हणून नोंदवण्यात आल्या होत्या. मात्र, कालांतराने शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चातून कर्ज काढून या जमिनी शेतीयोग्य बनवल्या असून, सध्या त्या ठिकाणी बागायती शेती केली जात आहे.

सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंद बागायती म्हणून दिसत असली तरी “पोट खराबा” ही जुनी नोंद अद्याप कायम आहे. या विसंगतीमुळे शेतकऱ्यांना फार्मर आयडी (शेतकरी ओळखपत्र) मिळण्यात अडचणी येत आहेत.

परिणामी, खते, बियाणे, पीक कर्ज, कर्जमाफी तसेच शेतकरी सन्मान निधी यांसारख्या महत्त्वाच्या योजनांचा लाभ घेण्यात शेतकरी अपयशी ठरत आहेत.

या समस्येबाबत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत शासनाकडे तातडीने नोंदी दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. तसेच, तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात फार्मर आयडी देऊन योजनांचा लाभ मिळावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

शासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *